Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 507 articles
Browse latest View live

यूपीएससी शंका निरसन

$
0
0

सुशील बारी

प्रश्न : मी TYB.Com चा अभ्यास करत असून, यूपीएससीचा अभ्यास कसा सुरू करू?

- शुभम मोरे

प्रश्न : मी सध्या B.A. प्रथम वर्षाला असून, यूपीएससीचा अभ्यास कसा सुरू करू?

- अनिल पेट्टी

उत्तर : सर्वप्रथम यूपीएससीचे स्वरूप, अभ्यासक्रम जाणून घ्या. यासाठी ‘यशाचा मटामार्ग’ या लेखमालिकेतील लेखांचा तुम्हाला उपयोग होईल. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेचे गतवर्षीचे पेपर बघा. प्रश्नांवरून तुम्हाला एकंदरीत आयोगाला उमेदवारांकडून काय अपेक्षित आहे, हे लक्षा येण्यास मदत मिळेल. अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी NCERT ची पुस्तके उपयोगी ठरतील. यूपीएससी परीक्षेचा आवाका समजून घेतल्यास अभ्यासाची नेमकी दिशा ठरविता येते. यूपीएससीबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी ‘युनिक दृष्टी- तुकाराम जाधव’ हे यूपीएससी Planner अभ्यासावे. त्यातून यूपीएससीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन अधिकाधिक स्पष्ट होईल.

प्रश्न : मी आता बीएससीच्या दुसऱ्या

वर्षांत शिकत असून, माझे दहावीचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. पण आता मी इंग्रजी माध्यमात शिकत आहे. तरी मला यूपीएससी परीक्षेसाठी कोणते माध्यम योग्य ठरेल?

- विपुल गोसावी

प्रश्न : यूपीएससी परीक्षेसाठी माध्यम कसे निवडावे?

- सुभाष जायभागे, बीड

उत्तर : भाषा हे व्यक्त होण्याचे, आचार विचारांच्या आदान प्रदानाचे माध्यम आहे. आपण ज्या भाषेतून अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो ती भाषा परीक्षेचे माध्यम म्हणून निवडणे कधीही योग्य ठरते. यासाठी कोणत्याही एक विषयावर उदा. Life is beautiful यावर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत निबंध लिहून बघा. ज्या भाषेत तुम्ही निबंधासारख्या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत स्वत:बद्दल समाधानी असाल ती भाषा तुम्ही यूपीएससीकरिता निवडण्यास काहीही हरकत नाही. दोन्ही भाषांमध्ये यूपीएससीकरिता विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध असून, तुम्ही स्वत: ज्या भाषेबद्दल समाधानी असाल ती भाषा निवडण्यास प्राधान्य द्यावे.

प्रश्न : मी दहावीत शिकत असून, मला IPS व्हायचे आहे. दहावीच्या परीक्षेनंतर सुट्टीच्या काळात Polity laxmikant व NCERT वाचणे योग्य ठरेल का?

- इंदू जाधव

उत्तर : ही खूप चांगली बाब आहे की, आपण १० पासूनच यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात करण्याचा विचार करत आहात. NCERTचे वाचन ही यूपीएससीच्या अभ्यासातील सर्वांत महत्त्वाची बाब आहे. Laxmikant वाचण्याआधी राज्यशास्त्र विषयाचे NCERT वाचल्यास त्याचा अधिक उपयोग होताना दिसून येईल. NCERTमध्ये अभ्यासक्रमातील संकल्पना खूप सहज व सोप्या भाषेत समजावून सांगितलेल्या असतात. NCERTच्या बरोबर दररोजचे वृत्तपत्र वाचण्याची सवयही उपयोगी ठरेल. भारत सरकारद्वारे प्रकाशित होणारे ‘योजना’ व ‘कुरूक्षेत्र’ हे मासिकही वाचण्याची सवय उपकारक ठरेल.

प्रश्न : माझ्या पायाची शस्त्रक्रिया झाली आहे आणि पायामध्ये स्टील प्लेट व स्क्रू आहेत तर मी या परीक्षेसाठी पात्र ठरेल का? मला IPS व्हायचे आहे?

- विक्रम अनिल सुतार, सांगली

उत्तर : IPS साठीची पात्रता ही Army इतकी कडक नसते. यात उंची, वजन, छाती, BMI L 30 इ. बाबींचा विचार केला जातो. जरी पायाची शस्त्रक्रिया झाली असली तरी IPS करता तुम्ही पात्र ठरू शकता. तेव्हा आता याबद्दलचा विचार न करता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. गुणवत्ता यादीत चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावरच हवी ती सेवा मिळते. तेव्हा आता फक्त नि फक्त यूपीएससीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा.

प्रश्न : मी ग्रामीण भागातील आहे. मी यूपीएससीची तयारी मराठीतून केली तर चालते का? त्यासाठी पूर्वपरीक्षेकरीता यादी द्या.

- सुशांत टाटे

उत्तर : नक्कीच. तुम्ही यूपीएससीची तयारी मराठीतून केली तर चालते. मुख्य परीक्षेकरीता मराठी माध्यमातून जवळपास सर्व अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध आहे. परंतु, पूर्वपरीक्षेकरीता याला काही मर्यादा आहेत. पूर्वपरीक्षेकरीता एनसीईआरटी वाचणे गरजेचे असते. NCERT ची पुस्तके ही इंग्रजी व हिंदी माध्यमातूनच प्रकाशित होतात. NCERTची इंग्रजी अतिशय सोपी व विद्यार्थ्यांना आकलन होईल, अशी असते. पूर्वपरीक्षेकरीता १९७९ ते २०१७ पर्यंतच्या प्रश्नपत्रिका व पुस्तकांच्या

सविस्तर यादीकरीता Dr. Sushil Spotlight या टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. link - https://t.me/DrSushilSpotlight.

प्रश्न : पूर्वपरीक्षेकरीता उपलब्ध मराठी पुस्तके - अनुवादित सांगावीत.

- सचिन टोने

उत्तर : १. Indian Polity - अनु. के. सागर प्रकाशन.
२. आधुनिक भारताचा इतिहास -बिपीन चंद्रा - अनु. के. सागर प्रकाशन.
३. प्राचीन व मध्ययुगीत भारत - NCERT - अनु. के. सागर प्रकाशन.
४. भूगोल - माजिद हुसैन - अनु. के. सागर प्रकाशन.
५. चालू घडामोडी - युनिक बुलेटिन - युनिक अकादमी प्रकाशन.

प्रश्न : असे म्हणतात की मुक्त विद्यापीठात अंतिम वर्षांत विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जात नाही. याबाबत मार्गदर्शन करा.

- ओंकार जोशी, कोल्हापूर

उत्तर : मुक्त विद्यापीठ शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी व विद्यापीठ यांच्यात अधिक काळ व प्रत्यक्षात संबंध येत नाहीत. परंतु, मुक्त विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी वर्गांचे आयोजन करत असते. अशावेळी अभ्यासात रुची घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील शिक्षक नक्कीच यथायोग्य मदत करतात. तेव्हा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात, तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यूपीएससी पूर्वपरीक्षा - इतिहास : प्राचीन भारत

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षेतील GS या पेपरमधील इतिहास हा महत्त्वाचा घटक असून, गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार केल्यास १५-२० प्रश्न दर वर्षी या घटकावर विचारले जातात. इतिहासाचा विचार केल्यास त्यात एकूण चार उपघटक आपण पाहतो.

१.प्राचीन भारताचा इतिहास
२.मध्ययुगीन भारताचा इतिहास
३.आधुनिक भारताचा इतिहास
४. कला व संस्कृती

वरील उपघटकांचा विचार केल्यास सर्वाधिक प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावर विचारले जातात; परंतु २०१४ मध्ये ‘कला व संस्कृती’ या घटकावर एकूण ७ प्रश्न विचारले होते. तेव्हा आयोगाकडून याच पद्धतीने प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरही जास्तीचे प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लेखात आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील प्रमुख घटकांवर विचारलेले प्रश्न, प्रश्नांचे स्वरूप व त्यासाठीचे संदर्भपुस्तक याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.

प्राचीन भारताचा इतिहास (Ancient History)

हडप्पा संस्कृतीः हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या जीवनाचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक संदर्भ अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे जसे हडप्पा, मोहोंजदाडो, चाबुदारो, लोथल इ. व त्यांचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. उदा. मोहोंजदाडो येथील महास्नान गृह, लोथल येथील बंदर इ. हडप्पामधील कला जसे चित्रकला, भांडी बनविण्याची कला, त्याचबरोबर टेरोकोटा मूर्ती यावर प्रश्न विचारले जातात. हडप्पात सापडलेली नर्तिकेची मूर्ती वा पुजाऱ्याची मूर्ती, प्राण्यांचे संदर्भ, लिपी व भाषा यांचे संदर्भ अभ्यासणे उपकारक ठरते. प्रश्नाचा नमुना पाहू या.

Which of the following characterizes / characterize the people of indus civilization? (2013)

1. They Possessed great places & temples.
2. They worshipped both male and female deities.
3. They employed horse-drawn chariots in warfare.

Select the correct statement using the codes given below.

Q) 1 & 2 only B) 2 only c) 1, 2 and 3 d) None of the above

२. वेदिक काळ ः यात वेदिक समाज त्यातील कुटुंबव्यवस्था लग्नव्यवस्था व जातीव्यवस्था अभ्यासावी. सुरुवातीचा वेदिक काळ व नंतरचा वेदिक काळ यातील साम्य व भेद लक्षात घ्यावा. वेदिक काळात साहित्याचे महत्त्व असून यात वेद, उपवेद, उपनिषद, पुराण यांचे लिखाण व त्यावर आयोगाची प्रश्न विचारण्याची वृत्ती, वारंवार दिसून येते. वेदिक काळाशी संलग्न अशा भारतातील सहा तत्त्वज्ञानाच्या प्रणालींवर प्रश्न विचारलेले असून, त्यांचे उद्गाते व शिकवण पूर्वपरीक्षेकरिता महत्त्वाची आहे.

वेदिक काळातील प्रशासनातील, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनातील काही संज्ञा पुन्हा-पुन्हा विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. यात जन, पंचायतन, पुरोहित, ग्रामिणी, इरीपत्ती इ. संज्ञाचा समावेश होतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी या संज्ञा नीट समजून घ्याव्यात. कारण त्या समकालात कशासाठी वापरल्या जात होत्या, याबद्दल प्रश्न विचारला जातो. प्रश्नाचा नमुना पाहू या.

प्र. : The national motto of india, ‘satyamev jayate’ incribed below the emblem of india is taken from (2014)

a)Katha Upanishad b) chandogya Upanishad c) Aitareya Upanishad d) Mundaka Upanishad

३. बुद्ध व जैन धर्म ः दर वर्षी किमान एक प्रश्न यावर विचारण्याची आयोगाची वृत्ती सातत्याने दिसून येते. बुद्ध व जैन धर्म यांची शिकवण, तत्त्वज्ञान, साहित्य व धारणा यावर प्रश्न विचारले soul.
बऱ्याचदा प्रश्न पुन्हा विचारला जातानाही आपण बघतो. उदा. बुद्ध धर्माविषयीचा खालील प्रश्न २०१५ व २०१६ या दोन्ही वर्षी विचारलेला आहे.
Which of the following kingdoms were associated with life of the Buddha? (2015, 2016)

1. Avanti 2. Gandharva 3. Kosala 4. Magadha
Select the correct answer using the code given below.

a) 1, 2 and 3 b) 2 and 3 only c) 1, 3 and 4 d) 3 and 4 only.
२०१२ मध्ये गौतम बुद्धावर ‘भूमीस्पर्श मुद्रा’ यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नांचा स्त्रोत art culture चे NCERT असून, बऱ्याचदा त्याला विषयाशी संबंधित घटकांवर इतर उपघटकातून प्रश्न विचारलेले दिसून येतात.

४. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीः प्राचीन भारतात विज्ञान व तंत्रज्ञानावर जी काही प्रगती झाली होती त्यावर २०१२ मध्ये प्रश्न विचारलेला आहे. शब्दतंत्र, अवयव प्रत्यारोपण यासंबंधीचा प्रश्न विचारलेला आहे. शब्दतंत्राचा जनक असलेल्या सूश्रूताशी याचा संबंध असून प्राचीन भारताच्या old NCERT मध्ये यावर एक धडाही आहे. तो विद्यार्थ्यांनी अभ्यासावा.

५. प्राचीन भारताच्या इतिहासातील राजे व त्यांचे प्रशासनः प्राचीन भारताच्या इतिहासातील राजे व त्यांच्या प्रशासनावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. यात महाजनपदे, मौर्य व गुप्तकाळ यावर अधिक प्रश्न विचारलेले असून, राजकीय इतिहासाला तेवढेसे महत्त्व न देता तत्कालीन प्रशासन, सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक जीवन, त्यासंबंधीच्या संज्ञा इथे महत्त्वाच्या ठरतात; तसेच भारताबाहेरून भारताला भेट देणारे प्रवासी जसे खुथान त्संग यावर २०१३ मध्ये प्रश्न विचारलेला आहे.

प्राचीन भारताचा इतिहास संदर्भ पुस्तकेः

1. Ancient India NCERT (old) मराठीत अनुवाद के. सागर

2. Lucent GK – Ancient history हा घटक असावा.

प्राचीन भारताच्या इतिहासावर १९७९ ते २०१७ पर्यंत विचारलेल्या प्रश्नांसाठी drsushils spotlight या telegram चॅनेलला भेट द्या. या लेखात आपण प्राचीन भारताच्या इतिहासासंबंधी महत्त्वाचे घटक पाहिलेत, ज्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. जरी या घटकावर कमी प्रश्न विचारले जात असले, तरी त्याकडे दुर्लक्ष न करता विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या या घटकाला उचित न्याय दिल्यास त्याचा परिणाम गुणांवर नक्की दिसून येईल, यात कसलीही शंका नाही.

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणाचा अभ्यास

$
0
0

मयुरी भारदे

विद्यार्थी मित्रहो, गेले दोन-अडीच महिने आपण राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करायची, त्यात कोणते विषय अभ्यासायचे, काय वाचायचे, यावर चर्चा करत आहोत. एव्हाना तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेलच, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि सुरुवात केली नसेल, तर ती लवकरात लवकर करण्यासाठी शुभेच्छा! हे सांगण्यामागचा हेतू आहे, की तुम्ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा लक्षपूर्वक अभ्यास करत असाल, रोज वर्तमानपत्रही वाचत असाल, बातम्या बघत असाल, ‘सोशल मीडियावर’ होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होत असाल. या सगळ्या गोष्टींमध्ये वारंवार चर्चिला जाणारा मुद्दा असेल पर्यावरण संवर्धन!

अवकाळी पावसामुळे / गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक गेले. तापमान वाढ. हवामान बदल जैवविविधता प्रदूषण, सतत येणारे पूर किंवा दुष्काळ, अन्नटंचाई, लोकसंख्या विस्फोट इत्यादींविषयी अनेक चर्चा तुम्ही ऐकल्या, पाहिल्या किंवा वाचल्या असतील. हे सर्व विषय केवळ आपल गाव, राज्य किंवा देशासंबंधी सीमित नसून हे सर्व विषय पृथ्वी, हा ग्रह आणि त्याचे पर्यावरण, ज्याचा मनुष्य हा एक भाग आहे, याच्याशी निगडीत आहे. म्हणूनच केंद्रीय अथवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या नवीन (२०१३) अभ्यासक्रमात ‘पर्यावरण परिस्थितीकी’ हाही एक घटक आहे. आजच्या लेखामध्ये आपण या घटकाची माहिती करून घेणार आहोत.

पर्यावरण या घटकावर राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर क्र. १) आणि मुख्य परीक्षा (पेपर क्र. १ व ४) या दोन्ही परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. आपण या लेखात पूर्व परीक्षेबद्दल चर्चा करणार आहोत.

अभ्यासक्रमः पर्यावरण विषयक सामान्य मुद्दे पर्यावरण परिस्थितिकी जैवविविधता आणि हवामान बदल या विषयाचे विशेष ज्ञान असणे गरजेचे नाही.

अभ्यासक्रम वाचला असता, असा समज होण्याची शक्यता आहे, की खूप कमी आणि थोड्या वेळात उरकण्यासारखा हा विषय आहे; पण तसा गैरसमज करून घेऊ नका. केवळ एका ओळीत सामावणारा हा अभ्यासक्रम असला, तरी त्याचा आवाका भरपूर मोठा आहे आणि विषयाचे महत्त्वही!

या विषयाचे ज्ञान यासाठी महत्त्वाचे आहे कारण, प्रशासकीय सेवांचा मूळ उद्देश लोकांचा आणि समाजाचा विकास हे आहे. मग जेव्हा पृथ्वीवरील सर्वच मनुष्यजाती आणि जीवसृष्टीच्या ‘सरव्हायव्हल’चा प्रश्न उद्भवला असताना भारत-महाराष्ट्रातील विकासाचा कणा असणारी प्रशासकीय सेवा अलिप्त राहूच शकत नाही. सरकारी योजना राबविताना, बनविताना Think Globally, Act Locally हेच मार्गदर्शक तत्त्व असणे का गरजेचे आहे यामागची कारणमिंमासा आपल्याला हा विषय सांगतो.

गतवर्षीचे प्रश्न : हे सगळं खरं असलं, तरी परीक्षेचा अभ्यास कसा आणि कुठून करायचा हे आधी महत्त्वाचं! परीक्षाच पास झालो नाही, तर प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधीच आपल्याला मिळणार नाही. म्हणून परीक्षेमध्ये पर्यावरण विषयाचा आवाका कुठपर्यंत आहे, हे कळण्यासाठी गतवर्षीच्या काही प्रश्नांची उदाहरणे पाहू या.

प्रश्न १ : जर जागतिक तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे?

अ. वार्षिक पूर

ब. कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया.

क. शेती विभागात बदल.

ड. प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील.
१. अ, ब, क, ड
२. अ, ब, क
३. ब, क, ड
४. फक्त ड

प्रश्न २. भारतातील काही प्रजाती पुढीप्रमाणे

अ. वाघ ब. भारतीय चित्ता क. सॅलमेंडर ड. गीब्बन इ. माळढोक ई. दोनशिंगी गेंडा

वरीलपैकी कोणते/कोणत्या प्रजाती नष्ट झाली/झाल्या आहे आहेत?

१. फक्त ब २. फक्त क ३. फक्त ड ४. ब आणि ई

प्रश्न ३. जोड्या लावा

स्तंभ क्र. १ स्तंभ क्र. २

(पर्यावरणासंबंधी कायदे) (वर्ष)

१.पर्यावरण संरक्षण अॅक्ट १. १९९१
२.पर्यावरण स्नेही खुपट्टी योजना २. २०००
३.जैव औषधी कचऱ्यासंबंधी कायदे ३. १९८६
४.नगरपालिका घनकचरा
नियोजन कायदे ४. १९९८

प्रश्न ४. जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (२०११) खालीलपैकी कोणता देश सर्वांत अधिक कार्बन उत्सर्जन करतो?

१. यू. एस. ए. २. रशिया ३. भारत ४. चीन

या प्रश्नांवरून असे लक्षात येते, की पर्यावरणाचा अभ्यास करताना त्यातील मुलभूत संकल्पना आणि त्याबरोबरच सध्या घडत असणाऱ्या घटना, चालू घडामोडी यांची सांगड घालावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या लेखात आपण अभ्यासक्रमावर सखोल चर्चा करू. शिवाय या घटकाचा अभ्यास कुठून आणि कसा करायचा तेही पाहू.

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी : शंकांचे निरसन

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बरी

मी ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे. मात्र, २०१६ व २०१७ मध्ये मी यूपीएससीचा फॉर्म ‘जनरल कॅटेगिरी’मधून भरला होता. २०१८ मध्ये मी ओबीसी कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे. तर माझा फॉर्म स्वीकारला जाईल का?

- दत्ता गुरव

उत्तर : सर्वप्रथम एक बाब महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची कागदपत्रे. जर तुम्ही ओबीसी कॅटेगिरीमध्ये असाल व त्यासाठीची सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर आयोगाबद्दल तुम्ही निश्चिंत राहून अभ्यास करा. जरी तुम्ही २०१६ व २०१७ मध्ये जनरल कॅटेगिरीमध्ये पात्र फॉर्म भरला असेल तरी त्यासाठी आयोग तुमची अडवणूक करणार नाही. केंद्र सरकारचे ओबीसीच्या प्रमाणपत्रापेक्षा हे वेगळे असते. ते ई-सुविधा केंद्रातून तुम्ही काढू शकता.

यूपीएससी मुख्य परीक्षेकरिता उत्तर कसे लिहावे याबद्दल मार्गदर्शन करा?

- संदीप गायकवाड

उत्तर : यशाचा मटामार्ग या सदरातील (१२ फेब्रुवारी २०१८) लेख हा मुख्यपरीक्षेत उत्तर कसे लिहावे याबद्दलचा होता. यूपीएससीत प्रश्नात जे विचारले आहे ते सटीप, शब्दमर्यादेत व योग्य वेळेत लिहिणे अपेक्षित असते. लिखाणाचा नित्य सराव याकरिता उपयुक्त ठरतो. संबंधित लेख आपण Dr. Sushils Spotlight या Telegram channel वर वाचू शकता.

मी २०२० मध्ये पदवीधर होणार असून जून २०२० ला वयाचे २१ वर्षे पूर्ण होत आहेत, तर मी या वर्षी यूपीएससीला बसू शकते का?

- कल्याणी भोसले

उत्तर : तुम्ही पूर्वपरीक्षा देऊ शकता. मात्र, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना पदवी व वयाची २१ वर्षेग पूर्ण असायला हवीत. जर या वर्षी २०१८ वा २०१९ ला तुम्ही परीक्षा दिलीत तर तुमचे दोन अटेम्प्ट वाया जातील. यूपीएससीमध्ये खुला प्रवर्गग व इतर मागासवर्गीय यांना अनुक्रमे ६ व ९ अटेम्प्ट असतात. त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा. परंतु या वर्षी व पुढच्या वर्षी अटेम्प्ट न देणे तुमच्या हिताचे आहे.

प्रशासकीय सेवेत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना राजकारणी माणसे योग्य पद्धतीने काम करू देत नाहीत. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास कमी होतो. मला ‘आयएएस’ व्हायचे आहे व त्यासाठी मी तयारीही करत आहे. मला समाजासाठी चांगले काम करण्याची इच्छा आहे. राजकीय दबावतंत्राला कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन करा.

- विशाल निकम

उत्तरः प्रशासनाबद्दलची तुमची समज खूपच परिपक्व आहे. चांगली माणसं कुठेही असली तरी त्यांना कमी-जास्त त्रास इतरांकडून सहन करावा लागतो.

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार

आयएएस बनून प्रशासनात चांगले काम करताना राजकीय दबावतंत्र ही नित्याचीच बाब असते. परंतु राजकीय लोकांनाही विकास हवा असतो त्यासाठी सचोटी, धैर्य, उत्तरदायित्वाची जाण असणारे अधिकारीही त्यांना हवे असतात. जर प्रशासनात तुम्ही चांगले काम केलेल तर त्याची पोचपावती नागरिकांच्या समाधानी भावातून तुम्हाला मिळत असते. तेव्हा आतापासून याबद्दल अधिक विचार न करता आधी अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करून आयएएस बना. प्रशासनामुळे प्रशासकीय कारभार येत्या काळात अधिक पारदर्शी होईल. ज्यात तुम्ही समाजाकरिता खूप चांगले काम करू शकता. विवेकानंदानी दिलेली शिकवण सदैव लक्षात असे द्या. उठा, जागे व्हा! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

मला ‘यूपीएससी’चा अभ्यास करायचा आहे. त्याची सुरुवात कशी करावी?

- गणेश वारघडे

उत्तर : सर्वप्रथम यूपीएससीचे स्वरूप समजून घ्या. यासाठी ‘यशाचा मटामार्ग’ यात प्रकाशित झालेला लेख आणि ‘एनसीईआरटी’ची पुस्तके वाचण्यास सुरुवात करा. तसेच गेल्या वर्षीच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही अभ्यासल्यास अभ्यासाची योग्य दिशा ठरवता येते.

यूपीएससी पूर्वपरीक्षेला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी कशाप्रकारे तयारी करावी?

- अरुण एम.

उत्तर : सर्वप्रथम २०११ ते २०१७ च्या ‘जीएस’ पेपरचे विश्लेषण स्वतः करून १९७९ ते २०१७ चे आयोगाचे पेपर सोडवा. मूलभूत विषय जसे राज्यशास्त्र यावर २०१७ ला २२ प्रश्न आयोगाने विचारले आहेत. तेव्हा इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थव्यवस्था, भारताचे संविधान, विज्ञान व तंत्रज्ञान यातील मूलभूत संकल्पना समजून घ्या. चालू घडामोडींवर गेल्या तीन वर्षांपासून प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येत असल्याने गेल्या वर्षभरातील चालू घडामोडींचा अभ्यास चांगला करा. ‘यशाचा मटामार्ग’ यात पूर्वपरीक्षेवर प्रकाशित झालेले व येत्या काळात प्रकाशित होणारे लेख याबाबतीत तुम्हाला नक्कीच मदत करतील. अधिकाधिक प्रश्न सोडवणे हा रामबाण इलाज पूर्वपरीक्षेकरिता लक्षात असू द्या व त्यावर कृती करा.

यूपीएससीचा मराठीतून अभ्यासक्रम, त्यासाठीची मराठीतून पुस्तकांची यादी व एकंदर यूपीएससीचे स्वरूप याबाबत माहिती द्या?

- ज्ञानेश्वर देवकाते, चैतन्य लोंढे, अतुल भोपळे

उत्तर : यूपीएससी पूर्वपरीक्षेचा मराठीतून अभ्यासक्रम २७ फेब्रुवारीच्या लेखात दिलेला आहे. मुख्यपरीक्षेचा अभ्यासक्रम व त्यासाठीची संदर्भ पुस्तके वेळोवेळी मुख्यपरीक्षेसाठी प्रकाशित लेखात दिलेली आहेत. हे सर्व लेख बघण्यासाठी Dr. Sushils Spotlight या Telegram channal ला भेट द्या. त्यासाठीची link:http://t.meDrsushilsSpotlight. यूपीएससीचे एकंदर स्वरूप मराठीतून जाणून घेण्यासाठी तुकाराम जाधव लिखित ‘युनिक दृष्टी’ हे यूपीएससी प्लॅनर अभ्यासलेले उपकारक ठरेल.

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा : आधुनिक भारत : भाग १

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

मागील लेखांमध्ये आपण पूर्वपरीक्षेतील इतिहास या विषयातील इतर घटक जसे प्राचीन, मध्ययुगीन इतिहास व कला व संस्कृती यांचे विश्लेषण पाहिले आहे. इतिहास या विषयाचा पूर्वपरीक्षेसाठी विचार केल्यास सर्वाधिक प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावर विचारले जातात. त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास पूर्वपरीक्षेतील GSचे गुण वाढविण्यासाठी सूक्ष्मातिसूक्ष्म विश्लेषणाच्या आधारे अभ्यासणे विद्यार्थ्यांसाठी उपकारक ठरते. साधारणपणे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजेच १७०७ नंतर आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात मानली जाते.

आधुनिक भारताच्या इतिहासात खालील मुद्यांचा अभ्यास अपेक्षित आहे.

१) मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध व प्रादेशिक सत्तांचा उदय
२) युरोपियन सत्तांचा भारतात उदय
३) ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण व प्रशासकीय संरचना (१७५७-१८५७)
४) प्रशासकीय संघटना आणि सामाजिक व सांस्कृतिक धोरण
५) सामाजिक व धार्मिक चळवळी
६) १८५७ चा उठाव
७) १८५८ नंतरचे प्रशासकीय परिवर्तन
८) ब्रिटिश राजवटीचे आर्थिक परिणाम
९) नवभारताचा उदय - राष्ट्रीय चळवळ १८५८-१९०५
१०) राष्ट्रवादाची चळवळ १९०५-१९१८
११) गांधीजींचे नेतृत्व १९१९-१९४७
अभ्यासक्रमातील या उपघटकांचे विश्लेषण आपण विस्ताराने पाहूयात

* मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध व प्रादेशिक सत्तांचा उदय

यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे औरंगजेबानंतरच्या १७०७ नंतर सत्तेत येणाऱ्या मुघलांचा कालानुक्रम विचारला जाण्याची शक्यता अधिक असते. Choronlgical order of later mughals हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. उदा. बहादूर शहा १ - जहांदरशहा - फारूकसियार - महंमद शहा - अहमद शहा - आलमगीर II - शाह आलम II - अकबर II - बहादूर शहा II तसेच मुघल साम्राज्याच्या पतनाची कारणेही विचारली जाऊ शकतात.

प्रादेशिक सत्तांचा विचार केल्यास

१) बंगाल - प्लासीचे युद्ध (१७५७) व बक्झारचे युद्ध (१७६४), नवाब इ.
२) शीख - रणजितसिंह, शीख इंग्रज युद्ध
३) म्हैसूर - हैदर आली व टिपू सुलतान, म्हैसूर इंग्रज युद्धे
४) मराठी सत्तेचा उदय व अस्त, इंग्रज मराठा युद्ध, पेशवे इ.
या व्यतिरिक्त हैदराबाद अयोध्या, राजपूत इ. प्रादेशिक सत्तांचेही संदर्भ बघावेत. तसे पाहिले तर या घटकांवर विशेष प्रश्न विचारले जात नाही.
युरोपियन सत्तांचा भारतात उदय : यात पोर्तुगीज, इंग्रज, डच, डॅनिश, फ्रेंच इत्यादी युरोपियन सत्तांचा भारतात झालेला प्रवेश कालानुक्रमे करणे आवश्यक आहे. या सत्तांमधील महत्त्वाचे गर्व्हनर
उदा. फ्रंन्सिस्कोडी अलमेडा (पोर्तुगिरी) व त्यांचे कार्य व या सत्तांच्या उदयात योगदान विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. यात बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था आपण पाहू शकतो. प्रश्नांचा नमुना पाहुयात..

Q. With Reference to Pondicherry (Now Puducherry) Considor the following statemensts : (2010)
1. The first european power to occupy pondicherry were the portuguese.
2. The second european power to occupy pondicherry were the French.
3. The English never occupied pondicherry.
Which of the statements given above is / are conect?
a) I only b) 2 and 3 only c) 3 only d) 1, 2 and 3
Ans : a) 1 only

ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण व प्रशासकीय संरचना

ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचा विचार करताना त्यांचे वाणिज्य विषयक धोरण, संपत्तीचे वहन (Drain of wealth), वाहतूक व संपर्क साधनांचा विकास (रस्ते, रेल्वेमार्ग व टपाल व्यवस्था, जमीन महसुलाचे धोरण (जमिनदारी, रयतवारी व महलवारी) यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून येते. यावर आधारित प्रश्नांचा नमूना पाहुयात...

Q. With refernce to Ryotwari settlements, considor the fellowing statements.
1. The rent was paid direclty by the peasants to the Governments.
2. The Governments gave patts to the Ryots.
3. The lands were surveyed and assessed before being taxed.
which of the statements given above is / are correct? (2012)
a) 1 only b) 1 and 2 only c) 1,2 and 3 d) None
ans : c) 1, 2 and 3

ब्रिटिशांच्या प्रशासकीय संरचनेच्या विचार केल्यास त्यात नागरीसेवा, सैन्य, पोलिस, न्यायदानविषयक संघटना, कायद्याचे राज्य, कायद्यासमोरची समानता इ. बाबींचा अभ्यास यात महत्त्वाचा ठरतो. उदा. नागरीसेवेचे जनकत्व लॉर्ड कॉर्नवॉलिस यास द्यावे लागते. ब्रिटिशांनी लागू केलेले कायदे जसे - मॉर्ले मिंटो (१९०९); भारत सरकारचा कायदा (१९३५) इ.वर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून येते. यावरील प्रश्नाचा नमूना पाहुयात...

Q. The Montagne chelmsford proposal were related to (2016)
a) social reforms
b) educational reforms
c) reforms and police administration
d) constitutional reforms
ans : d

सामाजिक व धार्मिक चळवळी

भारतीय समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा यांना बाजूला सारून एक नवा आयाम देणाऱ्या चळवळींवर व त्यांच्या प्रणेत्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. उदा. २०१६ मध्ये ब्राह्मे समाज व भारतीय ब्राह्मे समाज यांच्याशी संबंधित केशवचंद्र सेन यांच्यावर प्रश्न विचारला आहे. या प्रश्नात विविध संस्था दिल्या आहेत व त्याचा संबंध तपासण्यास सांगितले आहे. प्रश्नांचा नमूना पाहूया...

Q. Consider the following :
1. Calcutta unitarian committee
2. Tasernacle of New dispensation
3. Indian Reform association
Keshas Charaka Sen is associated with the establishment of which of the above?
a) 1 and 3 only b) 2 and 3 only c) 3 only d) 1,2 and 3
ans : b

सामाजिक व धार्मिक चळवळीत ब्राह्मो समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी, सत्यशोधक समाज, दक्षिण भारतातील मंदिर प्रवेश चळवळी इ. या
अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. या घटकांवर प्रश्न विचारले जाण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. याचा अभ्यास करताना या चळवळींचे प्रणेते, संस्था स्थापनेचे वर्ष, त्या संस्थेचे वा चळवळीचे उद्दिष्ट अभ्यासणे महत्त्वाचे असते.

याचबरोबर विविध वृत्तपत्रे, प्रेससंबंधी कायदे, शिक्षण व्यवस्था इ. मुद्दे अभ्यासणेही गरजेचे असून, यावरही प्रश्न विचारले जातात. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी
नोट्स करीता Dr. Sushil’s spotlight या टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. पुढील लेखात आपण इतर मुद्दे व त्यांचे विश्लेषण बघू. आधुनिक भारताचा इतिहास आपण शालेय जीवनात चांगला अभ्यासलेला असतो. त्यामुळे खूप नवीन असा विषय हा नाही. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास या विषयाची तयारी सहज शक्य होते.

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी - शंका निरसन

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

प्र. : यूपीएससीची पूर्वपरीक्षा मराठीतून लिहिता येते का?

- लतिकेश प्रकाश खंडारे

उत्तर : यूपीएससीची पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) अशी असते. ज्यात लिखाण करावयाचे नसते. पूर्वपरीक्षेचा पेपर हा इंग्रजी व हिंदी अशा दोन भाषांमध्येच असतो व प्रत्येक प्रश्न या दोन्ही भाषेत छापलेला असतो. यूपीएससीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी ‘युनिक दृष्टी’ हे तुकाराम जाधव लिखीत यूपीएससी प्लॅनर वाचा व याआधी प्रकाशित ‘यशाचा मटामार्ग’ मधील लेख तुम्ही अभ्यासू शकता.

प्र. मी यूपीएससीची तयारी करीत आहे, पण एकाग्रचित्त राहू शकत नाही. कृपया एकाग्रचित्त राहण्यासाठी मार्गदर्शन करा?

- सचिन घुगे

उत्तर : Do not dwell in the past, do not dream of the future, concentrate the mind on the present moment असं का राहू शकत नाही याचं नेमकं कारण तुम्ही स्वत: शोधू शकता. त्या कारणाला दूर केलं की चित्त स्थिर होईल. तरीही तुम्ही खालील बाबी केल्यास त्याचा फायदा होईल.

१)यूपीएससी करण्याचा निर्णय स्वत:चा आहे की तो तुमच्यावर लादला गेला आहे याची शहानिशा करा.
२) अभ्यास किती वेळ केला यापेक्षा तो गुणवत्तापूर्वक करणे याला महत्त्व असतं.
३) अभ्यास करताना चित्त विचलित होत असेल तर ब्रेक घ्या. फिरून या किंवा गाणी ऐका. सलग खूप वेळ अभ्यास करणे स्वत:वर लादू नका.
४) प्राणायम व चिंतन (meditation) नियमित केल्यास चित्त स्थिर होण्यास नक्की मदत होईल.
५) चित्त विचलित होत असल्यास वाचन हे उच्चार करून करा म्हणजे विचारांची प्रक्रिया त्यांची गती मंदावते.

वरीलपैकी उपायांची अंमलबजावणी तुम्हाला उपकारक ठरू शकते.

प्र. मी या आधी यूपीएससीचे तीन Attempt दिले आहेत. मी वंजारी समाजातील असून केंद्रात OBC प्रवर्गात मोडतो, जर माझी महाराष्ट्र शासनामध्ये वर्ग एक मध्ये निवड झाली तर यूपीएससीसाठी मला OBC प्रवर्गातून संधी मिळेल की मला खुल्या प्रवर्गातून फक्त तीनच Attempt देता येतील.

- महेश दराडे

उत्तर : नक्कीच तुम्हाला OBC प्रवर्गातूनच गृहीत धरले जाईल. Creamy layer साठी वडिलांचे उत्पन्न गृहित धरले जाते, उमेदवाराचे नाही.

प्र. मी आता १२वीची (विज्ञान) शाखेतून परीक्षा दिली आहे. पुढे मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. तर मी कोणते क्षेत्र निवडू जेणेकरून मला पहिल्या प्रयत्नांत यश मिळेल?
उत्तर : आत्तापासून तुम्ही यूपीएससी समजून घेतली व त्यानुसार अभ्यास केलात तर तुम्ही नक्कीच पहिल्या प्रयत्नात यश मिळवू शकता.
पदवीची विशेष अशी भूमिका यूपीएससी उत्तीर्ण होण्यात नसते. परंतु जर मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला तर तुम्हाला पूर्णवेळ अभ्यास करता येईल. कला शाखेतील विषय हे यूपीएससीला अनुरूप असतात. परंतु तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही पदवीसाठी शाखा निवडल्यास ते उत्तम राहील.

प्र. मला यूपीएससी पूर्व, मुख्य व मुलाखतीसाठी संदर्भ पुस्तकांची द्यावी.

- संतोष आगबोटे

प्र. यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी पेपर १, २, ३ व ४ ला कोणती पुस्तके वाचू?

- आर. एस. जगताप

उत्तर : यूपीएससी पूर्व मुख्य व मुलाखतीचे एकंदरीत स्वरूप, अभ्यासक्रम व संदर्भपुस्तके आपण वेळोवेळी ‘यशाचा मटा मार्ग’मध्ये प्रकाशित लेखात दिलेले असून यासाठी Dr. Sushils Spotlight या टेलिग्राम चॅनेलवर आपण ते लेख वाचू शकता. त्याची link : https://t.me/DrsushilsSpotlight

प्र. यूपीएससीमध्ये NT साठी राखीव जागा आहेत का?

- विपुल गोसावी

उत्तर : यूपीएससी करीता तुम्हाला केंद्राचे Caste Certificate काढावे लागते. त्यानुसार खुला प्रवर्ग, OBC, SC, ST यांच्या जागांचे वितरण असते. तेव्हा केंद्रातील वर्गानुसार तुम्हाला आरक्षण मिळू शकते.

प्र. मी अकरावीत शिकत असून NCERT पुस्तकाचे व इंग्रजी पेपरचे वाचन सुरू केले असून या व्यतिरिक्त अजून काय केले पाहिजे?

- सुयोग जोशी

उत्तर : ‘IAS@21’ च्या वाटेने तुमचा प्रवास सुरू झाला असून NCERT तील संकल्पना नीट समजून करण्यास हरकत नाही. NCERTतील जो Topic वाचला त्यावर नेमका कसा प्रश्न यूपीएससी विचारते हे समजून घेतल्यास अधिक प्रभावी तयारी होईल. DrSushils Spotlight या Telegram चॅनेलला Follow करा, म्हणजे यूपीएससी संबंधित अभ्याससाहित्य व महत्त्वाच्या सूचना वेळोवेळी मिळत राहतील.

प्र. यूपीएससीत चांगल्या Rank ने उत्तीर्ण होण्यास strategy काय असावी?

- विशाल निकम

उत्तर : ‘ओले मुळ भेदी खडकाचे अंग। अभ्यासाशी संग कार्यसिद्धी।।’ यूपीएससीचे एकंदर स्वरूप समजून घ्या, अभ्यासक्रमानुसार अभ्यास करा. MCQ व लिखाणाचा सराव अधिकाधिक करणे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका, मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न यांचा अभ्यास करणे. यातून यशाची हमी नक्कीच मिळू शकते. सकारात्मक दृष्टिकोन स्वत:च्या कष्टावर विश्वास असणे हेही महत्त्वाचे असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युपीएससी पूर्वपरीक्षा : भारतीय राज्यव्यवस्था

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

युपीएससी पूर्वपरीक्षेतील सर्वांत महत्त्वाच्या विषयांपैकी एक म्हणजे भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया होय. भारतीय राज्यव्यवस्थेला (Indian Polity) समजून घेणे स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचे ठरते; कारण या विषयाला पूर्व व मुख्य परीक्षेत गुणांचा विचार करता अधिक महत्त्व आयोगाने दिलेले दिसून येते. सन २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिकांचा विचार केल्यास १५ ते २० टक्के प्रश्न हे भारतीय राज्यव्यवस्थेवर विचारले जातात. सन २०१७ च्या पूर्वपरीक्षेचे उदाहरण घेतल्यास १०० पैकी तब्बल २२ प्रश्न या विषयावर विचारलेले आहेत. यावरूनच या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते.

या विषयावर प्रश्न विचारताना तीन पद्धतीने प्रश्न विचारला जातो.

१) मूलभूत संकल्पना व संविधानातील तथ्यांवर आधारित प्रश्न.

Q. for election to the Lok Sabha, a nomination paper can be filed by (2017)
a) anyone residing in India
b) a resident of the constituency from which the election is to be contested.
c) any citizen of India whose name appers in the electoral roll of a constituency
d) any citizen of India

Ans - (c)

२) चालू घडामोडींशी संबंधित विषयातील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न.

Q. With referecne to the Parliament of India, consider the following statements :
1) A private member's bill is a bill persented by a member of parliament who is not elected buy only nominated by the persident of India.
2) Recently, a private members bill had been passed in the parliament of India for the first time in its history.
which of the statments qiven above is/are correct?
a) 1 only b) 2 only c) Both 1 and 2 d) Niether 1 or 2

Ans - (d)

३) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत संकल्पनांबाबतचे तात्त्विक प्रश्न असे प्रश्न प्रामुख्याने २०१७ च्या पूर्वपरीक्षेच्या पेपरमध्ये दिसून आले आहेत. अशा प्रश्नांच्या उत्तराबाबत तज्ज्ञांमध्येही मतभेद दिसून आले आहेत.

प्र. Right to vote and to be eleted in India a
a) fundamental Right b) Natutral right
c) constitutional right d) Legal right

भारतीय राज्यव्यवस्था (Indian Polity) या विषयाच्या अभ्यासक्रमात खालील घटकांचा समोवश होतो.

राज्यघटना : ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनेची निर्मिती, प्रमुख वैशिष्ट्ये, सरनामा, मूलभूत हक्क, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, घटनादुरुस्ती व राज्यघटनेची मूलभूत संकल्पना.

शासनपद्धती : संसदीय प्रणाली, संघराज्यीय प्रणाली, केंद्र-राज्य संबंध, आंतरराष्ट्रीय संबंध, आणीबाणीविषयक तरतुदी इ.

केंद्र शासन : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, कॅबिनेट समित्या, संसद, संसदीय समित्या, संसदीय मंच, संसदीय गट, सर्वोच्च न्यायालय, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक सक्रियता, जनहित याचिका इ.

राज्य शासन : राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, राज्य विधिमंडळ, उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालये, जम्मू व काश्मीर विशेष दर्जा, काही राज्ये विशेष तरतुदी इ.

स्थानिक शासन : पंचायती राज व नगरपालिका

संघराज्य प्रदेश व विशेष क्षेत्रे : संघराज्य प्रदेश व अनुसूचित व आदिवासी क्षेत्रे.

घटनात्मक संस्था : निवडणूक आयोग, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, वित्त आयोग, अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, विशेष अधिकारी, भारताचा महालेखापरीक्षक, भारताचा महान्यायवादी राज्याचा महाधिवक्ता.

घटनाबाह्य संस्था : निती आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग, केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय अन्वेषण विभाग, लोकपाल व लोकायुक्त.

इतर घटनात्मक बाबी : सहकारी संस्था, अधिकृत भाशा, लोकसेवा, न्यायाधिकरणे, सरकारचे अधिकार व दायित्व, हिंदी भाषेतील अधिकृत राज्यघटना.

राजकीय अभिसरण : राजकीय पक्ष, निवडणुका, पक्षांतर विरोधी कायदा, दबावगट राष्ट्रीय एकात्मता, परराष्ट्र धोरण.

राज्यघटनेची कार्यपद्धती : राज्यघटनेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोग.

गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे अधोरेखित होणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी :

दर वर्षी विचारले जाणारे प्रश्न जर विषय ‌नीट समजून घेतला असेल तर विद्यार्थी सोडवू शकतो.

काही विशिष्ट घटकांवर पुन्हा पुन्हा त्याच धाटणीचे प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते

प्रश्नांत उत्तरासाठी दिलेले सर्व पर्याय नीट वाचून समजून घ्यावेत.

सर्व कलम पाठ करण्याची गरज नसते. कलम १२ ते ५१ इतकी कलमे सोडली तर महत्त्वाची कलमे माहिती असणे पुरेसे ठरते.

खूप खोलवरच्या तथ्यांवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येत नाही.

खूप महत्त्वाचे घटक, ज्यावर वारंवार आयोगाची प्रश्न विचारण्याची वृत्ती दिसून येते :

मूलभूत हक्क, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांची कर्तव्ये, सरनामा, संसदेतील तीन समित्या - लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती इ., संसदीय कामकाजातील प्रस्तव (motion), जसे अविश्वास प्रस्ताव, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, धन विधेयक, सर्वसमान्य विधेयक, घटनादुरुस्ती विधेयक - केंद्र व राज्यशासन, बजेटसंबंधी अधिकार, लोकसभा व राज्यसभा, राष्ट्रपती व राज्यपाल यांचे विशेषाधिकार, न्यायव्यवस्था व महत्त्वाचे खटले, स्थानिक स्वराज संस्था, ७३ व ७४ घटनादुरुस्ती इ. घटकांवर आयोगाने प्रश्न विचारले आपण पाहतो.

संदर्भ पुस्तके :

१. indian polity - M. laxmikant (मराठीत अनुवाद के. सागर)
२. NCERT - constitution at work
३. India year book यातील राज्यघटनेचा धडा.
वरील पुस्तकांच्या e-copy करिता Dr.sushils spotlight या टेलिग्राम चॅनेलला भेट द्या.
४. भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया : तुकाराम जाधव
महत्त्वाचे : राज्यसेवा २०१८ च्या पूर्वपरीक्षेसाठी गेल्या वर्षभरातील चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी Dr.Sushils spotlight या U-tube चॅनेलला भेट द्या. यासंबंधीची लिंक विद्यार्थ्यांना Dr.Sushils spotlight या telegram चॅनेलवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
link : http//t.me/dr.SushilsSpotlight

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय राज्य व्यवस्था-भाग २

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

मागील लेखात आपण ‘भारतीय राज्य व्यवस्था’ या विषयातील अभ्यासक्रमातील घटक, त्यांचे महत्त्व, प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात हे पाहिले होते. या लेखात अभ्याक्रमानुसार प्रश्नांचे प्रकार पाहू या.

१. राज्यघटना : यात प्रामुख्याने सरनामा, मूलभूत हक्क, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, घटनादुरुस्तीचे प्रकार, मूलभूत संकल्पना यावर सरळ प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचा नमुना यात पाहु या.

प्र. In the constitution of india, promotion of international peace and security is included in the
१. Preamble to the constitution
2. Directive principle of state policy
3. Fundamental duties
4. Ninth schedule
Ans. (b)

प्रामुख्याने वरील घटकांमधील तथ्य विद्यार्थ्यांनी चांगले अभ्यासावेत. कारण कलम १२ ते कलम ५१ अ यावर वारंवार प्रश्न विचारण्याची आयोगाची प्रवृत्ती दिसून येते. सरनामा व त्याच्याशी संबंधित घटनादुरुस्ती उदा. ४२ वी घटनादुरुस्ती यावर प्रश्न विचारले आपण पाहू शकतो.

२. शासनपद्धती : यात संसदीय प्रणाली, संघराज्याची प्रणाली यांचा नेमका अर्थ ही संकल्पना आपण कोठून व का घेतली हे समजून घेणे गरजेचे असते. केंद्र व राज्य संबंध त्याबद्दलच्या समित्या; तसेच कर्नाटक राज्याला हवा असणारा स्वतंत्र ध्वज, त्याचबरोबर जम्मू व काश्मीरबद्दलचे कलम ३७० व कलम ३५ अ अशा चालू घडामोडींचा अभ्यास परीक्षेत उपकारक ठरतो. मालदिवमध्ये आणीबाणी लागू झाली असता विद्यार्थ्यांनी भारताच्या संदर्भात कलम ३५२, कलम ३५६, कलम ३६५ व कलम ३६० चा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.

३. केंद्र शासन : या घटकात प्रामुख्याने ‘भारतीय संसद’ यावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात. यात संसदीय प्रक्रिया व संसदेतील समित्यांवर प्रश्न विचारण्याची अयोगाची वृत्ती वारंवार दिसू येते. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती याची निवड प्रक्रिया; तसेच त्यांचे अधिकार, राष्ट्रपतीबाबत विशेषाधिकार विचारले जातात. न्यायपालिका व संसद यांच्यातील परस्पर संबंध अभ्यासणे उपकारक ठरते. प्रश्नांचा नमुना पाहु या.

प्र. Which one of the following is the longest committee of the parliment?
a) The committee on public accounts
B) The committee on Estimates
C) The committee on public undertakings
D) The committee on petitions
Ans (b)

प्र. The power to increase the number of judges in the Supreme court of india is voted in
a) The president of india
B) The parliament
C) The chief justice of india
D) The law commission

४. राज्य शासन : यात विशेषत्वाने राज्यपालाच्या विशेषाधिकारासंबंधी प्रश्न विचारले जातात; तसेच उच्च न्यायालय, न्यायाधीशांच्या नेमणूका, जम्मू व काश्मीर व इतर राज्याबद्दलच्या विशेष तरतुदी यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते.

प्र. Which of the following are the discreationary powers given to the Governer of the state?
1. Sending a report to the president of india for imposing the presidents rule
2. Appointing ministers
3. Reserving certain bill passed by the state legislature for consideration of the president of india
4. Making the rule to conduct the business of the state govt.

Select the correct answer using the code given below
a) 1 and 2 only
b) 1 and 3 only
C) 2, 3 and 4 only
D) 1, 2, 3 and 4 only
Ans (b)

५) स्थानिक शासन : यात ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती व पंचायती राज, नगरपालिका यांवर प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो.

प्र. The Government enacts the panchyat extension to Scheduled Areas (PESA) Act in 1996. Which one of the following is not identified as its objective?
A) To previde self governance
B) To recognise traditional rights
C) To create autonomous regions in the tribal areas
D) To free tribal people from exploitation
ans (C)

६) घटनात्मक व घटनाबाह्य संस्था : यात कोणती संस्था घटनात्मक व कोणती घटनाबाह्य आहे, त्या संस्थेची स्थापना ही कायद्यानुसार आहे, की कायद्याशिवाय आहे. त्यांचे कार्य, त्यातील नेमणुका त्यांचा कालावधी याचा अभ्यास करणे गरजेचे असते. उदा. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो व जर अध्यक्षाला पदावरून काढायचे असेल, तर कोण काढू शकतो, असे प्रश्न विचारले जातात. भारताचा महालेखापरीक्षक, भारताचा महान्यायवादी यांच्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून येते.

७) इतर घटनात्मक बाबी जसे भाषा यात कलम ३५०, ३५० अ, ३५० ब यांच्यावर प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो.

८) चालू घडामोडींवर भारतीय राज्य व्यवस्था या विषयात प्रश्न विचारण्याची वृत्ती आयोग स्पष्टपणे पेपरमधून दाखवत असतो. तेव्हा चालू घडामोडींकरिता DrSushils Spotlight या Telegram व U-Tube चॅनेलला भेट द्या.

भारतीय राज्य व्यवस्था (indian policy) हा विषय वारंवार वाचला व समजून घेतला, तरच चांगला लक्षात राहतो; तसेच या विषयाच्या MCQ करिता एम. लक्ष्मीकांत यांचे पुस्तक वापरल्यास विद्यार्थ्यांना या विषयातील मूलभूत संकल्पना प्रश्नाच्या आधारे समजून घेणे, अधिकाधिक सुकर होईल. तेव्हा Revision व MCQ सोडवणे ही या विषयासाठी व पूर्वपरीक्षेकरीता यशाची गुरुकिल्ली आहे.

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यशाचा मटा मार्ग

$
0
0

दहावीची चिंता नको!

नुकतीच दहावीची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात आली आहेत. हा बदललेला अभ्यासक्रम नेमका कसा आहे, तो तयार करताना काय विचार करण्यात आला आहे, विद्यार्थ्यांची अभ्यास कसा करावा, नवी मूल्यमापन पद्धत कशी असेल, कृतीवर भर देणारा अभ्यासक्रम म्हणजे काय, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुढाकार घेतला आहे. अभ्यासक्रमाबाबत उलगडा होण्यासाठी तो तयार करणाऱ्या विषयतज्ज्ञांकडून मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये विषय समितीचे सदस्य मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी - अनुजा चव्हाण

इंग्रजी - अखिल भोसले

संस्कृत - जगदीश इंदलकर

गणित व भूमिती - प्राजक्ती गोखले आणि सुवर्णा देशपांडे

विज्ञान - श्वेता ठाकूर

कधी : रविवार, ८ एप्रिल

कुठे : महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, अपना बाजारजवळ, नेहरू रोड, मुलुंड (प.).

वेळ : सायं. ५ ते रा. ८ वा.

(प्रवेश सर्वांसाठी खुला. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी शंकांचे निरसन

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

'यूपीएससी'ची परीक्षा देण्यासाठी पदवीच्या परीक्षेत किमान किती गुण असावे लागतात. सर्व प्रवर्गानुसार माहिती द्या?

- राहुल जंगम

'यूपीएससी'ची परीक्षा देण्यासाठीची पात्रता ही पदवीपरीक्षेत गुणांवर अवलंबून नसते. उमेदवार पदवीधारक असावा हीच पात्रता आहे. गुणांचा निकष 'यूपीएससी'ने गृहित धरलेला नाही.

'यूपीएससी'मध्ये अपगंत्वासाठी वयाची अट किती आहे?

- धीरज गायकवाड

'यूपीएससी'मध्ये अपंगत्वासाठी खुल्या प्रवार्गापेक्षा १० वर्षांपर्यत वयोमर्यादा शिथिल केली जाते. खुल्या प्रवार्गासाठी ३२ वर्षे ही वयोमर्यादा आहे. म्हणजेच ४२ वर्षांपर्यंत ही वयोमर्यादा शिथिल होऊ शकते.

'यूपीएससी'करिता वैकल्पिक विषय भूगोलांची तयारी स्वत: अभ्यास करून होऊ शकते का? त्यासाठी नियोजन कसे करावे?

- आपली शै‌क्षणिक संस्कृती अर्जुनाबरोबर एकलव्याचेही संदर्भ घेऊन येते. स्वत: अभ्यास करूनही आपण यूपीएससी उत्तीर्ण करू शकतो. परंतु, माझ्या मते वैकल्पिक विषयासाठी मार्गदर्शन उपयोगी ठरते. विषयाचा समग्र आवाका कमी वेळेत योग्य दिशेने घेता येणे मार्गदर्शनामुळे सहज सोपे होते.

स्वत: अभ्यास करताना खालील बाबींवर लक्ष्य केंद्रित करा

- सर्वप्रथम भूगोलाचा अभ्यासक्रम समजून घ्या.

- गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांवरून आयोग कशाप्रमारे प्रश्न विचारतो ते समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

- भूगोल या वैकल्पिक विषयाची यूपीएससीसाठीची पुस्तके व नोट्स यांचे मूलभूत संकल्पना समजून वारंवार वाचन झाले पाहिजे.

- लेखाणाचा नित्य सराव गरजेचा आहे. आपण लिहिलेली उत्तरे योग्य मार्गदर्शकाकडून तपासून घेणे.

- नकाशा हा भूगोलाचा आत्मा आहे. आकृत्या व नकाशे हाताने नोट काढण्याचा सरावही नियमित झाला पाहिजे.

- भूगोल या वैकल्पिक विषयासाठी एखादी 'टेस्ट सीरिज' लावून मुख्य परीक्षेपूर्वी सराव होणे गरजेचे आहे.

मला यूपीएससी प्रश्नपत्रिकेची पीडीएफ हवी आहे. प्रश्नपत्रिका फक्त हिंदी किंवा इंग्रजीत असते का?

- शिवहरी गाडेकर

'यूपीएससी'च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न हा दोन्ही भाषेत छापलेला असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्न इंग्रजीतसुद्धा असतो व हिंदीतूनही छापलेला असतो. प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्या. www.wpsc.gov.in.

'यूपीएससी'बद्दल माहिती हवी आहे?

- चैतन्य लोंढे

तुकाराम जाधवलिखित यूपीएससी प्लॅनरमध्ये तुम्हाला यूपीएससीबद्दल सर्व माहिती मिळेल. तसेच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'यशाचा मटा मार्ग' या सदरातील सर्व लेख नजरेखालून घातलेत की एकंदर यूपीएससीबद्दलची कल्पना स्पष्ट होईल. हे लेख वाचण्यासाठी Disushils spotight या telegram channel लाही तुम्ही भेट देऊ शकता. link-t.me/DrSushilsSpotlight

'यूपीएससी'साठी रीव्हिजन कशाप्रकारे करायला हवी? समजा ८-१० पुस्तके आहेत. एकाचे अगोदर करायचे की सर्व झाल्यावर पहिल्याचे करावे?

- रामदास व्हरकाटे

आपण जेव्हा कुठलेही पुस्तक वाचतो तेव्हा त्याची रीव्हिजन येत्या ८ दिवसांत होणे गरजेचे असते. जर तुम्ही सर्व पुस्तके वाचून मग पहिले पुस्तक पुन्हा वाचायला घेतले तर ते पुस्तक तुम्ही पहिल्यांदा वाचत आहात असे तुम्हाला वाटेल. तेव्हा रीव्हिजन ४ ते ८ दिवसांत होणे गरजेचे असते. जे वाचले आहे त्यावर 'एमसीक्यू' सोडवून पाहणे. मुख्य परीक्षेसाठी लिखाण करून पाहणे गरजेचे असते. असे केल्याने नेमके स्वत:ला त्या विषयांसंबंधी किती व कसे आकलन झाले आहे. ते आपणास कळते.

मी दोन वर्षांपासून 'एमपीएससी'ची तयारी करतो. तीन जूनला होणारी यूपीएससी देणार असून, त्याकरिता कोणत्या विषयांवर अधिक लक्ष्य केंद्रीत करू म्हणजे फायदा होईल?

- सचिन माने

तुम्ही दोन वर्षांपासून 'एमपीएससी'चा अभ्यास करीत आहात. त्यामुळे विषयांची ओळख तुम्हाला खूप चांगली असेल. एमपीएसी व यूपीएससी यातला मुख्य फरक म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत होय. उदा. एमपीएससीच्या परीक्षेत 'मानव विकास अहवालात' भारताचे स्थान कितवे असा प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक असते. तर यूपीएससी मानव विकास अहवाल कोण प्रकाशित करते हा प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक आहे.

गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका व यशाचा मटा मार्ग यात पूर्वपरीक्षेसाठी प्रकाशित लेख यावरून प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या. म्हणजे यशाचा मार्ग नक्की सापडेल.

मी यूपीएससी परीक्षेसाठी मराठी माध्यम घेऊ शकते का?

- आशू वेलणकर

हो, नक्कीच तुम्ही मराठी माध्यम परीक्षेसाठी निवडू शकता. यासाठी पूर्वपरीक्षेचा अर्ज भरताना तसे तिथे नमूद करावे.

मी आता बी कॉमच्या तिसऱ्या वर्षाला आहे. माझी आर्थिक परिस्थिती क्लास लावण्यासारखी नाही. मला मार्गदर्शन करा.

- राजेश सोनवणे

स्वत: अभ्यास करूनही आपण उत्तीर्ण होऊ शकता. तसेच महाराष्ट्र सरकारद्वारे 'यशदा'सारख्या संस्थांमध्ये मोफत स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळते. यासाठी तुम्हाला या संस्थांच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. Dr. Sushils Spotlight हे टेलिग्राम चॅनेल स्पर्धा परीक्षेसाठी नियमित नोट्स व आयोगाच्या बातम्यांसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. यशाचा मटामार्ग या सदरातील लेख तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआय – एसटीआय – एएसओ पूर्वपरीक्षा चालू घडामोडी

$
0
0

पीएसआय - एसटीआय - एएसओ पूर्वपरीक्षा : चालू घडामोडी

या लेखात आपण पीएसआय-एसटीआय - एएसओ यासाठीच्या पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विश्लेषणाद्वारे समजून घेणार आहोत. नवीन अभ्यासक्रमानुसार एकूण ११ प्रश्नपत्रिका उपलब्ध असून, प्रत्येक पेपरमध्ये १५ ते १६ प्रश्न हे चालू घडामोडींवर विचारलेले आहेत. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चालू घडामोडींचा अभ्यास किती महत्त्वपूर्ण आहे ते यावरून स्पष्ट होते. सर्वप्रथम आपण पूर्व परीक्षेनुसार विचारलेले प्रश्न पाहूयात-

१. संयुक्त पूर्व परीक्षा (२६ जुलै १०१७) - १५ प्रश्न

२. पोलिस उपनिरीक्षक (१२ मार्च १०१७) - १६ प्रश्न

३. विक्रीकर निरीक्षक (२९ जाने १०१७) - १५ प्रश्न

४. सहायक पूर्व परीक्षा (२६ जुलै १०१६) - १५ प्रश्न

५. विक्रीकर निरीक्षक (१९ जून १०१६) - १६ प्रश्न

६. सहायक पूर्व परीक्षा (५ जुलै १०१५) - १५ प्रश्न

७. विक्रीकर निरीक्षक (१ फेब्रुवारी १०१५) - १३ प्रश्न

८. सहायक पूर्व परीक्षा (१५ जून १०१४) - १६ प्रश्न

९. पोलिस उपनिरीक्षक (१८ मे १०१४) - १५ प्रश्न

१०. विक्रीकर निरीक्षक (२२ डिसें १०१३) - १७ प्रश्न

११. सहायक परीक्षा (२९ सप्टेंबर १०१३) - १५ प्रश्न

प्रश्न विचारताना आयोगाने राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक क्रीडा, व्यक्ती, पुरस्कार, समिती, आंतरराष्ट्रीय व विज्ञान व तंत्रज्ञान इ. सर्व विषयांवर प्रश्न विचारलेले आहेत. परंतु, एक बाब अधोरेखित करावीशी वाटते की खालील बाबींवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून येते.

१. व्यक्ती

२. क्रीडा

३. आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी इ.

२०१७ मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचा आढावा घेऊयात. प्रश्नाचा नमुना -

प्र. नोव्हेंबर २०१६ मध्ये हँड इन हँड २०१६ या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि ...या देशांत पार पडली?

अ)रशिया ब) अमेरिका क)चीन ड)जपान

उत्तर (क) चीन

संरक्षण विषयक लष्करी कवायतींवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती राज्य सेवा पूर्वपरीक्षेतही नेहमी दिसून येते. यासाठी भारताच्या हवाईदल, नौदल व पायदळ या लष्करी कवायती अभ्यासणे उपकारक ठरते. पुढील प्रश्न पाहूयात.

प्र. भारतात गोवा येथे भरविल्या गेलेल्या ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१६मध्ये पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकाविला?

अ) रौफ ब) डॉटर क)मेलो मड ड)रारा

उत्तर (ब) डॉटर

चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्ती व पुरस्कार यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती नित्य नियमाने दिसून येते. पोलिस उपनिरीक्षक २०१७ च्या पूर्व परीक्षेत भूतपूर्व अभिनेती साधना शिवदासानी यासंबंधी प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो. तेव्हा जानेवारी २०१७ पासूनच्या चित्रपट सृष्टीतील महत्त्वाच्या व्यक्ती ज्या पुरस्कार, मृत्यू, व इतर कोणत्याही बाबींमुळे चर्चेत आहेत त्या माहिती पाहिजेत. उदा.

१. श्रीदेवी - मृत्यू, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राष्ट्रीय पुरस्कार - मॉम चित्रपट

२. शशी कपूर - मृत्यू

व्यक्ती ही इतर क्षेत्र जसे क्रीडा, राजकारण, अर्थकारण ,साहित्य इ. क्षेत्रातही अभ्यासणे गरजेचे आहे. कारण अशा व्यक्तींवर आयोगाद्वारे वारंवार प्रश्न विचारले जातात हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांवरून स्पष्ट होते. पुढील प्रश्नांचा नमुना पाहूयात-

प्र. खालील विधाने विचारात घ्या.

१.'इस्त्रो' या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच १०४ उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला.

२. १०४ उपग्रहांपैकी फक्त तीन उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते.

वरीलपैकी कोणते ती विधाने बरोबर आहेत?

अ) फक्त १ ब) फक्त २ क)१ आणि २ ड) वरीलपैकी नाही.

उत्तर क)१ आणि २

हा प्रश्न विचारला जाणे साहजिकच होते, कारण भारत हा एकाच वेळी इतके सर्व उपग्रह सोडणारा जगातला पहिला देश बनला होता . अशा घटनांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता ९९.९९ टक्के असते. विज्ञान व तंत्रज्ञान यातील तंत्रज्ञान या घटकावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिवसेंदिवस वाढलेली दिसून येते. पुढील प्रश्नांचा नमुना पाहूया-

प्र. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता.?

अ) मिताली राज ब) झुलान गोस्वामी क)लतिका कुमारी ड)स्मृती मांधना

उत्तर अ) मिताली राज

क्रीडा या घटकांवरही मोठय़ा प्रमाणात प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा झुलान गोस्वामी या क्रीडापटूवरही प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी पूर्वपरीक्षेत राष्ट्रकुल क्रीडा २०१८ वर प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक आहे.

अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास विविध प्रकल्प जसे 'भारतमाला' यावर संयुक्त पूर्व परीक्षेत २०१७ मध्ये प्रश्न विचारलेला आहे. विविध योजना समित्या यांवर प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो. अर्थव्यवस्थेसंबंधीचा प्रश्नाचा नमुना पाहूयात-

प्र. कोणत्या बँकेला आसोचामचा SME LENDING साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.?

अ)कॅनरा बँक ब) स्टेट बँक ऑफ इंडिया क)विजया बँक ड) बँक ऑफ इंडिया

उत्तर क)विजया बँक

या प्रश्नावर आगामी परिक्षेत भारतातील systematic important bank असा दर्जा मिळालेल्या ICICI, SBI, HDFC यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशाप्रकारे आपण विविध घटकांवर आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न पाहिलेत. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे-

१. गेल्या वर्षभरातील चालू घडामोडींचा अभ्यास आवश्यक.

२. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून प्रश्नांचे स्वरूप समजावून घ्यावे यासाठी PSI-STE-ASO पूर्व परीक्षा संस्कारित प्रश्नपत्रिका २०१३ ते २०१७ हे राहुल फुसे व विशाल पवार लिखित अनिरुद्ध प्रकाशनाचे पुस्तक तुम्ही अभ्यासू शकता

३. चालू घडामोडींचे मासिक उदा. 'युनिक बुलेटिन' हे मासिक विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल.

४. Telegram Channel Dr. Sushils Spotlight व राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी Dr. Sushils Spotlight या चॅनेलवरील चालू घडामोडींची व्याख्याने विद्यार्थ्यांना उपकारक ठरतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PSI/STI/ASO परीक्षा

$
0
0

यशाचा मटा मार्ग

गेल्या डिसेंबर महिन्यापासून आपण 'यशाचा मटा मार्ग' या लेख मालिकेद्वारे यूपीएससी-एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा (Civil Services) स्पर्धा परीक्षांबाबतची माहिती बघितली आहे. आजच्या लेखानंतर या लेखमालिकेद्वारे विविध क्षेत्रातील शैक्षणिक व करिअरच्या संधीविषयीची माहिती आपल्याला सांगण्यात येईल. काही काळाच्या विश्रांतीनंतर परत या लेखमालिकेमार्फत यूपीएससी आणि एमपीएससी साठीच्या मुख्य परीक्षांची तयारीसाठीची माहिती आपण बघू या.

१३ मे २०१८ रोजीच्या रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवांच्या PSI/STI/ASO पूर्व परीक्षा असणार आहे. या पूर्व परीक्षेतील 'सामान्य अध्यायन' या विषयातील इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी घटकांची माहिती आपण बघितली आहे. आजच्या लेखात बुद्धिमत्ता व अंकगणित या घटकाची माहिती घेवू या आणि या परीक्षेच्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात कशाप्रकारे नियोजन असावे याबाबत चर्चा करू या.

बुद्धिमापन व अंकगणित : पूर्व परीक्षेत बुद्धिमापन व अंकगणित या दोन्ही घटकांवर साधारणपणे १०० पैकी १५ प्रश्न विचारले जातात. त्यापैकी अंकगणित या घटकावर ३ ते ५ प्रश्न विचारलेले दिसतात, तर बुद्धिमापन या घटकावर १० ते १२ प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजेच बुद्धिमापन या प्रश्नांवर जास्त भर दिला आहे. अंकगणितात शेकडेवारी, काळ, काम व वेग, मजूर व काळ, क्षेत्रफळ, घनफळ, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, गणिती प्रक्रिया इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जातात. गेल्या काही परीक्षेपासून आयोगाने अंकगणितावरील प्रश्नांची संख्या कमी करून बुद्धिमापन या उपघटकावरील प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे.

बुद्धिमापन या मधील प्रश्नांची माहिती वाचणे, त्याचे पृथ:करण करणे, माहितीचा संबंध लक्षात घेणे, यासाठी बराच वेळ जातो. या घटकातील प्रश्न वाचायला सोपे जातात, परंतु उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोचणे कठीण असते. त्यामुळे हे प्रश्न वेळ खाणारे असतात. म्हणून आयोगाची बुद्धिमापनावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची वृत्ती दिसून येते. गेल्या काही परीक्षांमध्ये बुद्धिमापन वरील प्रश्न मोठ्या (lengthy) स्वरूपाचे असतात. यामुळे प्रश्नपत्रिकेच्या पानांचीही संख्या वाढलेली दिसते. त्यामुळे अशाप्रकारची प्रश्नपत्रिका एक तासांत सोडविण्यासाठी आपला कस लागतो. अलिकडच्या परीक्षांमध्ये आयोगाने आकलनात्मक बुद्धिमापन स्वरूपाच्या प्रश्नांचे प्रमाण जास्त वाढविले आहे. यामुळे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे जास्तीत जास्त सराव केल्यास आपण बुद्धिमापन या घटकात गुण मिळवू शकतो.

बुद्धिमापन घटकामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न, नातेसंबंध, वय, दिशा, घड्याळ व वेळ, तर्क अनुमान, सांकेतिक भाषा व चिन्हे, क्रमवारी, अक्षरमालिका, माहिती पृथ:करण, बैठकव्यवस्था इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. या विषयाचा अभ्यास करताना २०१३ पासूनच्या आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील बुद्धिमापन व अंकगणित या घटकावरील प्रश्न वारंवार सोडून बघणे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत काही विशिष्ट प्रकारचे गणिते किंवा बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न वारंवार विचारलेले दिसतात. त्यामुळे आयोगाची प्रश्न विचारण्याची वृत्ती नीट समजावून घेणे गरजेचे आहे. शेवटी या घटकाचा जितका जास्त सराव तेवढे जास्त गुण या घटकात मिळू शकतात.

परीक्षेची अखेरच्या टप्प्यातील तयारी : आजपासून परीक्षेसाठी सर्वसाधारणपणे दोन आठवड्याचा कालावधी बाकी आहे. या कालावधीत कोणत्याही नवीन अभ्यास साहित्याचा समावेश आपल्या अभ्यासात करण्याचे टाळावे. आतापर्यंत ज्या प्रकारचे अभ्यास साहित्य वाचलेले असेल त्याचीच वारंवार उजळणी या दोन आठवड्यांमध्ये करणे जास्त उपयुक्त.

या दोन आठवड्यांमध्ये दररोज किमान एक-एक तास चालू घडामोडी आणि बुद्धिमापन व अंकगणित हे घटक अभ्यासणे सोयीचे ठरते. कारण या दोन घटकाला १०० गुणांपैकी ३० गुणांचे वेटेज आहे. बऱ्याचवेळा 'चालू घडामोडी' या घटकाला शेवटच्या दिवसापर्यंत आपण दुर्लक्षित करतो आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाण्याअगोदर पर्यंत चालू घडामोडीविषयीचे साहित्य वाचत राहतो. अशाप्रकारे या घटकाला आपण न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे शेवटच्या १५ दिवसांचे उजळणीसाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

परीक्षेला जाता जाता : परीक्षेच्या दिवशी आपआपल्या परीक्षा केंद्रावर किमान ३० मिनिटे आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आयोगाने नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे पुरेशा ओळखपत्रांच्या झेरॉक्स, मूळप्रत, परीक्षा प्रवेशपत्र इत्यादी सोबत घेतले की नाही याची खातरजमा करणे, परीक्षेतील उत्तरपत्रिकेवरील वर्तुळ छायांकित करण्यासाठी काळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन सोबत नेणे गरजेचे आहे.

परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन : PSI/STI/ASO पूर्व परीक्षेत १०० प्रश्न ६० मिनिटांत सोडवणे म्हणजे वेळेचे काटेकोर नियोजन हवे. पेपर हातात घेतल्या घेतल्या सर्वांत आधी पेपरच्या पृष्ठांची संख्या बघावी म्हणजे पेपरच्या lengthyness चा अंदाज येतो. जेणेकरून आपल्याला पेपर सोडवताना आपला वेग कशाप्रकारे ठेवायचा याचा अंदाज येतो. पेपरची एकूण पृष्ठ ३८ पेक्षा जास्त असेल तर पेपर शक्यतो lengthy आहे असे समजावे, जेणेकरून एक तासात आपल्याला पेपर सोडवायला वेळ पडणार आहे. यामध्ये आपण ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हमखास माहिती आहे ते प्रश्न attempt करणे. नंतर १५ मि. पहिले बुद्धिमापन व अंकगणितातील जेवढे प्रश्न सूटू शकतात तेवढे सोडवणे व नंतर परत असे प्रश्न की ज्यांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्यायांमध्ये उत्तर आहे म्हणजे दोन पर्याय Eleminate केले आहेत. (५०-५०) असे प्रश्न attempt करणे आणि शेवटी आपल्या attempt चा अंदाज घेवून काही संभाव्य प्रश्न आपला ideal attempt पूर्ण करण्यासाठी सोडवणे.

अशाप्रकारे ६० मिनिटांचे तीन राउंडमध्ये विभागणी केल्यास आपण १०० प्रश्नांपर्यंत सहज पोहचू शकतो.

परीक्षेच्या आदल्या रात्री फार उशिरापर्यंत जागत बसू नये आणि फार सकाळी उठून परत वाचण्याचा अट्टाहास करणेसुद्धा योग्य नाही. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो योग्य प्रकारे प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरूपात बाहेर येणे आवश्यक आहे. यासाठी मेंदूला आरामाची गरज असते. त्यामुळे आदल्या रात्री पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. परीक्षा हॉलमध्ये तुमचे चित्त एकाग्र होणे गरजेचे आहे. कारण चित्त एकाग्र असेल तरच कमी कालावधीत प्रश्न अवगत होऊन उत्तरापर्यंत अचूकतेने पोहचता येते. त्यामुळे आदल्या दिवशीपासूनच mind relax करणे गरजेचे आहे.

-अमित संतोषराव डहाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PSI/STI/ASO परीक्षा

$
0
0

यशाचा मटा मार्ग

गेल्या डिसेंबर महिन्यापासून आपण 'यशाचा मटा मार्ग' या लेख मालिकेद्वारे यूपीएससी-एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा (Civil Services) स्पर्धा परीक्षांबाबतची माहिती बघितली आहे. आजच्या लेखानंतर या लेखमालिकेद्वारे विविध क्षेत्रातील शैक्षणिक व करिअरच्या संधीविषयीची माहिती आपल्याला सांगण्यात येईल. काही काळाच्या विश्रांतीनंतर परत या लेखमालिकेमार्फत यूपीएससी आणि एमपीएससी साठीच्या मुख्य परीक्षांची तयारीसाठीची माहिती आपण बघू या.

१३ मे २०१८ रोजीच्या रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवांच्या PSI/STI/ASO पूर्व परीक्षा असणार आहे. या पूर्व परीक्षेतील 'सामान्य अध्यायन' या विषयातील इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी घटकांची माहिती आपण बघितली आहे. आजच्या लेखात बुद्धिमत्ता व अंकगणित या घटकाची माहिती घेवू या आणि या परीक्षेच्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात कशाप्रकारे नियोजन असावे याबाबत चर्चा करू या.

बुद्धिमापन व अंकगणित : पूर्व परीक्षेत बुद्धिमापन व अंकगणित या दोन्ही घटकांवर साधारणपणे १०० पैकी १५ प्रश्न विचारले जातात. त्यापैकी अंकगणित या घटकावर ३ ते ५ प्रश्न विचारलेले दिसतात, तर बुद्धिमापन या घटकावर १० ते १२ प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजेच बुद्धिमापन या प्रश्नांवर जास्त भर दिला आहे. अंकगणितात शेकडेवारी, काळ, काम व वेग, मजूर व काळ, क्षेत्रफळ, घनफळ, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, गणिती प्रक्रिया इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जातात. गेल्या काही परीक्षेपासून आयोगाने अंकगणितावरील प्रश्नांची संख्या कमी करून बुद्धिमापन या उपघटकावरील प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे.

बुद्धिमापन या मधील प्रश्नांची माहिती वाचणे, त्याचे पृथ:करण करणे, माहितीचा संबंध लक्षात घेणे, यासाठी बराच वेळ जातो. या घटकातील प्रश्न वाचायला सोपे जातात, परंतु उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोचणे कठीण असते. त्यामुळे हे प्रश्न वेळ खाणारे असतात. म्हणून आयोगाची बुद्धिमापनावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची वृत्ती दिसून येते. गेल्या काही परीक्षांमध्ये बुद्धिमापन वरील प्रश्न मोठ्या (lengthy) स्वरूपाचे असतात. यामुळे प्रश्नपत्रिकेच्या पानांचीही संख्या वाढलेली दिसते. त्यामुळे अशाप्रकारची प्रश्नपत्रिका एक तासांत सोडविण्यासाठी आपला कस लागतो. अलिकडच्या परीक्षांमध्ये आयोगाने आकलनात्मक बुद्धिमापन स्वरूपाच्या प्रश्नांचे प्रमाण जास्त वाढविले आहे. यामुळे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे जास्तीत जास्त सराव केल्यास आपण बुद्धिमापन या घटकात गुण मिळवू शकतो.

बुद्धिमापन घटकामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न, नातेसंबंध, वय, दिशा, घड्याळ व वेळ, तर्क अनुमान, सांकेतिक भाषा व चिन्हे, क्रमवारी, अक्षरमालिका, माहिती पृथ:करण, बैठकव्यवस्था इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. या विषयाचा अभ्यास करताना २०१३ पासूनच्या आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील बुद्धिमापन व अंकगणित या घटकावरील प्रश्न वारंवार सोडून बघणे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत काही विशिष्ट प्रकारचे गणिते किंवा बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न वारंवार विचारलेले दिसतात. त्यामुळे आयोगाची प्रश्न विचारण्याची वृत्ती नीट समजावून घेणे गरजेचे आहे. शेवटी या घटकाचा जितका जास्त सराव तेवढे जास्त गुण या घटकात मिळू शकतात.

परीक्षेची अखेरच्या टप्प्यातील तयारी : आजपासून परीक्षेसाठी सर्वसाधारणपणे दोन आठवड्याचा कालावधी बाकी आहे. या कालावधीत कोणत्याही नवीन अभ्यास साहित्याचा समावेश आपल्या अभ्यासात करण्याचे टाळावे. आतापर्यंत ज्या प्रकारचे अभ्यास साहित्य वाचलेले असेल त्याचीच वारंवार उजळणी या दोन आठवड्यांमध्ये करणे जास्त उपयुक्त.

या दोन आठवड्यांमध्ये दररोज किमान एक-एक तास चालू घडामोडी आणि बुद्धिमापन व अंकगणित हे घटक अभ्यासणे सोयीचे ठरते. कारण या दोन घटकाला १०० गुणांपैकी ३० गुणांचे वेटेज आहे. बऱ्याचवेळा 'चालू घडामोडी' या घटकाला शेवटच्या दिवसापर्यंत आपण दुर्लक्षित करतो आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाण्याअगोदर पर्यंत चालू घडामोडीविषयीचे साहित्य वाचत राहतो. अशाप्रकारे या घटकाला आपण न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे शेवटच्या १५ दिवसांचे उजळणीसाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

परीक्षेला जाता जाता : परीक्षेच्या दिवशी आपआपल्या परीक्षा केंद्रावर किमान ३० मिनिटे आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आयोगाने नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे पुरेशा ओळखपत्रांच्या झेरॉक्स, मूळप्रत, परीक्षा प्रवेशपत्र इत्यादी सोबत घेतले की नाही याची खातरजमा करणे, परीक्षेतील उत्तरपत्रिकेवरील वर्तुळ छायांकित करण्यासाठी काळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन सोबत नेणे गरजेचे आहे.

परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन : PSI/STI/ASO पूर्व परीक्षेत १०० प्रश्न ६० मिनिटांत सोडवणे म्हणजे वेळेचे काटेकोर नियोजन हवे. पेपर हातात घेतल्या घेतल्या सर्वांत आधी पेपरच्या पृष्ठांची संख्या बघावी म्हणजे पेपरच्या lengthyness चा अंदाज येतो. जेणेकरून आपल्याला पेपर सोडवताना आपला वेग कशाप्रकारे ठेवायचा याचा अंदाज येतो. पेपरची एकूण पृष्ठ ३८ पेक्षा जास्त असेल तर पेपर शक्यतो lengthy आहे असे समजावे, जेणेकरून एक तासात आपल्याला पेपर सोडवायला वेळ पडणार आहे. यामध्ये आपण ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हमखास माहिती आहे ते प्रश्न attempt करणे. नंतर १५ मि. पहिले बुद्धिमापन व अंकगणितातील जेवढे प्रश्न सूटू शकतात तेवढे सोडवणे व नंतर परत असे प्रश्न की ज्यांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्यायांमध्ये उत्तर आहे म्हणजे दोन पर्याय Eleminate केले आहेत. (५०-५०) असे प्रश्न attempt करणे आणि शेवटी आपल्या attempt चा अंदाज घेवून काही संभाव्य प्रश्न आपला ideal attempt पूर्ण करण्यासाठी सोडवणे.

अशाप्रकारे ६० मिनिटांचे तीन राउंडमध्ये विभागणी केल्यास आपण १०० प्रश्नांपर्यंत सहज पोहचू शकतो.

परीक्षेच्या आदल्या रात्री फार उशिरापर्यंत जागत बसू नये आणि फार सकाळी उठून परत वाचण्याचा अट्टाहास करणेसुद्धा योग्य नाही. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो योग्य प्रकारे प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरूपात बाहेर येणे आवश्यक आहे. यासाठी मेंदूला आरामाची गरज असते. त्यामुळे आदल्या रात्री पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. परीक्षा हॉलमध्ये तुमचे चित्त एकाग्र होणे गरजेचे आहे. कारण चित्त एकाग्र असेल तरच कमी कालावधीत प्रश्न अवगत होऊन उत्तरापर्यंत अचूकतेने पोहचता येते. त्यामुळे आदल्या दिवशीपासूनच mind relax करणे गरजेचे आहे.

-अमित संतोषराव डहाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PSI/STI/ASO परीक्षा

$
0
0

यशाचा मटा मार्ग

गेल्या डिसेंबर महिन्यापासून आपण 'यशाचा मटा मार्ग' या लेख मालिकेद्वारे यूपीएससी-एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा (Civil Services) स्पर्धा परीक्षांबाबतची माहिती बघितली आहे. आजच्या लेखानंतर या लेखमालिकेद्वारे विविध क्षेत्रातील शैक्षणिक व करिअरच्या संधीविषयीची माहिती आपल्याला सांगण्यात येईल. काही काळाच्या विश्रांतीनंतर परत या लेखमालिकेमार्फत यूपीएससी आणि एमपीएससी साठीच्या मुख्य परीक्षांची तयारीसाठीची माहिती आपण बघू या.

१३ मे २०१८ रोजीच्या रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवांच्या PSI/STI/ASO पूर्व परीक्षा असणार आहे. या पूर्व परीक्षेतील 'सामान्य अध्यायन' या विषयातील इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी घटकांची माहिती आपण बघितली आहे. आजच्या लेखात बुद्धिमत्ता व अंकगणित या घटकाची माहिती घेवू या आणि या परीक्षेच्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात कशाप्रकारे नियोजन असावे याबाबत चर्चा करू या.

बुद्धिमापन व अंकगणित : पूर्व परीक्षेत बुद्धिमापन व अंकगणित या दोन्ही घटकांवर साधारणपणे १०० पैकी १५ प्रश्न विचारले जातात. त्यापैकी अंकगणित या घटकावर ३ ते ५ प्रश्न विचारलेले दिसतात, तर बुद्धिमापन या घटकावर १० ते १२ प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजेच बुद्धिमापन या प्रश्नांवर जास्त भर दिला आहे. अंकगणितात शेकडेवारी, काळ, काम व वेग, मजूर व काळ, क्षेत्रफळ, घनफळ, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, गणिती प्रक्रिया इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जातात. गेल्या काही परीक्षेपासून आयोगाने अंकगणितावरील प्रश्नांची संख्या कमी करून बुद्धिमापन या उपघटकावरील प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे.

बुद्धिमापन या मधील प्रश्नांची माहिती वाचणे, त्याचे पृथ:करण करणे, माहितीचा संबंध लक्षात घेणे, यासाठी बराच वेळ जातो. या घटकातील प्रश्न वाचायला सोपे जातात, परंतु उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोचणे कठीण असते. त्यामुळे हे प्रश्न वेळ खाणारे असतात. म्हणून आयोगाची बुद्धिमापनावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची वृत्ती दिसून येते. गेल्या काही परीक्षांमध्ये बुद्धिमापन वरील प्रश्न मोठ्या (lengthy) स्वरूपाचे असतात. यामुळे प्रश्नपत्रिकेच्या पानांचीही संख्या वाढलेली दिसते. त्यामुळे अशाप्रकारची प्रश्नपत्रिका एक तासांत सोडविण्यासाठी आपला कस लागतो. अलिकडच्या परीक्षांमध्ये आयोगाने आकलनात्मक बुद्धिमापन स्वरूपाच्या प्रश्नांचे प्रमाण जास्त वाढविले आहे. यामुळे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे जास्तीत जास्त सराव केल्यास आपण बुद्धिमापन या घटकात गुण मिळवू शकतो.

बुद्धिमापन घटकामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न, नातेसंबंध, वय, दिशा, घड्याळ व वेळ, तर्क अनुमान, सांकेतिक भाषा व चिन्हे, क्रमवारी, अक्षरमालिका, माहिती पृथ:करण, बैठकव्यवस्था इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. या विषयाचा अभ्यास करताना २०१३ पासूनच्या आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील बुद्धिमापन व अंकगणित या घटकावरील प्रश्न वारंवार सोडून बघणे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत काही विशिष्ट प्रकारचे गणिते किंवा बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न वारंवार विचारलेले दिसतात. त्यामुळे आयोगाची प्रश्न विचारण्याची वृत्ती नीट समजावून घेणे गरजेचे आहे. शेवटी या घटकाचा जितका जास्त सराव तेवढे जास्त गुण या घटकात मिळू शकतात.

परीक्षेची अखेरच्या टप्प्यातील तयारी : आजपासून परीक्षेसाठी सर्वसाधारणपणे दोन आठवड्याचा कालावधी बाकी आहे. या कालावधीत कोणत्याही नवीन अभ्यास साहित्याचा समावेश आपल्या अभ्यासात करण्याचे टाळावे. आतापर्यंत ज्या प्रकारचे अभ्यास साहित्य वाचलेले असेल त्याचीच वारंवार उजळणी या दोन आठवड्यांमध्ये करणे जास्त उपयुक्त.

या दोन आठवड्यांमध्ये दररोज किमान एक-एक तास चालू घडामोडी आणि बुद्धिमापन व अंकगणित हे घटक अभ्यासणे सोयीचे ठरते. कारण या दोन घटकाला १०० गुणांपैकी ३० गुणांचे वेटेज आहे. बऱ्याचवेळा 'चालू घडामोडी' या घटकाला शेवटच्या दिवसापर्यंत आपण दुर्लक्षित करतो आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाण्याअगोदर पर्यंत चालू घडामोडीविषयीचे साहित्य वाचत राहतो. अशाप्रकारे या घटकाला आपण न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे शेवटच्या १५ दिवसांचे उजळणीसाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

परीक्षेला जाता जाता : परीक्षेच्या दिवशी आपआपल्या परीक्षा केंद्रावर किमान ३० मिनिटे आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आयोगाने नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे पुरेशा ओळखपत्रांच्या झेरॉक्स, मूळप्रत, परीक्षा प्रवेशपत्र इत्यादी सोबत घेतले की नाही याची खातरजमा करणे, परीक्षेतील उत्तरपत्रिकेवरील वर्तुळ छायांकित करण्यासाठी काळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन सोबत नेणे गरजेचे आहे.

परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन : PSI/STI/ASO पूर्व परीक्षेत १०० प्रश्न ६० मिनिटांत सोडवणे म्हणजे वेळेचे काटेकोर नियोजन हवे. पेपर हातात घेतल्या घेतल्या सर्वांत आधी पेपरच्या पृष्ठांची संख्या बघावी म्हणजे पेपरच्या lengthyness चा अंदाज येतो. जेणेकरून आपल्याला पेपर सोडवताना आपला वेग कशाप्रकारे ठेवायचा याचा अंदाज येतो. पेपरची एकूण पृष्ठ ३८ पेक्षा जास्त असेल तर पेपर शक्यतो lengthy आहे असे समजावे, जेणेकरून एक तासात आपल्याला पेपर सोडवायला वेळ पडणार आहे. यामध्ये आपण ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हमखास माहिती आहे ते प्रश्न attempt करणे. नंतर १५ मि. पहिले बुद्धिमापन व अंकगणितातील जेवढे प्रश्न सूटू शकतात तेवढे सोडवणे व नंतर परत असे प्रश्न की ज्यांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्यायांमध्ये उत्तर आहे म्हणजे दोन पर्याय Eleminate केले आहेत. (५०-५०) असे प्रश्न attempt करणे आणि शेवटी आपल्या attempt चा अंदाज घेवून काही संभाव्य प्रश्न आपला ideal attempt पूर्ण करण्यासाठी सोडवणे.

अशाप्रकारे ६० मिनिटांचे तीन राउंडमध्ये विभागणी केल्यास आपण १०० प्रश्नांपर्यंत सहज पोहचू शकतो.

परीक्षेच्या आदल्या रात्री फार उशिरापर्यंत जागत बसू नये आणि फार सकाळी उठून परत वाचण्याचा अट्टाहास करणेसुद्धा योग्य नाही. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो योग्य प्रकारे प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरूपात बाहेर येणे आवश्यक आहे. यासाठी मेंदूला आरामाची गरज असते. त्यामुळे आदल्या रात्री पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. परीक्षा हॉलमध्ये तुमचे चित्त एकाग्र होणे गरजेचे आहे. कारण चित्त एकाग्र असेल तरच कमी कालावधीत प्रश्न अवगत होऊन उत्तरापर्यंत अचूकतेने पोहचता येते. त्यामुळे आदल्या दिवशीपासूनच mind relax करणे गरजेचे आहे.

-अमित संतोषराव डहाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

sdsdds


इंजिनीअरिंग प्रवेशावर विचारा प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । मुंबई

सध्या इंजिनीअरिंग प्रवेशाची धामधूम सुरू आहे. ही प्रवेशप्रक्रिया संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा करावा? केंद्रीभूत असणारी ही प्रवेशप्रक्रिया कशी चालणार आहे? प्रवेश मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? प्रवेशअर्जात कॉलेजांचा पसंतीक्रम कसा भरावा? यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडलेले आहेत. या प्रश्नांचे समाधान कारण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस’अंतर्गत फेसबुक लाइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

इंजिनीअरिंगच्या या प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेले तंत्रशिक्षण संचालनालयाचे विशेष कार्य अधिकारी नरेंद्र पाटील मार्गदर्शन करत आहेत. पुढील लिंकवर क्लिक करून त्यांना थेट विचारा आपले प्रश्न...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यू. पी. एस. सी. परीक्षेचे स्वरूप

$
0
0

डॉ. सुशील बारी

यू. पी. एस. सी. बद्दल सर्वसाधारण माहिती आपण मागील लेखात पाहिली होती. या लेखात यू.पी.एस.सी. परीक्षेचे स्वरूप आपण जाणून घेणार आहोत. यू. पी. एस. सी. ची परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. हे तिन्ही टप्पे आपल्याला एकाच वर्षात यशस्वीरीत्या पार करावे लागतात. हे तीन टप्पे म्हणजे
१) पूर्व परीक्षा
२) मुख्य परीक्षा
३) मुलाखत
१) पूर्व परीक्षा : सर्वप्रथम आपण ‘पूर्वपरीक्षा’ या पहिल्या टप्प्याबद्दल जाणून घेऊ. या टप्प्यात दोन पेपर असतात ते खालीलप्रमाणे :
वरील पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या आयोग बदलू शकते. म्हणजे प्रत्येक वेळेस GS मध्ये १०० व CSAT मध्ये ८० प्रश्न विचारलेच जातील असे नव्हे. म्हणून उमेदवाराने पेपर मिळाल्यावर सर्वप्रथम पेपरवरील सूचना
वाचणे आवश्यक असते.

चुकीचे उत्तर नमूद केल्यास दंड : जर उमेदवाराने चुकीचे उत्तर नमूद केले असेल तर, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नांसाठी असलेल्या गुणांच्या तुलनेत १/३ इतके गुण योग्य उत्तरांसाठी मिळालेल्या गुणांमधून वजा केले जातात. यालाच ‘१/३ Negative Marking’ असेही संबोधले जाते.
प्रश्नांचे स्वरूप : पूर्वपरीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप हे बहुपर्यायी असे असते. (ज्याला MCQ-Multiple Choice Questions असे संबोधले जाते. उदा. प्र. १ खालीलपैकी कुणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली?
पर्याय : अ) महात्मा फुले
ब) राजा राममोहन रॉय
क) स्वामी दयानंद सरस्वती
ड) विष्णूशास्त्री चिपळूणकर
उत्तर नमूद करण्याची पद्धती :
अ ब क ड

अभ्यासक्रमातील समाविष्ट घटक :
पूर्वपरीक्षा पेपर - I - GS -
१) इतिहास - प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक
२) भूगोल - भारत, जग, पर्यावरण
३) भारतीय राज्यघटना (राज्यशास्त्र)
४) विज्ञान तंत्रज्ञान
५) भारतीय अर्थव्यवस्था
६) चालू घडामोडी

पूर्वपरीक्षा पेपर - II - CSAT -
१) उतारा वाचून उत्तरे द्या (Comprehenston)
२) बौद्धिक चाचणी
३) Logical Reasoning
४) गणित
अशा प्रकारे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासून त्याचे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्लेषण विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससीचा श्रीगणेशा

$
0
0

डॉ. सुशील बारी

यूपीएससी समजून घेताना सर्वप्रथम आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना अत्यावश्यक अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत. भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा डोलारा प्रत्यक्ष सांभाळणारे अधिकारी बनण्यासाठी काय निकष असतात, नेमकी पदे कोणती असतात ही माहिती बघू या. अधिकारी दोन स्तरांवर निवडले जातात.

१) केंद्र सरकारद्वारा निवडले जाणारे अधिकारी : आयएएस, आयपीएस, आयआरएस इ. आपल्याला परिचित असणारे व ज्याचे आकर्षण बहुतेक सर्वांनाच असते ते पद म्हणजेच कलेक्टर - जिल्हाधिकारी. (हा अधिकारी आयएएस दर्जाचा असतो.) केंद्र सरकारद्वारे निवडले जाणारे हे अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी या परीक्षेद्वारे निवडले जातात.

२) राज्य सरकारद्वारा निवडले जाणारे अधिकारी : डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार आदी एमपीएससीच्या परीक्षेतून निवडले जातात. (याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ.)

यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण २४ विविध पदांद्वारे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल होऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम यूपीएससीबद्दलच्या चुकीच्या धारणा बाजूला सारणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ,

१) परीक्षा खूप कठीण असते : ‘वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असं म्हटलं जातं. यूपीएससीला समजून घेऊन योग्य मार्गदर्शनाखाली यश मिळवणं सहज शक्य आहे.

२) इंग्रजी भाषेचा बागुलबुवा : यूपीएससीची परीक्षा ही मराठी भाषेतूनही देता येते. मुलाखतही आपण मराठी भाषेतून देऊ शकतो. तेव्हा इंग्रजी भाषा यायलाच हवी असे नाही; परंतु किमान इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे, तेवढं विद्यार्थ्याने लक्षात घ्यावं. अभ्यासाचे साहित्य मराठी भाषेत उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग अजूनच सोपा झाला आहे.

३) ग्रामीण‌ विद्यार्थी आणि यूपीएससी : दिवसेंदिवस ग्रामीण विद्यार्थ्यांचे यूपीएससीतून उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण विद्यार्थ्याला यूपीएससी जमणार नाही वा त्यांनी प्रयत्न करू नये या धारणांना ग्रामीण विद्यार्थ्यांनी चपखल उत्तर दिले आहे.

४) मुलाखतीत विचित्र प्रश्न विचारले जातात : उदा. तुमच्या टायला किती गाठी आहेत? तुम्ही किती पायऱ्या चढून आलात? वगैरे. खरं तर मुलाखत ही ‘व्यक्तिमत्त्वाची चाचणी’ म्हणून बघितली जाते. यातील प्रश्न आपण यूपीएससीला दिलेल्या माहितीवर (Biodata) व चालू घडामोडींवर आधारित असतात. उमेदवाराचे चित्त स्थिर आहे किंवा नाही यासाठी असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यात घाबरण्याचे काहीही कारण नाही.

यूपीएससी ही सर्वसमावेशक असून, कोणत्याही घटकांना अपायकारक होईल असे निर्णय घेत नाही. सर्व घटक समोर ठेवून त्याचा सारासार ‌विचार यूपीएससी करत असते.
खूप महत्त्वाचे...

काही दिवसांपासून ‘बासवान समिती’ने दिलेल्या अहवालानुसार परीक्षेत बदल होणार, अशी चर्चा सामाजिक माध्यमे, काही वृत्तपत्रांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात असून, विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की, १) जोपर्यंत यूपीएससी तशी नोटीस जारी करत नाही तोपर्यंत अशा चर्चेत स्वत:चा वेळ वाया घालवू नये, २) जर परीक्षेत बदल झालाच तर तो सर्वांसाठी असेल, ३) वैकल्प‌िक विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये द्विधा मनस्थ‌िती पाहायला मिळत असून, जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत अभ्यास करत राहणेच योग्य ठरते.

यूपीएससी परीक्षेसाठी पात्रता निकष : १) नागरिकत्व : आयएएस किंवा आयपीएस या सेवांकरिता भारतीय नागरिकच पात्र आहेत. २) इतर २२ सेवांकरिता नेपाळ, भूतान, तिबेटमधील निर्वासित व इतर काही देशांतून भारतीय वंशाचे स्थलांतरित नागरिकांनाही समाविष्ट करून घेतले जाते. त्यासाठीचे निकष त्यांनी upscgov.in या संकेतस्थळावर पाहावेत.

खुला वर्ग ओब‌ीस‌ी एससी एसटी

१) वय - कमीत कमी २१ २१ २१ २१

जास्तीत जास्त ३२, ३५ ३७ ३७

२) किती प्रयत्नांत यशस्वी

होणे गरजेचे ६ ९ मर्यादा नाही मर्यादा नाही

याव्यतिरिक्त इतर जसे दिव्यांग (पीएच) यांनाही वयामध्ये १० वर्षांपर्यंत सवलत असते. (दृष्टिदोष, बहिरेपणा व अस्थीसंबंधी विकार) यांचा विचार येथे केला जातो. संरक्षण सेवेतील, जम्मू-काश्मीरमधील नागरिक यांनाही सवलती आहेत.

शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो, की मुक्त विद्यापीठातील पदवीधर (जसे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) या परीक्षेसाठी पात्र असतात का? तर असतात. ‘मुक्त विद्यापीठ’ असल्याने फरक पडत नाही. विद्यार्थ्याने फक्त ज्या विद्यापीठातून पदवी पूर्ण करणार आहे ते विद्यापीठ मान्यताप्राप्त आहे किंवा नाही हे आधीच तपासून घ्यावं.

परीक्षा शुल्क : परीक्षा तीन टप्प्यांत होते. यासाठीचे शुल्क हे पूर्वपरीक्षा १०० रुपये व मुख्य परीक्षा २०० रुपये असे असते. नोट : महिला/एससी/एसटी/पीएच यांना परीक्षा शुल्क नाही.
परीक्षा केंद्र : पूर्वपरीक्षा - मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर. मुख्य परीक्षा मुंबई येथे पार पडते. (सन २०१८ मध्ये नाशिकचा समावेश पूर्व परीक्षेसाठी होऊ शकतो. नोटिफिकेशन आले की विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यावी.)

परीक्षेचे स्वरूप : यूपीएससीची परीक्षा तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. एकाच वर्षात हे तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणारा उमेदवार यशस्वी होतो.

पूर्वपरीक्षा : यात प्रत्येक १०० गुणांचे दोन पेपर असतात. जीएस व सीएसएटी यांतील प्रश्नांचे स्वरूप हे बहुपर्यायी असते.

मुख्य परीक्षा : पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण उमेदवार यासाठी पात्र असतात. या परीक्षे‌त एकूण नऊ लेखी पेपर असतात. यातील सात लेखी पेपर १७५० गुणांचे असतात, ज्यावर मेरिट ठरते. प्रत्येकी ३०० गुणांचे इंग्रजी व प्रादेशिक भाषा-मराठी वा इतर हे दोन पेपर क्वालिफाइंग असतात. गुणवत्ता यादीसाठी यांचे गुण मोजले जात नाहीत.

मुलाखत : मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतात. मुलाखत ही नवी दिल्ली या राजधानीच्या शहरात यूपीएससीद्वारे आयोजित केली जाते. मुलाखत ही २७५ गुणांची असते.
मुख्य परीक्षा व मुलाखती यांतील गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादीद्वारे उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. उमेदवाराच्या पसंती क्रमानुसार व गुणवत्ता हा निकष समोर ठेवून ‘सेवा’ व ‘केडर’ दिले जाते. याचा अर्थ ‘हवे ते पद’ व ‘हवे ते केडर’ मिळण्यासाठी गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक असला पाहिजे. ‘केडर’ म्हणजे ज्या क्षेत्रात सेवा द्यायची ते क्षेत्र. प्रामुख्याने ते राज्यनिहाय असते. उदा. महाराष्ट्र, गुजरात इ. अशा प्रकारे याबद्दल सव‌िस्तर माहिती यूपीएससीसंबंधी पुढील लेखात आपण करून घेऊ.

यूपीएससीत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांचे हे विधान सदैव स्मरणात ठेवून त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे.

‘जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावा,

जर तुम्ही धावू शकत नसाल तर चालत राहा,

जर तुम्ही चालू शकत नसाल तर रांगा,

तुम्ही जे काही कराल,

त्यात सदैव पुढे जाण्याचा ध्यास घेतला पाहिजे.’

यूपीएससीचे संकेतस्थळ - www.upsc.gov.in

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यू. पी. एस. सी. : मुख्य परीक्षा व मुलाखत

$
0
0

डॉ. सुशील बारी

२) मुख्य परीक्षा :
स्वरूप - लेखी परीक्षा : या परीक्षेत पेपरनुसार प्रश्नसंख्या बघून व वेळेचे नियोजन करून पेपर सोडविणे महत्त्वाचे असते.
प्रश्न संख्या व गुणांचे वितरण : प्रश्नसंख्या व गुणांचे वितरण हे प्रत्यक्षात पेपर हातात आल्यावर विद्यार्थ्यांनी सूचना वाचून त्यानुसार ते लिहिणे अपेक्षित असते. जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते.
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे हितकारक : विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघून त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यातून प्रश्न कसे विचारले जातात याबद्दलची संकल्पना अधिक स्पष्ट होत जाते.
चालू घडामोडींचे महत्त्व : एकंदर ‘चालू घडामोडी’ या स्पर्धा परीक्षेचा ‘आत्मा’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे महत्त्व परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर अनन्यसाधारण असे आहे. मुख्य परीक्षेचा विचार केल्यास चालू घडामोडींचा अभ्यास खूप महत्त्वाची भूमिका बाजवतो. गेल्या ४ वर्षांतील प्रश्नपत्रिका पाहिल्यास चालू घडामोडींचा पगडा दिसून येतो.
वैकल्पिक विषय व त्याचे महत्त्व : एकंदरीत अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानाचा विचार केल्यास एक बाब समोर येते ही म्हणजे यात ‘सिंहाचा वाटा’ असणारी वैकल्पिक विषयाची भूमिका या विषयात प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास जास्तीत जास्त गुण मिळवून अंतिम यादीत स्थान पटकावणे सहज शक्य होते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ची आवड, आकलन व गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून वैकल्पिक विषय निवडावा, कारण ५०० गुणांसाठी असणारा वैकल्पिक विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे.
अनिवार्य भाषा पेपर : या पेपरमध्ये किमान २५% म्हणजेच ३०० पैकी ७५ गुण मिळाल्यास उमेदवार पात्र ठरतो. या पेपरचे गुण गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. याचा अर्थ फक्त ७ पेपरचे म्हणजेच ‘१७५०’ गुणांचा विचार करून उमेदवार
मुलाखतीस पात्र ठरवला जातो.
लिखाणाचा सराव महत्त्वाचा : विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लिखाणाचा सराव करणे अपेक्षित असून त्या लिखाणाचे मूल्यमापन करणे गरजेचे ठरते. नियमित सराव केल्यास यशाची खात्री मिळण्याची शक्यता वाढीस लागते.
३) मुलाखत (गुण २७५) : लेखी परीक्षेतून मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत नवी दिल्ली येथे यू.पी.एस.सी. द्वारे घेतली जाते. मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांने मुख्य परीक्षेच्या वेळी स्वत:बद्दलची यु.पी.एस.सी.ला दिलेली माहिती Detailed Application form (DAF) मध्ये असते. तसेच चालू घडामोडींचा विचारही मुलाखतीसाठी महत्त्वाचा असतो. खरं तर ही ज्ञानासाठी नसून व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. कारण विद्यार्थ्याने पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून ज्ञानाची परीक्षा दिलेली असते. मुलाखतीमध्ये प्रामाणिकपणे उत्तरे देणं अपेक्षित असतं. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तस स्पष्ट सांगणेही गरजेचे असते.
मुलाखतीत मिळणारे गुण व मुख्य परीक्षेतील गुण यांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी यूपीएससीद्वारे जाहीर केली जाते. पूर्व परीक्षेतील गुणांचा विचार अंतिम गुणवत्ता यादीसाठी केला जात नाही. अशाप्रकारे यूपीएससी परीक्षेतील हे तीन्ही टप्पे एकाच वर्षांत सलगरीत्या यशस्वीपणे पार केल्यास; गुणवत्तेच्या आधारे केंद्र सरकारच्या विविध २४ सेवांपैकी एका सेवेत रुजू होण्याची व आयुष्याला नवे वळण देण्याची संधी विद्यार्थ्याला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधी प्रत्येक क्षेत्रात

$
0
0

दरवर्षी मे महिना संपताना एकीकडे पावसाची आणि दुसरीकडे बारावीच्या निकालाची आतुरतेनं वाट बघितली जाते. मात्र निकाल लागल्यानंतर आता पुढे काय करायचं, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा असतो. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 'मटा'च्या 'प्लॅनेट कॅम्पस' उपक्रमांतर्गत 'बारावीनंतरच्या करिअर संधी' या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं. या सत्रातून तज्ज्ञांनी सांगितलेल्या करिअरच्या नव्या वाटांविषयी जाणून घेऊ या.

००००

करिअरचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बारावी. बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात जायचं हे बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी ठरवलेलं असतं. पण त्या क्षेत्रातील विविध संधीविषयी विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम असतो. अलीकडे विद्यार्थ्यांचा नेहमीच्याच विज्ञान, वाणिज्य व कला शाखांमध्येही काही तरी वेगळे करण्याकडे कल असतो. या नियमित अभ्यासक्रमाच्या क्षेत्रातील काही हटके पर्याय आनंद मापुस्कर आणि जयंत आपटे या तज्ज्ञांनी सुचवलं.

विज्ञान शाखा

विज्ञान शाखेतील विविध मार्ग

बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनीअरिंग असे दोनच पर्याय उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या समोर आहेत, असं मुलांना आणि पालकांना वाटत असतं. पण, विज्ञान शाखेतही करिअरच्या इतर अनेक संधी उपलब्ध आहेत.

वैद्यकीय क्षेत्र आणि उपलब्ध संधी

मागील वर्षीपासून संपूर्ण भारतात एमबीबीएससाठी 'नीट' ही प्रवेश परीक्षा लागू करण्यात आली आहे. अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. तरीही वैद्यकीय क्षेत्रात केवळ एमबीबीएसचा विचार मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा एमबीबीएस म्हणजेच केवळ डॉक्टर असा समज अनेकांमध्ये पाहायला मिळतो. परंतु, वैद्यकीय क्षेत्रामध्ये एमबीबीएस सोडून बीडीएमएस, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, अॅलोपथी हे पर्याय उपलब्ध असतात.

पॅरामेडिकल क्षेत्र

बारावीनंतर जवळपास ४० वेगवेगळे अभ्यासक्रम या क्षेत्रात उपलब्ध आहेत. मेडिकलच्या बरोबरीने असणारे हे क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना बीएससीनंतर विविध करिअर संधी उपलब्ध करून देते.

१) बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी - या क्षेत्रामध्ये माणसाच्या उच्चारशास्त्रावर काम केले जाते.

२) बॅचलर इन अॅनिस्थेशिया टेक्नॉलॉजी - कोणतेही ऑपरेशन करण्याआधी भूल देण्याचे शास्त्र या अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग आहे.

३) बॅचलर इन नर्सिंग

४) बॅचलर इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी

५) बॅचलर इन रेडिएशन

हॉस्पिटल मॅनेजमेंट

हॉस्पिटल मॅनेजमेंट हे आरोग्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचं आणि फायदेशीर क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. हॉस्पिटलमधील कामकाज आणि इतर व्यवस्थापन करणं हे या विभागाचं प्रमुख काम असतं. विज्ञान शाखेतून बारावी केल्यानंतर पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी करण्याची सोय या शाखेमध्ये आहे. वैद्यकीय शाखेची पार्श्वभूमी असणारा किंवा नसणारा कुणीही हॉस्पिटल मॅनेजमेंट करून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करू शकतो.

शेती आणि इतर पर्याय

तंत्रज्ञानाचा प्रसार कितीही मोठ्या प्रमाणात झाला, तरीही अन्नासारख्या मूलभूत गरजेची पूर्तता ही महत्त्वाची असते. त्यामुळेच तंत्रयुक्त शेतीला आज महत्त्व प्राप्त झाले आहे. शेती विषयात बीएससी डीग्री संपादन करून शेती सल्लागार, फुले-फळे बाग व्यवस्थापक, शेती व्यवस्थापक, जमीन संशोधक असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील मुख्य पर्याय बाजूला ठेवूनही दुग्धव्यवसाय, मासेपालन, कुक्कुटपालन, प्राणी आणि वनस्पती शास्त्र यामध्ये बीएससी करून उत्तम करिअर करता येईल. लिखाणाची आवड असल्यास आपण निवडलेल्या क्षेत्रासाठी वर्तमानपत्र, मासिकांमध्ये लिहिण्याची संधीही मिळू शकते.

होम सायन्स

बारावीनंतर किंवा बीए आणि बीएससीनंतर होम सायन्स करता येते. समाजसेवेपासून, फॅशन डिझायनिंग, कुकरी, टेक्स्टाइल डिझायनिंग, आहारतज्ज्ञ, समुपदेशन, उद्योजकता या विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेता येतं.

इंजिनीअरिंग

मेडिकलप्रमाणे इंजिनिअरिंग शाखेकडेही विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दहावीनंतर डिप्लोमा किंवा बारावीनंतर डीग्रीला प्रवेश घेऊन इंजिनीअरिंगचं शिक्षण केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या प्रसिद्ध शाखांच्या बरोबरीने एरोस्पेस (अंतराळ), पर्यावरण, शेती, भूगर्भशास्त्र, मरिनसारख्या विषयांमध्ये इंजिनीअरिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इंजिनीअरिंगमध्ये चांगलं करिअर करण्यासाठी उपशाखेची योग्य निवड करणं महत्त्वाचं ठरतं. इंजिनीअरिंगमध्ये एखाद्या विशिष्ट शाखेत करिअर करायचं ठरवलं असेल तरच अतिसुक्ष्म अभ्यासक्रम निवडा, अन्यथा केमिकल, सिव्हिल यांसारखे अभ्यासक्रम निवडा.

वाणिज्य शाखा

स्वतंत्र शिक्षण फायदेशीर

बारावीनंतर वाणिज्य शाखेत अतिशय नियमित मानला जाणारा अभ्यासक्रम म्हणजे बीकॉम. तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सहा सेमिस्टर्स व जवळपास चाळीस पेपर समाविष्ट असतात. यातील प्रत्येक सेमिस्टरच्या श्रेणी या अंतिम निकालामध्ये विचारात घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ शेवटच्या वर्षाच्या परीक्षांकडे विशेष लक्ष न देता संपूर्ण सहा सेमिस्टर्सना समान महत्त्व द्यायला हवं. हा अभ्यासक्रम जरी नियमित मानला जात असला तरी यातून अनेक अन्य परीक्षांसाठी पाया निर्माण करण्याचं काम केलं जातं. केवळ बीकॉम करण्याऐवजी विद्यार्थी बीकॉमसोबत करता येणाऱ्या अनेक जोड अभ्यासक्रमांचे पर्याय निवडतात. मात्र पदवी अभ्यासक्रमात लागू केलेल्या सेमिस्टर पद्धतीमुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जसं की अनेकदा सीए व बीकॉमच्या परीक्षांचं वेळापत्रक समान वेळेत असतं. शिवाय १०० तासांचं आयटी प्रशिक्षण महत्त्वाचं असल्यानं अभ्यासात संतुलन बाळगणं कठीण होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बीकॉम+सीए हे एकत्रिकरण करताना विचार करायला हवा. केवळ सीएचे अभ्यासक्रम पुरवणारी अनेक स्वतंत्र विद्यापीठेही आहेत. त्यामुळे बीकॉम परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवून त्यानंतर सीए करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो.

वाणिज्य शाखेतील संधी

वाणिज्य शाखेत नियमित अभ्यासक्रम सोडून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे अनेक पर्याय मागील काही वर्षांत निर्माण झाले आहेत.

सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) : प्राथमिक पातळी (सीपीटी परीक्षा)

द्वितीय पातळी (आयपीसीसी परीक्षा)

अंतिम परीक्षा

यातील आयपीसीसी आणि अंतिम परीक्षा दोन गटात विभागून घेतली जाते. त्यातील पहिला गट उत्तीर्ण झाल्यावर तीन वर्षांची आर्टिकलशिप करणं आवश्यक असतं.

सीएस (कंपनी सेक्रेटरी): प्राथमिक पातळी (फाऊंडेशन प्रोग्राम)

द्वितीय पातळी (एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम)

अंतिम परीक्षा (प्रोफेशनल प्रोग्राम)

बारावीनंतर तीन स्तरांवर परीक्षा घेतल्या जातात. तर पदवीनंतर यातील प्राथमिक पातळीची परीक्षा देण्याची गरज नसते. पदवीनंतर स्वतंत्र सराव करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. याशिवाय एसीसीए हा सीए परीक्षेशी समांतर अभ्यासक्रम, कॉस्ट अकाऊंटिंग अभ्यासक्रम, बॅफ (बँकिंग व फायनान्स), (बँकिंग व इन्शुरन्स) हे अभ्यासक्रमही निवडता येतात. याशिवाय अनेक संस्थांकडून पर्यटन, विमानचालन, क्रीडा व्यवस्थापन, सहल नियोजन, वाहतूक संबंधित व्यावसायिक जोड अभ्यासक्रमही पुरवले जातात. बारावी उत्तीर्ण वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक कायदा विभागातही शिक्षणाचा पर्याय असतो.

ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय

नवनवीन तंत्रज्ञानासोबत शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायी मार्ग निर्माण झाला आहे. देशविदेशातील विविध विद्यापीठांनी हा शिक्षणाचा मार्ग निवडला आहे. आयडॉल या अभ्यासक्रम पद्धतीअंतर्गत नोकरी करणाऱ्यांना याचा विशेष फायदा होऊ शकतो. विविध ऑनलाइन साइट्सवर पुरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक सामग्रीचा म्हणजेच रेकॉर्डेड व्याख्यानं, शंका सोडवण्यासाठीची विशेष सत्रे यांचा वापर करून शिक्षण मिळवणं तसंच त्यातील परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणं या माध्यमातून सहज शक्य आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम कोणत्या विषयाचं शिक्षण घ्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणती वेळ व पद्धत उपयुक्त ठरेल याचा नीट विचार करायला हवा.

ऑनलाइन शिक्षण पुरवणाऱ्या काही वेबसाइट्स : www.goldelearning.com/ , www.coursera.com

कला शाखा

पदवीशिक्षणाच्या जोडीनं इतर अनेक अभ्यासक्रम कलाशाखेच्या माध्यमातून शिकता येतात. त्यामुळे अलीकडे विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे जाण्याचा कल वाढला आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास या विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास संशोधन क्षेत्रात चांगलं करिअर करता येतं. समाजशास्त्रामध्ये उच्चशिक्षण घेतल्यास सरकारी धोरणं, प्रकल्प यांचा अभ्यास, अनेक कंपन्यानंसाठी सीएसआर प्रकल्प करण्याची संधी मिळते. परदेशी किंवा भारतीय भाषांमध्ये पदवी शिक्षण घेतल्यास अनुवादक, दुभाषक बनण्याची संधी मिळू शकते. या व्यतिरिक्त साहित्यामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकार, संवाद लेखक, चित्रपट निर्मिती यांसारख्या नानाविविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते.

योग्य करिअर निवडण्यासाठी काही टिप्स

१) आपल्याला आवडत असलेल्या क्षेत्रात कोणत्या विविध शाखा आहेत याची माहिती घ्या.

२) आपण निवडलेल्या शाखेमध्ये कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी आहेत याचा आढावा घ्या.

३) इंटरनेटच्या साहाय्याने निवडलेल्या शाखेत कशा प्रकारचे काम असते, आजच्या काळात त्या ज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग करता येईल याचा शोध घ्या.

४) आपल्याला आवडणाऱ्या शाखेचे उत्तम शिक्षण देणारी कॉलेजे आणि त्यांची इतर माहिती शोधा.

५) आपले करिअर निश्चित केल्यांनतर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी एकदा नक्की चर्चा करा.

बारावीनंतर करिअर निवडणं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असतं. इंटरनेटवरून होणाऱ्या माहितीच्या भडिमारामुळे नक्की कोणतं क्षेत्र निवडावं याबद्दल विद्यार्थी संभ्रमात असतात. अशावेळी करिअर निवडण्याआधी त्या क्षेत्रामधील व्यवसायाच्या संधी, आर्थिक मोबदला, स्वतःची आवड, कल याचा विचार निश्चितपणे करायला हवा. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून सर्व शंकांचं निरसन करून मगच ते क्षेत्र करिअरसाठी निवडावं.

- आनंद मापुस्कर

वाणिज्य शाखेत करिअरच्या अनेक संधी आहेत. अगदी नियमित अभ्यासक्रमांचं शिक्षण घेऊनही यशस्वी करिअर करता येतं. जे क्षेत्र निवडाल त्यामधील तुमची आवड आणि त्या क्षेत्रातील आर्थिक स्थैर्य याचा पुरेसा अभ्यास अवश्य करा.

- जयंत आपटे

संकलन- सिद्धी शिंदे, मेघना अभ्यंकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 507 articles
Browse latest View live