Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 507 articles
Browse latest View live

एमपीएससी ‘सीएसएटी’ भाग - २

$
0
0

अमित संतोषराव डहाणे

कालच्या लेखात आपण राज्य सेवा पूर्वपरीक्षा यामधील ‘सीएसएटी’ पेपरचे स्वरूप आणि उपघटकांची माहिती पाहिली. आजच्या लेखात आपण ‘सीएसएटी’मधील उपघटकांची गतवर्षीच्या प्रश्नांच्या आधारे तयारी कशाप्रकारे करावी याची मा‌हिती बघू या.

उताऱ्यावरील आकलनांवर आधारित प्रश्न

आपण आधीही बघितले एकूण ८० प्रश्नांपैकी ५० प्रश्न हे उताऱ्यावरील आकलनावर विचारले जातात. यामध्ये उताऱ्यांची संख्या १० आणि प्रत्येकी सरासरी पाच प्रश्न एका उताऱ्यावर विचारलेले आहेत. २०१५ पासून तरी साधारण सर्व उताऱ्यांची संख्या १० अशी राहिलेली आहे. म्हणजेच उताऱ्यावरील प्रश्न सोडवायला अधिक गुण आहेत. एकूण प्रश्नांपैकी उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उतारे व त्यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव अधिक करणे गरजेचे आहे. या १० उताऱ्यांपैकी ८ उतारे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये दिलेले असतात. तर प्रत्येकी एक एक उतारा फक्त मराठी आणि इंग्रजी भाषेत दिलेला असतो. आता आपल्याला असे वाटू शकते, की उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडविणे यात नवीन काय? कारण दहावी, बारावीपर्यंतसुद्धा अशा प्रकारच्या अभ्यासाला सामोरे जावेच लागलेले आहे; परंतु या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की शाळा किंवा विद्यालय पातळीवरील परीक्षांच्या दर्जापेक्षा एमपीएससी परीक्षांचा दर्जा काही पटीने जास्त वरचा आहे. शिवाय कमी वेळेत अचूक पर्याय शोधणे किंवा उत्तर निवडणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

उतारा कसा वाचावा?

उतारा हा दोन भाषांमध्ये असतो. त्यामुळे आपण ज्या भाषेत योग्य प्रकारे आणि सहज व लवकर वाचू शकतो त्याच भाषेत शक्यतो उतारा वाचावा. म्हणजे आपण सराव करतानाच तशा प्रकारचा करावा आणि आपली वाचण्याची भाषा निश्च‌ित करावी. आयोगाचे काही काही उतारे जे मूळ इंग्रजीत आहेत त्यांचे भाषांतर मराठीत केलेले असते. अशा वेळी मराठीतूनसुद्धा उतारा समजण्यास अडचण येते; परंतु सराव करतानाच आपण हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की कोणत्याही उताऱ्याचे तीन प्रमुख भाग असतात जसे पहिली ओळख किंवा विषयाचे ‘इंट्रोडक्शन’ पहिल्या भागात, मग मधल्या भागात मुख्य आशय आणि शेवटच्या भागात निष्कर्ष स्वरूपात काही उपाय किंवा समाधान दिलेले असते. एखाद्या भाषेत वाचताना किंवा समजताना अडचण येत असेल, तर मधला भाग म्हणजेच मुख्य आशय दोन्ही भाषांतून वाचून बघावा म्हणजे अर्थ जास्त स्पष्ट होतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे उतारा काळजीपूर्वक वाचणे फार आवश्यक आहे. सराव करतानाचा उतारा वाचायची आपापली सवय विकसित करणे आवश्यक आहे. जसे पहिले प्रश्न व नंतर उतारा वाचणे किंवा पहिला उतारा वाचणे आणि नंतर प्रश्न. या दोन्ही पद्धती आपापल्या सरावावर अवलंबून आहेत. पहिले प्रश्न वाचून घेतले आणि मग उतारा वाचला, तर प्रश्न वाचण्यामुळे काही प्रमुख शब्द आपल्या लक्षात राहतात आणि उतारा वाचताना मग आपण त्या शब्दांच्या जवळील माहिती आणखी लक्षपूर्वक वाचतो जेणेकरून आपल्याला उतारा समजायला मदत होते; परंतु हे आपण सराव कोणत्या पद्धतीने करतो त्यावर अवलंबून आहे.

उतारे हे वेगवेगळ्या विषयांशी निगडित असतात जसे पर्यावरण, सामाजिक विषय, अर्थव्यवस्था, राज्यघटना आदी. अशा वेळेस उताऱ्यात जी म‌ाहिती दिलेली आहे तेवढ्या माहितीचा आधार घेऊनच प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. कारण वर उल्लेखिलेल्या विषयांवर जर उतारा आला तर या विषयासंदर्भात आपल्याला असलेल्या ज्ञानाचा वापर आपण करण्याची भीती असते तसे होऊ न देणे.

उताऱ्यांची निवड

दहा पैकी दहा उतारे सोडवायलाच पाहिजेत, असा अट्टहास करणे योग्य नसते. कारण दहापैकी दोन/तीन उतारे क्लिष्ट क‌िंवा तत्त्वज्ञान विषयाला धरून येतात. त्यामध्ये उताऱ्यांवरील प्रश्नांची अचूकता जास्त राहात नाही. म्हणून उतारा कोणता सोडवायचा हेसुद्धा महत्त्वाचे आहे. उताऱ्यावरील प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त अचूकता असणे गरजेचे आहे.

उताऱ्यांचा सराव

उतारा सोडविण्याचा सराव कसा करता येईल, हे बघू या. तुम्ही यासाठी बाजारातील उताऱ्यासाठी उपलब्ध पुस्तके घेऊन रोज दुपारी ३ ते ४ या वेळेत साठ मिनिटांत दहा उतारे सोडविण्याचा सराव करणे उत्तम. ३ ते ४ या वेळेतच का? कारण याच वेळेत आयोगाचा पेपर दुपारी ३ ते ५ असा असतो. आपल्याला १२० म‌िनिटांत उताऱ्यांवरील ५० प्रश्न, अधिक बुद्धिमत्ता अंकगणित यावरील २५ प्रश्न आणि निर्णयप्रक्रिया यांवरील पाच प्रश्न असे ८० प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणून सराव करतानाच ६० मिनिटांत १० उतारे सोड‌विण्याची सवय करणे उपयुक्त ठरते. म्हणजेच एक उतारा वाचणे व प्रश्न सोडविणे यास सरासरी सहा मि‌निटे असे वेळेचे नियोजन करावे लागते. यासाठी कमी वेळेत जास्त वाचून आणि वाचलेल्या उताऱ्याचे व्यवस्थित आकलन होऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. यासाठी आपण वृत्तपत्रांतील संपादकीय उताऱ्यांची वाचण्याची सवय करणे उपयुक्त ठरते. जरा मला एखादे संपादकीय वाचायला १५ मिनिटे लागत असतील, तर ते मी सराव करून १० मिनिटे, मग आठ मिनिटे इतके जलद वाचून जे समजले, समजलेले मुद्दे लिहून काढणे अर्थ काय असू शकतो, अशा प्रकारे आपलाच उतारा कमी वेळेत वाचून त्याचा अर्थ समजणे अशी सवय विकसित करू शकतो. याशिवाय जास्तीत जास्त सराव चाचण्या तेही वेळ लावून सोडविणे गरजेचे आहे.‍

आता परीक्षेकरिता साधारणपणे ६० दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. या ६० दिवसांत रोज दहा उतारे एक तासात सोडविणे आणि १० उताऱ्यांवरील ५० प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आहेत याचे चिकित्सक विश्लेषण करून प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त अचूकता कशी आणता येईल यावर लक्ष देणे. उतारे सोडविणे, त्याचे वेळेचे नियोजन, प्रश्नांची अचूकता या सर्व बाबी दररोजच्या सरावाने साध्य करता येऊ शकतात. त्यामुळेच 'Practice makes man/woman perfect' या तत्त्वावर सरावांद्वारे आपण या घटकाची तयारी करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यूपीएससी पूर्वपरीक्षा नियोजन

$
0
0

डॉ. सुशील बारी

या लेखात आपण येत्या काळात यूपीएससी पूर्वपरीक्षेचे नियोजन कसे असावे? यावर प्रकाश टाकणार आहोत. आपण पूर्वपरीक्षेचे स्वरूप त्यासाठीचा अभ्यासक्रम पाहिला आहे. आयोगाद्वारे निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचे विस्तृत स्वरूपही आपण पाहिले आहे. आता या पुढचा टप्पा म्हणजे नेमके यासाठीचे नियोजन कसे असायला हवे? नियोजन करताना आपण कशाबाबतीने वेळ व अभ्यासातील घटक यांचा ताळमेळ बसवणार आहोत. यासाठी खालीलप्रमाणे महत्त्वाच्या बाबी आपण समजून घेणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रम व अभ्यासक्रमातील संकल्पना समजून घेणे -
आयोगाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम समजून घेत असताना आयोगाला त्यातून नेमकं काय अपेक्षित आहे. ते समजून घेणे, उदा. आयोग कधीही २०१७च्या ‘जीडीपी’मध्ये रुची दाखवत नाही. यूपीएससीला आकडेवारीत नाही, तर संकल्पनेत रुची आहे. म्हणजे जीडीपी काय असतो हे विचारले जाण्याची शक्यता ९९.९९ टक्के आहे. जीडीपी ८ होता की ७ टक्के हे विचारण्याची शक्यता नसते. यावरून एक बाब स्पष्ट झाली, ते म्हणजे आपण ‘जीएस’चा अभ्यास करताना संकल्पना समजून घेणं ही काळाची गरज आहे.
‘सीएसएटी’च्या बाबतीतीही Logical reasoning, Data interprets, Reading Comprehension या संकल्पना नीट समजून घेतल्यात तरच आपण प्रश्न सोडवू शकतो.
गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका समजून घेणे -
कुठलीही परीक्षा समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या परीक्षेतील गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका होय. यावरून दोन बाबी स्पष्ट होतात. १) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्यात कालानुरूप होणारे बदल.
२) प्रश्न विचारण्याची पद्धती.
या दोन बाबी जर नीट लक्षात घेतल्यात तरच आपण या परीक्षेला यशस्वीरीत्या सामोरे जाऊ शकतो. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता १९७९ पासून उपलब्ध आहेत. त्यावरून आपण एकंदर आयोगाची वृत्ती जाणून घेऊ शकतो. २०१९ चा विचार करता आपण किमान २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिकांवर भर देणे गरजेचे आहे. कारण नजीकच्या काळातील बदल आपणास अभ्यासासाठी दिशा व नियोजन ठरविण्याकरिता अधिक उपयुक्त असतात. उदा. २०१६पासूनचा विचार केल्यास चालू घडामोडींचे वाढते प्रमाण लक्षात येते. संकल्पनांबरोबरच तथ्य यावरही भर दिलेला स्पष्टप्णे दिसून येतो.

कमीत कमी संदर्भपुस्तके जास्तीत जास्त वेळा वाचा -
यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिताची संदर्भपुस्तके काळजीपूर्वक निवडावीत. याकरिता गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा आधार व विद्यार्थ्यांचे अनुभव या दोन घटकांचा विचार घेणे कधीही उपकारक ठरते. कमीत कमी पुस्तके जास्तीत जास्त वेळा वाचल्यास आपणास त्यातून चांगले गुण मिळतात. सरळ सांगायचे तर एकाच घटकासाठी चार पुस्तके वाचण्यापेक्षा तुम्ही एक पुस्तक चार वेळा वाचा. यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठीच्या संदर्भग्रंथांची यादी आपण प्रकाशित केलेली आहे. आज स्पर्धापरीक्षेच्या जगात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. तेव्हा नव्याने येणाऱ्या व उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांमध्ये आपण हरवता कामा नये. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, त्याचा विचार करून पुस्तकांचे वाचन व्हायला हवे. हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे.

इंटरनेटचा चाणाक्ष वापर
स्पर्धापरीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे नेमके स्वरूप पाहता पुस्तकांच्या मर्यादाही स्पष्ट होतात, असे असताना इंटरनेट हे प्रभावी माध्यम म्हणून समोर येते. तेव्हा इंटरनेटचा चाणाक्ष वापर होणे, ही इथली गरज आहे. एखाद्या विषयाबद्दल सखोलतेने जाणून घेण्यास याचा वापर होतो. पूर्वपरीक्षेचा विचार करता खूप जास्तीची माहिती उपयुक्त ठरत नाही. यासाठी त्या त्या विषयाबद्दलचे किमान ज्ञान असणे गरजेचे असते. इंटरनेटचा वापर करताना सामाजिक माध्यमांमध्ये गुरफटता कामा नये. बहुतेक विद्यार्थी वास्तव व आभासी जीवनात फरकतच करू शकत नाहीत. तेव्हा इंटरनेट हे ‘टू वे सोर्ड’ म्हणजेच ‘दुधारी तलवार’ आहे हे समजून घ्यावे.

अधिकाधिक प्रश्नपत्रिका सोडवा
स्पर्धापरीक्षांचे स्वरूप पाहता व त्यासाठीची स्पर्धा पाहता आपण अधिकाधिक सराव करणे गरजेचे आहे. पूर्वपरीक्षेचे स्वरूप हे MCQ आहे. तेव्हा या परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्याकरीता MCQ सोडविण्याचा सराव करणे गरजेचे आहे. चांगली ‘टेस्ट सीरिज’ लावून दोन तास बसून प्रश्नपत्रिका सोडविणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. यामुळे वेळेचे नियोजन परीक्षेचे वातावरण, आपली मानसिक स्थिती या सर्व घटकांप्रती आपण स्वयंअनुभूतीने अधिकाधिक सजग बनत जातो. चांगली ‘टेस्ट सीरिज’ म्हणजे आयोगानुसार प्रश्न जिथे विचारले जातात ती होय. यासाठी तुम्हाला गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहणे क्रमप्राप्त होते.

वेळेचे नियोजन
वेळेचे नियोजन दोन प्रतलावर करावे लागते -
१) दैनंदिन वेळेचे नियोजन - दररोज अभ्यास करताना
२) परीक्षेच्या वेळी पेपर सोडवताना
यात काही प्रश्न नेहमीच विचाले जातात, ते म्हणजे किती वेळ अभ्यास करावा? कोणत्या घटकाला किती वेळ द्यावा? अभ्यास किती वेळ करतो, याला महत्त्व नाही, तर अभ्यासाची गुणवत्ता इथे महत्त्वाची असते. दुसरे म्हणजे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून ज्या घटकांवर अधिक प्रश्न विचारले जातात, त्याला अधिक वेळ देणे गरजेचे असते.

सकारात्मक दृष्टिकोन
नेहमीच प्रत्येक गोष्टीकरिता तुमचा दृष्टिकोण सकारात्मक हवा. बेंजामिन फ्रँकलिनने म्हटल्याप्रमाणे If you fail to plan, you are planning to fail हे सदैव लक्षात असू द्या. DrSushils spotlight या युट्युब व टेलीग्राम चॅनेलला नियोजनातील प्रत्येक घटकाच्या विशेलेषणासाठी भेट द्या. नियोजन हा यशाचा गाभा असतो, हे लक्षात घेऊन तुम्ही यूपीएससी पूर्वपरीक्षेला सामोरे जाणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससी पूर्व परीक्षा : इतिहास २

$
0
0

अमित संतोषराव डहाणे

आजच्या लेखातून आपण मध्ययुगीन इतिहासावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती घेऊ या. मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड साधाणत: इ.स. ६०० ते १६०० पर्यंत असा बराच मोठा आहे. या कालखंडात प्रामुख्याने भारतातील सामंतशाही, अनेक परकीय आक्रमणे, त्यापैकी प्रमुख मुघल साम्राज्याचा पाया, त्याचा विस्तार, त्यांचा ऱ्हास अशा बाबींचा अभ्यास करावा लागतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासात दिल्ली सल्तनतला फार महत्त्व राहिले आहे. भारतावर झालेली विविध आक्रमणे आणि या आक्रमणातून दिल्लीत विविध घराण्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. भारतावर प्रथम इ. स. ७१२मध्ये महंमद बिन कासिम याने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव करून सिंध जिंकले होते. तर दहाव्या शतकात गझनीचा महंमद याने संपत्तीसाठी भारतावर सतरा स्वाऱ्या केल्या. ११९१च्या पहिल्या तराईच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहानने महंमद घौरीचा पराभव केला, तर ११९२च्या दुसऱ्या तराईच्या लढाईत घौरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. इ. स. १२०६मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने लाहोर येथे भारतातील प‌हिल्या मुस्ल‌िम राज्याची स्थापना केली.

तुर्कांच्या पाठोपाठ १३व्या शतकात सुरुवातीला दिल्ली सुलतानशाहीचे (सल्तनतचे) साम्राज्य अस्तित्वात आले. दिल्लीवर सल्तनतीची सत्ता सुमारे तीन शतके होती. या घराण्यातील सर्व राजे हे खलिफाच्या नावाने राज्य करीत व स्वत:स त्याचे सुलतान (प्रतिनिधी) म्हणत. म्हणून या काळाला सल्तनत असे म्हणतात. दिल्ली सल्तनतचे घराणे जसे गुलाम घराणे, खिलजी घराणे, तुघलक घराणे आदी. या घराण्यातील शासक, त्यांचा क्रम, त्यांचा साम्राज्यविस्तार, त्यांनी बांधलेल्या वास्तू आदींविषयी अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. गुलाम घराण्यातील कुतुबुद्दीन ऐबक इल्तुतमिश, रझिया सुलतान इत्यादी शासक. खिलजी घराण्यातील अल्लाउद्दीन खिलजी, महंमद बिन तुघलक, फिरोजशहा तुघलक आदी शासकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

मुघल साम्राज्य, यातील शासक मुघल सम्राट, त्यांचा शासन काळ, त्यांचा क्रम अभ्यासावे लागते. कार्यकाळानुसार बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान व औरंगजेब आदी ग्रेट मुघल्स आणि औरंगजेबानंतरची लेहर मुघल्स म्हणून संबोधले जाणारे मुघल शासक, त्यांचा कार्यकाळ, महत्त्व व वैशिष्ट्ये अभ्यासावे लागते. बहादूरशहा, फर्रुखसिअर, महंमदशाह, अहमदशाह, आमगीर शाह आलम, अकबर शाह दुसरा, बहादूर शाह दुसरा आदी शासकांवरसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात.

यासोबतच राजपूत राजे, बहामनी राज्य, विविध शाह्या जसे आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, कुतुबशाही, बरिदशाही, विजयनगर साम्राज्य अशा वेगवेगळ्या घटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत. मध्ययुगीन भारतातील मराठा साम्राज्य, त्यातील शासक, शासकांचे कार्य आदींविषयी माहिती अभ्यासणे आवश्यक आहे.

प्रश्न. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

अ) त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले.

ब) तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता.

क) दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा.

ड) ज्याच्या दरबारात आमिर खुसरो हा नामवंत कवी होता.

१) अल्तमश २) महंमद तुघलक ३) अल्लाउद्दीन खिलजी ४) कुतुबुद्दीन ऐबक

उत्तर : ३) अल्लाउद्दीन खिलजी हा शासक भारताच्या मध्ययुगीन इतिहासात प्रसिद्ध आहे. हा तुर्क सुलतान होता ज्याने राज्य व धर्म वेगळे केले.

प्रश्न. पुढील विधानात कोणाचे वर्णन केले होते ?

मुळात तो तुर्कस्तानमधील एक गुलाम होता. त्याच्या लहानपणी व्यापाराने त्याला निशापूरला आणले. त्याला काझी फकरुद्दीन अब्दुल अझीम कुफी यांनी विकत घेतले. काझीच्या मुलाने त्याला एका व्यापाऱ्याने विकले आणि व्यापाऱ्याने त्याला महंमद घौरीला विकले.

१)कुतुबुद्दीन ऐबक २) बल्बन ३) इखत्यारउद्दीन महंमद ४) अल्मतशाह

उत्तर : कुतुबुद्दीन ऐबक

अशा प्रकारे दिल्ली सल्तनतशी संबंधित असलेले प्रमुख शासक, त्यांच्या वैशिष्ट्यांवर प्रश्न विचारलेले दिसतात.

प्रश्न. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

अ) या राजास 'आंध्रभोज' ही पदवी देण्यात आली होती.

ब) त्याच्या दरबारात आठ प्रसिद्ध तेलगू कवी होते.

क) 'नागलपूरम' नावाचे नगर त्याने स्थापन केले होते.

ड) बिदर, गुलबर्गा या मुसलमान राज्यांना जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.

१) रामदेव राय २) पुलकेशी प्रथम ३) पहिला परान्नक ४) कृष्णदेवराय.

उत्तर : कृष्णदेवराय

अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने मध्ययुगीन भारतावर विचारलेले आहेत. मुघल राज्यकर्ते, त्यांच्यातील सत्तासंघर्ष, त्यांची कामे, त्यांच्या काळात निर्माण झालेली वास्तूशैली, चित्रकला, साहित्य, अर्थव्यवस्था कररचना इत्यादींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. भक्ती चळवळ व सुफी चळवळ, त्यांच्याशी संबंधित भारुडे, गाथा, अभंगांची रचना आदींवरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकांसाठी एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके किंवा त्याची मराठीत उपलब्ध असलेली भाषांतरित पुस्तके किंवा महाराष्ट्र बोर्डाची क्रमिक पुस्तके संदर्भसाहित्य म्हणून वापरता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी: वृत्तपत्र वाचन

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससीचा अभ्यास करताना सर्वांत महत्त्वाची बाब असते, वृत्तपत्र वाचन! वृत्तपत्र हे स्पर्धापरीक्षेचा कणा आहे. ‘वृत्तपत्राशिवाय स्पर्धापरीक्षेचा विचार’ म्हणजे रामाशिवाय रामलीला आयोजित करण्यासारखे आहे. वृत्तपत्राचा विचार करताना राष्ट्रीय पातळीवरच्या ‘The hindu’ व ‘Indian Express’ या दोन इंग्रजी वृत्तपत्रांचा विचार महत्त्वाचा ठरतो. अर्थव्यवस्थेबद्दलची सखोल माहिती देणारे ‘Economics Times’ हे वृत्तपत्रही विद्यार्थीवर्गाला उपकारक ठरते.

१) वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व ः स्पर्धापरीक्षेत जेव्हा पूर्व व मुख्य परीक्षेचा पेपर तयार केला जातो, तेव्हा प्रश्न हे वृत्तपत्राच्या आधारे विचारण्याचा आयोगाची वृत्ती दिसून येते. काही प्रश्न हे जसेच्या तसे विचारले जातात, तर काही प्रश्न हे अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनांशी संबंधित असतात ज्याला आपण Current Based basic असे संबोधतो. विद्यार्थ्याची वैचारिक जडणघडण वृत्तपत्राच्या आधारे अधिकाधिक समृद्ध होत जाते. ज्याचा उपयोग मुलाखतीच्या वेळेस होताना आपण पाहतो.

२) वृत्तपत्र व स्पर्धापरीक्षा मासिक ः बऱ्याचदा असे दिसून येते की, वृत्तपत्र वाचण्यापेक्षा Chronicle, Civil Times वा युनिक बुलेटिन या मासिकांचा वापर विद्यार्थी करतात. मासिक हे स्पर्धा परीक्षेला समोर ठेवूनच बनलेले असते; परंतु ते वृत्तपत्राची जागा घेऊ शकत नाही. चालू घडामोडीतील विविध विषयांवर वृत्तपत्रात जे लिखाण होते त्यातली विविधता, विषयाच्या सर्व कंगोऱ्यांना समावून घेण्याची क्षमता यात वृत्तपत्र मासिकांपेक्षा सरस ठरते.

३) वृत्तपत्राची भाषा ः वृत्तपत्राची स्वतःची एक भाषाशैली असते. ती समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असते. ‘The Hindu’ या वृत्तपत्राचा विचार केल्यास भाषा ही इतर वृत्तपत्रांपेक्षा जरा वेगळ्या धाटणीची असल्याने सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना जुळवून घेणे जरा अवघड जाते. वृत्तपत्रात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अवलोकन न झाल्यामुळे नेमका अर्थ उमगत नाही. त्यासाठी सुरुवातीच्या काळात शब्दकोषाचा वापर करणे गरजेचे असते.

४) वृत्तपत्र वाचनाची वेळ ः सकाळी मनाची एकाग्रता चांगली असल्याने या वेळी अभ्यासक्रमातील इतर घटकांचा अभ्यास करावा. दुपारची वेळ ही वृत्तपत्रासाठी अनुकूल असते. कारण वृत्तपत्र वाचताना अभ्यास करत असल्याची जाणीव नसते. दुपारची वेळ जरा आळस आणणारी असल्याने वृत्तपत्राचे वाचन त्या काळात केल्यास वेळेचा सदुपयोग होतो.

५) वृत्तपत्र वाचनासाठी किती वेळ द्यावा ः जास्तीजास्त दोन तास आपण वृत्तपत्र वाचनासाठी देऊ शकतो. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्र वाचन यापेक्षा अधिक काळ होऊ शकते. कारण विद्यार्थ्यांसाठी भाषा नविन असणे, Vocabulary संपन्न नसणे यातून हे घडत जाते. नियमित वाचन केल्यास वेळ कमी होत जातो व वृत्तपत्राच्या भाषेशी आपली समरसता वाढत जाते.

६) वृत्तपत्र वाचनातील सातत्य ः रोजचे वृत्तपत्र रोज वाचून झाले पाहिजे. अन्यथा दुसऱ्या दिवसातील अभ्यासाचे नियमन कोलमडते.

७) वृत्तपत्राच्या नोट्स काढाव्यात का? दररोज वृत्तपत्र नियमित, लक्षपूर्वक वाचल्यास नोटसची गरज पडत नाही कारण वृत्तपत्राबरोबर युनिक बुलेटिनसारखे मासिकही आपण अभ्यासणार आहोत, ज्यात परीक्षाभिमुख मुद्दे असतात.

८) वृत्तपत्रातील महत्त्वाचे वाचनाचे मुद्दे ः
- मुख्यपृष्ठ ः यावरील बातम्या परीक्षेसाठी तेवढ्याशा उपयोगी नसतात. फक्त Headline वाचून घेणे.
- प्रादेशिक बातम्या ः प्रादेशिक बातम्याही परीक्षेसाठी महत्त्वाच्या नसतात उपवाद ः जर हितसंबंधांचा विचार त्यात असेल तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
- राष्ट्रीय बातम्या ः या परीक्षेसाठी खुप महत्त्वाच्या असतात यात केंद्रसरकारचे निर्णय, प्रशासन, सर्वोच्च-उच्च न्यायालय, संसद इ. संबंधी बातम्या असतात. यूपीएससीच्या अभ्यासक्रमातील घटकात या सर्वांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
- संपादकीय ः यूपीएससीच्या परीक्षेसाठी सर्वांत महत्त्वाचा असा हा घटक असून, यात चालू घडामोडींवर लेख प्रकाशित होत असतात जे मुख्य परीक्षा मुलाखत यासाठी खूप महत्त्वाचे असतात. संपादकीय लेखात विद्यार्थ्यांने विषय नीट समजून संतुलीत मत बनविणे ही काळाची गरज आहे. बऱ्याचदा लेख हे विशिष्ट प्रवृत्तीला अनुसरून लिहिलेले असतात. ते समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते.
- अर्थव्यवस्थेबद्दल बातम्या ः यात मूलभूत संकल्पना, जसे मैद्रिक धोरण, राजकोषिय धोरण यांना समजून घेणे व अभ्यासक्रमाशी जोडून घेणे आवश्यक असते.
- विज्ञान-तंत्रज्ञान ः The Hindu या वृत्तपत्राची गुरुवारची पुरवणी यासाठी उपयोगी ठरते.
- खेळ ः गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास असे लक्षात येते की यूपीएससी या घटकावर विशेष प्रश्न विचारत नाही तेव्हा यासाठी वेळ देऊ नये.
- विशिष्ट व्यक्तींची विधाने ः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ. महत्त्वाच्या व्यक्तींची विधाने नीट वाचवित त्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. उदा. ‘Geography may remain the same history need not’ या निबंधाला माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या भाषणाचा संदर्भ होता.

९) आंतरराष्ट्रीय घडामोडी ः GS II च्या अभ्यासक्रमातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वाचन महत्त्वाचे असून उदा. मालदिवमध्ये आणीबाणी लागू केल्याने त्याचा इतर देशांवर, प्रामुख्याने भारतावर होणारा परिणाम अभ्यासणे गरजेचे असते. यासाठी वृत्तपत्रातील लेख उपकारक ठरतात.

१०) गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका ः गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासून वृत्तपत्र वाचनात अधिकाधिक सूसूत्रता आणता येते. १९७९ ते २०१७ पर्यंतच्या यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या उत्तरासहित प्रश्नपत्रिका व दररोजच्या राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रांसाठी (जाहिरात विरहित) ‘Dr Sushils spotlight’ या Telegram channel ला व YouTube Channel ला भेट द्या. Link: https://t.me/DrSushilsSpotlight अशाप्रकारे यूपीएससीतील वृत्तपत्राचे महत्त्व समजून, नियमित वाचन करणे हे विद्यार्थ्यांसाठी सदैव हितकारक असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा : चालू घडामोडी

$
0
0

- डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षेत चालू घडामोडीचे महत्त्व गेल्या चार वर्षांत खूपच वाढलेले दिसत आहे. चालू घडामोडींतून सरळ सरळ प्रश्न विचारलेले आहेत. मूलभूत संकल्पनांवर विशेष भर असणारी पूर्वपरीक्षा आता चालू घडामोडींकडे वळलेली असून २०१६ हे वर्ष यासाठी 'टर्निंग पॉइंट' म्हणून पाहिले जाते. पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यास आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर विशेष भर असून त्याचे प्रतिबिंब पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत पडलेले दिसते. प्रश्नाचा नमूना पाहूयात.

Q. European stability mechanism sometimes seen in the news, is an

(a) agency created by EU o deal with the impact of millions of refugees arriving from Middle East

(b) agency of EU that provides financial assistance to eurozone countries

(c) agency of EU to deal with all the bilateral and multilateral agreements on trade.

(d) agency of EU to deal with the conflicts arising among the member countries.

Ans : (b)

चालू घडामोडींचा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने विचार करताना दोन पद्धतीने केला जातो.

१) सर्वप्रथम चालू घडामोडींवर सरळ प्रश्न विचारला जाणे. ज्याचे प्रमाण पूर्वपरीक्षेत दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसून येते. याचे उदाहरण पाहू.

Q. A recent movie titled The Man Who Knew Infinity is based on the biography of

(a) S. Ramanujan, (b) S. Chandrasekhar, (c) S. N. Bose, (d) C. V. Raman

Ans : (a)

२०१६ मध्ये The Man Who Knew Infinity हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावरून सरळ सरळ हा प्रश्न विचारला गेला होता.

(२) चालू घडामोडींवर दुसऱ्या पद्धतीने विचारले जाणारे प्रश्न म्हणजे मूलभूत संकल्पनांवर विचारले जाणारे प्रश्न होय. चालू घडामोडींचा अभ्यासक्रमाच्या मूलभूत संकल्पनांशी असणारा संबंध समजून त्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती नेहमीचीच आहे. यावर आधारित प्रश्न पाहूयात.

Q. The terms 'Event Horizon', 'Singularity', 'String Theory' and 'Standard Model' are sometimes seen in the news in the context of

(a) Observation and understanding of the Universe

(b) Study of the solar and the lunar eclipses

(c) Placing satellites is the orbit of the Earth

(d) Origin and evolution of living organisms on the Earth

Ans : (a)

अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इतिहास, भूगोल, पर्यावरण, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचा व त्यातील अभ्यासक्रमाशी संबंधित, मूलभूत संकल्पनांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित ठरते. विषयवार लेखात आपण त्यासंबंधीच्या बाबतीत बघितले आहे. दर वर्षी केंद्र सरकारद्वारे विविध विषयांवर समित्यांचे गठन केले जाते. त्यावरही प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपणास दिसून येते. उदा.

Q. Gadgil Committee Report and Kasturirangan Committee Report sometimes seen in the news, are related to

(a) Constitutional reforms (b) Ganga Action Plan, (c) Linking of rivers (d) Protection of western ghats

Ans : (d)

समित्यांचा अभ्यास करताना समितीचे नाव अध्यक्षांच्या नावाने असते. समितीचे गठन करण्यामागचा उद्देश व समितीद्वारे सु‌चविलेल्या सूचना, त्यातील नेमक्या कोणत्या सूचना शासनाद्वारे स्वीकारल्या गेल्यात, कोणत्या स्वीकारल्या नाहीत व त्या न स्वीकारण्यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे ठरते.

बिटकॉइनसारख्या आभासी चलनावरही आयोगाद्वारे प्रश्न विचारला आहे. १८५७च्या उठावाआधी 'पाइक उठाव' हा भारतातील ब्रिटिशांविरोधातील पहिला उठाव होता, हे नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असल्याने त्यावर येत्या काळात प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालू घडामोडी नेमका कोणत्या दिशेने अभ्यास करावा याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वृत्तपत्रांचे नियमित वाचन व त्यातून नव्याने निघणाऱ्या अभ्यासक्रमाशी संबंधित बाबींचा पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास क्रमप्राप्त ठरतो, यासाठी पुढील प्रश्न पाहा.

Q : Recently, India's First National Investment and manufacturing zone was proposed to be set up in

A. Andhra Pradesh

B. Gujarat

C. Maharashtra

D. Uttar Pradesh

Answer : A

वरील प्रश्नावरून हे स्पष्ट होते, की फक्त वृत्तपत्रवाचन नियमित असले, तरी यूपीएससी पूर्वपरीक्षेत त्याचा फायदा नक्की होतो, हे २०१६च्या पूर्वपरीक्षेने सिद्ध केले आहे. चालू घडामोडींचा अभ्यास करताना खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

१. पर्यावरण, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान यासंबंधीच्या आंतराष्ट्रीय घडामोडींचा नियमित आढावा घेणे.

२. आंतरराष्ट्रीय करार, संस्था यांचा संबंध तपासून त्यामागचा उद्देश लक्षात घेणे.

३. भारतीय राज्यव्यवस्था व संविधान यासंबंधीच्या चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करणे. उदाहरणार्थ 'कलम ३५ अ' चर्चेत आहे, तर त्यामागचे कारण व 'कलम ३५ अ' समजून घेणे.

४. इतिहासातील कोणत्या घटनांना ७५, १००, १५०, २०० वर्षे पूर्ण होत असतील, तर त्या घटनांचा मागोवा घेणे. इतिहासातील व्यक्ती व त्यांच्या कार्याबद्दल चालू घडामोडींतील संदर्भ जाणून घेणे.

५. नियमित चालू घडामोडींचा अभ्यास करणे. परीक्षेच्या वेळी एकदम सर्व करू, असे करू नये.

संदर्भ : PIB, PRS, योजना व कुरुक्षेत्र मासिक, राष्ट्रीय दैनिक : उदा. इकॉनॉमिक टाइम्स, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, दैनंदिन चालू घडामोडींसाठी 'DrSushilsSpotlight' या यू-ट्यूब/टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. LINK : t.me/DrSushilsSpotlight, यूनिक बुलेटिन : द यूनिक अकॅडमी प्रकाशन

अशा प्रकारे यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठीचे सर्व घटक आपण 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'यशाचा मटा मार्ग' या सदरातून पाहिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना आगामी पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या कष्टावर विश्वास असू द्या व प्रामाणिकपणे कष्ट घेऊन परीक्षेला सामोरे जा. यूपीएससी परीक्षेला सामोरे जात असताना एक बाब नेहमीच लक्षात असू द्या : 'ओले मूळ भेदी, खडकाचे अंगा, अभ्यासाची संग, कार्यसिद्धी।।'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा : चालू घडामोडी

$
0
0

- डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षेत चालू घडामोडीचे महत्त्व गेल्या चार वर्षांत खूपच वाढलेले दिसत आहे. चालू घडामोडींतून सरळ सरळ प्रश्न विचारलेले आहेत. मूलभूत संकल्पनांवर विशेष भर असणारी पूर्वपरीक्षा आता चालू घडामोडींकडे वळलेली असून २०१६ हे वर्ष यासाठी ‘टर्निंग पॉइंट’ म्हणून पाहिले जाते. पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यास आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर विशेष भर असून त्याचे प्रतिबिंब पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत पडलेले दिसते. प्रश्नाचा नमूना पाहूयात.

Q. European stability mechanism sometimes seen in the news, is an
(a) agency created by EU o deal with the impact of millions of refugees arriving from Middle East
(b) agency of EU that provides financial assistance to eurozone countries
(c) agency of EU to deal with all the bilateral and multilateral agreements on trade.
(d) agency of EU to deal with the conflicts arising among the member countries.
Ans : (b)

चालू घडामोडींचा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने विचार करताना दोन पद्धतीने केला जातो.

१) सर्वप्रथम चालू घडामोडींवर सरळ प्रश्न विचारला जाणे. ज्याचे प्रमाण पूर्वपरीक्षेत दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसून येते. याचे उदाहरण पाहू.
Q. A recent movie titled The Man Who Knew Infinity is based on the biography of
(a) S. Ramanujan, (b) S. Chandrasekhar, (c) S. N. Bose, (d) C. V. Raman
Ans : (a)
२०१६ मध्ये The Man Who Knew Infinity हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावरून सरळ सरळ हा प्रश्न विचारला गेला होता.

(२) चालू घडामोडींवर दुसऱ्या पद्धतीने विचारले जाणारे प्रश्न म्हणजे मूलभूत संकल्पनांवर विचारले जाणारे प्रश्न होय. चालू घडामोडींचा अभ्यासक्रमाच्या मूलभूत संकल्पनांशी असणारा संबंध समजून त्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती नेहमीचीच आहे. यावर आधारित प्रश्न पाहूयात.
Q. The terms ‘Event Horizon’, ‘Singularity’, ‘String Theory’ and ‘Standard Model’ are sometimes seen in the news in the context of
(a) Observation and understanding of the Universe
(b) Study of the solar and the lunar eclipses
(c) Placing satellites is the orbit of the Earth
(d) Origin and evolution of living organisms on the Earth
Ans : (a)
अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इतिहास, भूगोल, पर्यावरण, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचा व त्यातील अभ्यासक्रमाशी संबंधित, मूलभूत संकल्पनांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित ठरते. विषयवार लेखात आपण त्यासंबंधीच्या बाबतीत बघितले आहे. दर वर्षी केंद्र सरकारद्वारे विविध विषयांवर समित्यांचे गठन केले जाते. त्यावरही प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपणास दिसून येते. उदा.
Q. Gadgil Committee Report and Kasturirangan Committee Report sometimes seen in the news, are related to
(a) Constitutional reforms (b) Ganga Action Plan, (c) Linking of rivers (d) Protection of western ghats
Ans : (d)
समित्यांचा अभ्यास करताना समितीचे नाव अध्यक्षांच्या नावाने असते. समितीचे गठन करण्यामागचा उद्देश व समितीद्वारे सु‌चविलेल्या सूचना, त्यातील नेमक्या कोणत्या सूचना शासनाद्वारे स्वीकारल्या गेल्यात, कोणत्या स्वीकारल्या नाहीत व त्या न स्वीकारण्यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे ठरते.

बिटकॉइनसारख्या आभासी चलनावरही आयोगाद्वारे प्रश्न विचारला आहे. १८५७च्या उठावाआधी ‘पाइक उठाव’ हा भारतातील ब्रिटिशांविरोधातील पहिला उठाव होता, हे नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असल्याने त्यावर येत्या काळात प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालू घडामोडी नेमका कोणत्या दिशेने अभ्यास करावा याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वृत्तपत्रांचे नियमित वाचन व त्यातून नव्याने निघणाऱ्या अभ्यासक्रमाशी संबंधित बाबींचा पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास क्रमप्राप्त ठरतो, यासाठी पुढील प्रश्न पाहा.

Q : Recently, India’s First National Investment and manufacturing zone was proposed to be set up in
A. Andhra Pradesh
B. Gujarat
C. Maharashtra
D. Uttar Pradesh
Answer : A
वरील प्रश्नावरून हे स्पष्ट होते, की फक्त वृत्तपत्रवाचन नियमित असले, तरी यूपीएससी पूर्वपरीक्षेत त्याचा फायदा नक्की होतो, हे २०१६च्या पूर्वपरीक्षेने सिद्ध केले आहे. चालू घडामोडींचा अभ्यास करताना खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
१. पर्यावरण, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान यासंबंधीच्या आंतराष्ट्रीय घडामोडींचा नियमित आढावा घेणे.
२. आंतरराष्ट्रीय करार, संस्था यांचा संबंध तपासून त्यामागचा उद्देश लक्षात घेणे.
३. भारतीय राज्यव्यवस्था व संविधान यासंबंधीच्या चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करणे. उदाहरणार्थ ‘कलम ३५ अ’ चर्चेत आहे, तर त्यामागचे कारण व ‘कलम ३५ अ’ समजून घेणे.
४. इतिहासातील कोणत्या घटनांना ७५, १००, १५०, २०० वर्षे पूर्ण होत असतील, तर त्या घटनांचा मागोवा घेणे. इतिहासातील व्यक्ती व त्यांच्या कार्याबद्दल चालू घडामोडींतील संदर्भ जाणून घेणे.
५. नियमित चालू घडामोडींचा अभ्यास करणे. परीक्षेच्या वेळी एकदम सर्व करू, असे करू नये.

संदर्भ : PIB, PRS, योजना व कुरुक्षेत्र मासिक, राष्ट्रीय दैनिक : उदा. इकॉनॉमिक टाइम्स, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, दैनंदिन चालू घडामोडींसाठी ‘DrSushilsSpotlight’ या यू-ट्यूब/टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. LINK : t.me/DrSushilsSpotlight, यूनिक बुलेटिन : द यूनिक अकॅडमी प्रकाशन

अशा प्रकारे यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठीचे सर्व घटक आपण ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘यशाचा मटा मार्ग’ या सदरातून पाहिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना आगामी पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या कष्टावर विश्वास असू द्या व प्रामाणिकपणे कष्ट घेऊन परीक्षेला सामोरे जा. यूपीएससी परीक्षेला सामोरे जात असताना एक बाब नेहमीच लक्षात असू द्या : ‘ओले मूळ भेदी, खडकाचे अंगा, अभ्यासाची संग, कार्यसिद्धी।।’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ : जीएस १

$
0
0

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९साठी २०१८च्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप व एकंदर प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. या लेखाद्वारे जीएस - पेपर १ - यूपीएससी प्रीलिम्स : २०१८बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. जीएसचे स्वरूप समजून घेण्यासाठी फक्त २०१८ची प्रश्नपत्रिका समजून घेणे पुरेसे नाही. २०१८बरोबर गेल्या वर्षीच्या इतर प्रश्नप‌त्रिकाही समजून घेणार आहोत.

जीएस - पेपर १ - यूपीएससी प्रीलिम्स : २०१८ या पेपरबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया माध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात 'आजवरचा अनपेक्षित पेपर', 'बावीस वर्षांतील अवघड पेपर', 'बारा वर्षांतील अवघड पेपर' आदी प्रतिक्रिया लक्षात घेता हा पेपर विश्लेषणात्मक स्तरावर समजून घेणे काळाची गरज आहे. या प्रतिक्रियांमुळे काही पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. परंतु, त्या पूर्वग्रहांचा विचार बाजूला करून आपण हा पेपर समजू घेऊ. जेणेकरून येत्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.

२०१८-जीएस-पेपर-१- विषयवार प्रश्नांची विभागणी

I) इतिहास : २१ प्रश्न (४२ गुण)

- प्राचीन भारताचा इतिहास : २ प्रश्न (४ गुण)

- मध्ययुगीन भारताचा इतिहास : २ प्रश्न (४ गुण)

- आधुनिक भारताचा इतिहास : १२ प्रश्न (२४ गुण)

- कला व संस्कृती घटक : ५ प्रश्न (१० गुण)

II) भूगोल - १० प्रश्न (२० गुण)

- नकाशा : २ प्रश्न (४ गुण)

- कृषी : ५ प्रश्न (१० गुण)

- भूगोलातील इतर घटक : ३ प्रश्न (६ गुण)

III) अर्थव्यवस्था : १४ प्रश्न (२८ गुण)

- मूलभूत संकल्पना व तथ्य : ११ प्रश्न (२२ गुण)

- व्यापार (Trade) : ३ प्रश्न (६ गुण)

IV) विज्ञान व तंत्रज्ञान : १० प्रश्न (२० गुण)

V) भारतीय राज्यघटना : ११ प्रश्न (२२ गुण)

VI) पर्यावरण : ११ प्रश्न (२२ गुण)

VII) सरकारी योजना : ५ प्रश्न (१० गुण)

VIII) जनरल अवेअरनेस : १० प्रश्न (२० गुण)

IX) चालू घडामोडी : ८ प्रश्न (१६ गुण)

एकूण १०० प्रश्नांचे विषयवार वर्गीकरण आपण पाहिले. या वर्गीकरणाचा विचार करता 'जनरल अवेअरनेस' हा घटक २०१८मध्ये प्रभावी ठरलेला आहे. २०११ ते २०१७च्या पेपरमध्ये या घटकाला तितकेसे मह‌त्त्व दिलेले दिसून येत नाही. यातून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे या घटकाची २०१९साठी आपण चांगल्या प्रकारे तयारी केली पाहिजे. बऱ्याचदा या घटकाची चालू घडामोडींशी सांगड घातली जाते वा याचाच उपघटक अशी वर्णी लावली जाते. तेव्हा या दोन्हींमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

प्रश्नांचे वर्गीकरण पाहता इतिहासावर सर्वाधिक प्रश्न विचारलेले दिसून येतात. 'भारतीय राज्यघटना' व 'भूगोल' यावरील प्रश्नसंख्या कमी दिसते. तुलनेने गतवर्षीच्या पेपरचा ‌विचार करता 'कला व संस्कृती', 'शासकीय योजना' 'पर्यावरण' 'चालू घडामोडी' यांनी समतोल साधलेला दिसतो. अर्थव्यवस्थेवरही १४ प्रश्न; म्हणजे मागील वर्षाचा विचार करता ही प्रश्नसंख्या अधिक दिसते. विज्ञान व तंत्रज्ञानावरह‌ी १०; म्हणजे त्यासाठी येत्या परीक्षेकरीता योग्य प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे.

टीप : प्रश्नांची विषयवार वर्गवारी करताना काही प्रश्न हे एकापेक्षा अधिक विषयांशी संबंधित असतात, तेव्हा नाईलाजाने वा ज्या विषयाशी त्या प्रश्नांचे साधर्म्य अधिक आहे त्या विषयात त्याला गृहित धरलेले आहे. त्यामुळे प्रश्नसंख्या व विषय यांच्या वर्गीकरणात आपणास तफावत जाणवू शकते, हे लक्षात घ्यावे.

विषयवार वर्गीकरणानंतर विषयांतील घटकांचे महत्त्व समजून घेऊ.

१) प्रश्न विचारताना विषयाच्या कोणत्या घटकावर विचारला आहे?

उदा. पर्यावरणात 'आर्टिफिशिअल लेक' 'Page UN Mechanism' यावर विचारलेले प्रश्न लक्षात घेता 'लेक'चे प्रकार करणे क्रमप्राप्त ठरते. तेव्हा संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरणविषयक करार, संकल्पना यावर भर देणे अपेक्षित आहे.

२) प्रश्न बनविताना आयोगाला नेमके काय अपेक्षित आहे, हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.

उदा. शासकीय योजनांवर प्रश्न विचारताना आयोगाद्वारे त्या योजनेवर किती खर्च झाला, कुठून सुरू झाला; उदा. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'ची सुरुवात हरियाणा; असे प्रश्न विचारले जात नाहीत, तर त्या योजनेचे वर्ष, मंत्रालय, ध्येय इ. बाबी विचारल्या जातात.

३) 'जनरल अवेअरनेस'वर भर देणे

या घटकाचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्यावर काम करणे करणे गरजेचे आहे. आयोगाच्या अभ्यासक्रमात याकडे दुर्लक्ष होते. यासाठी पुढीलप्रमाणे संदर्भ साहित्य वापरायला हवे.

१) India Year Book, २) Manorama Year Book ३) दैनंदिन वृत्तपत्रांचे काटेकोरपणे वाचन ४) सर्व विषयांना समान व न्याय्य वागणूक देणे

अनेकदा असे केले जाते, की विशिष्ट विषयांना अधिक वेळ दिला जातो. परंतु, २०१८चा पेपर पाहता जवळपास सर्व विषयांवर समाधानकारक किमान ५ प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे किमान १० गुण एका विषयाला, हे लक्षात घेऊन सर्व विषयांसाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

चालू घडामोडी व जनरल अवेअरनेस यासाठी व पूर्वपरीक्षेच्या अधिक तयारीसाठी DrSushilsSpotlight या यू-ट्यूब व टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. पुढच्या लेखातून आपण जीएस पेपर १ - २०१८चे विषयवार विश्लेषण पाहणार आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससी 'सीएसएटी' भाग - ३

$
0
0

अमित संतोषराव डहाणे

राज्यसेवा पूर्व परीक्षामधील CSAT या पेपरमधील उतारे आणि त्या संबंधित आकलन क्षमता या विषयची माहिती आपण मागील दोन लेखांमधून बघितली होती. आजच्या लेखातून CSAT पेपरमधील बुद्धिमत्ता व अंकगणित आणि निर्णय प्रक्रिया व समस्या सोडवणूक (Decision Making) या उपघटकांविषयी माहिती बघू या.

बुद्धिमत्ता व अंकगणित : CSAT या पेपरमध्ये एकूण ३० पैकी २५ प्रश्न बुद्धिमत्ता व अंकगणित या घटकावर विचारलेले जातात. या घटकाला ६२.५ गुणांचे वेटेज या पेपरमध्ये दिलेले आहे. आयोगाने अभ्यासक्रम अनुमानात्मक चाचणी आणि विश्लेषणात्मक क्षमता (Logical & Analytical Reasoniry) सर्वसामान्य बुद्धिम‌त्ता चाचणी (Generak Mentak Ability) या घटकासाठी पदवी दर्जाला धरून प्रश्नाची कठीण पातळी गृहीत धरली जाते आणि मूलभूत अंकगणित (Basic Numeric) सामग्री विश्लेषण (Data Interpretion) या घटकासाठी दहावीचा दर्जा ग्राह्य धरण्यात आला आहे. आयोगाने जरी या घटकांवरील प्रश्न विचारण्यासाठी दहावी/पदवी अशा दर्जाचा निकष सांगितलेला असला तरी या घटकावरील प्रश्नांची काठिण्य पातळी ही थोडी अधिक असते. परंतु या घटकाची योग्य नियोजनबद्ध तयारी केली तर २५ पैकी किमान १५ प्रश्न सोडवता येऊ शकते.

अ) बुद्धिमत्ता चाचणी : अनुमानात्मक चाचणी आणि विश्लेषणात्मक चाचणी यामध्ये प्रश्नामध्ये एखादी माहिती दिलेली असते. त्या माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तरे येणे आवश्यक असते. यामध्ये प्रश्नांचे स्वरुप पुढील प्रमाणे असते. जसे दिलेल्या उताऱ्याच्या आधारे माहिती संबंधितील उचित अर्थनिर्वचन निवडा म्हणजेच select the appropriate interoretations किंवा पुढील विधानांचा अभ्यास करून वरील विधानांच्या संदर्भात सर्वात योग्य ठरेल असे अनुमान निवडा. किंवा पुढील विधानाचे परीक्षण करून पुढील पर्यायांमधून सर्वात यथार्थ निष्कर्ष निवडा किंवा काही विधान व निष्कर्ष दिलेले असतात त्याचा अभ्यास करून योग्य तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. अशा प्रकारचे वाक्यांचे स्वरुप असलेले ३-४ प्रश्न विचारलेले दिसतात. प्रश्नांमध्ये दिलेली माहिती, विधाने योग्य रित्या वाचून अनुमानात्मक कौशल्य आरि विश्लेषणात्मक कौशल्य वापरून योग्य ते उत्तर देणे अपेक्षित आहे. या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आयोगाच्याच गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका वारंवार सोडवून बघणे योग्य ठरते.

ब) सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणी : General Mental Ability या घटकात अक्षरमालिका पूर्ण करणे किंवा किंवा दिलेल्या आकृत्यावरून आकृतीमधला सहसंबंध ‌ओळखणे, कूट प्रश्न सोडविणे, सिलोलिझमवरील प्रश्न, नाते संबंधावरील प्रश्न, कॅलेंडर आधारित प्रश्न अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणीत होतो. या घटकावर सर्वसाधारणपणे ५ ते ६ प्रश्न विचारले जातात. या घटकावरील प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी बाजारात बरेचसे साहित्य किंवा संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्यरित्या सराव केल्यास या घटकावरील प्रश्न सोडविता येतात. यासाठी आयोगाच्या गतवर्षीच्या संपूर्ण प्रश्न‌पत्रिका; तसेच PSI/STF/ASOच्या पूर्वमुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वारंवार ‌सोडविणे आणि ज्या प्रकारचे प्रश्न परत परत विचारले जातात ते अगदी पक्के करून ठेवणे उपयुक्त ठरते. बुद्धिमत्ता व अंकगणित या घटकावर विचारले जाणाऱ्या २५ पैकी सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणी या उपघटकातील प्रश्न सहज सुटणारे असतात. त्यामुळे या भागावरील गुण निश्चितच करण्याचा प्रयत्न करावा.

क) अंकगणित : अंकगणिताशी संबंधित असलेल्या घटकावर साधारणत: ८ ते १२ प्रश्न विचारलेले जातात. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये संख्या, संख्यात्मक संबंध, घातांक इत्या तसेच सरासरी लांबी, रुंदी, चौरस, वर्तुळ, त्रिकोण, क्षेत्रफळ, या संबंधिची प्रश्नसुद्धा विचारलेली दिसतात. गुणोत्तर प्रमाण, काम, काळ, मजुरी, वेळ, वेग, अंतर, नफा-तोटा अशा प्रकारातील गणिते किंवा प्रश्न सुद्धा विचारलेली असतात. या घटकासाठी मूलभूत अंकगणिताच्या ज्ञानाची स्पष्टता असणे गरजेची आहे. वर उल्लेखलेल्या प्रकारांचा सराव बाजारात उपलब्ध असलेल्या साहित्यांमधून योग्य पद्धतीने केल्यास या घटकावर सुद्धा किमान ५ ते ६ प्रश्न सोडविता येतात.

ड) सामग्री विश्लेषण : Data Interpretation यामधील प्रश्नांमध्ये आपल्याला बरीच माहिती पुरवलेली असते. त्या माहितीचे पृथ:करण करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागते. तसेच या प्रश्नात तक्ते, आलेख, टेबल, सामग्रीचा पुरेसापणा इत्यादी बाबींवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. या घटकावर ४ ते ५ प्रश्न विचारलेले जातात. या प्रश्नांच्या सरावासाठी सुद्धा पहिले आयोगाच्याच गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवून बघाव्या. आणि जो भाग अवघड जात असेल त्यासाठी संदर्भ पुस्तकांचा वापर करून योग्य सराव केल्यास याही घटकावरील प्रश्नांची उत्तरे सोडविता येऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


GS-I २०१८ हिंटस् ३

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी GS-I मुख्य परीक्षा २०१८ मधील प्रश्नांबद्दल आपण जाणून घेत आहोत. विचारलेल्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे व त्या संबंधीचे लेखन कौशल्य याबद्दल आपण चर्चा करीत आहोत. या लेखात प्र. क्र. ११ ते प्र. क्र. ११५ यांना आपण समजून घेणार आहोत. हे प्रश्न प्रत्येकी १५ गुणांसाठी विचारलेले असून, त्यांची उत्तरे कमाल २५० शब्दांत आपणास लिहावयाची आहेत.

प्र. ११. The Bhakti movement received a remarkable reorientation with the advent of sri chaitanya mahaprabhu. Discuss.

स्पष्टीकरण : सर्व प्रथम चैतन्य महाप्रभू यांच्याविषयी काही तथ्ये द्यावीत. असे त्यांना 'गौरंग महाप्रभू' देखील म्हटले जाते व ते पं. बंगालचे होते. भक्ती चळवळीला एक उचित अनुष्ठान देऊन त्यांनी प्रेमभाव (Divine love) या संकल्पनेला राधाकृष्ण यांना समोर ठेवून साकारले. कीर्तनाद्वारे आपण देवाची अनुभूती घेऊ शकतो असे त्यांनी प्रतिपादन केले. रासलीला हे भारतीय तत्त्वज्ञानातील महत्त्वाचे पर्व म्हणून त्यांनी समोर आणले. सामाजिक उदारमतवादाचा पुरस्कार करत जातीव्यवस्था नाकारून त्यांनी वैश्विक बंधुत्वाची शिकवण दिली. तसेच पुजारीवर्गाचे वर्चस्व, विवेकाला अनुसरून नसणाऱ्या रूढी, परंपरा यांना नाकारले. समाजातील शोषित घटकाला त्यांनी भक्तीचा मार्ग दाखविला. सत्य व अहिंसा ही शिकवण त्यांनी दिली. त्यांची साधी राहणी ही वैश्विक स्तरावर स्वीकारली गेली. वरील मुद्द्यांचा विचार करून उत्तराचा शेवट हा समतोल साधणारा असा असावा. संत कबीर यांची मृत्यूपंचशताब्दी म्हणजे २०१८ हे वर्ष त्यामुळेच या घटनेला अनुसरून हा प्रश्न मुख्य परीक्षेत विचारला असण्याची शक्यता आहे.

प्र. १२. Discuss whether formation of new states in recent times is beneficial or not for the economy of india.

स्पष्टीकरण : सद्यपरिस्थितीमध्ये नवीन राज्ये निर्माण करणे व त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी असणारा संबंध बघताना सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाजू पाहणे आवश्यक असते. सकारात्मक बाबींमध्ये इतर राज्यांच्या तुलनेतील विकासाची स्पर्धा त्यातून नवीन राज्यांचा आराखडाच विकासाचा असतो. उदा. तेलंगण. उद्योगांसाठी पूरक असे वातावरण निर्माण होते; तसेच विदेशी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर येते. नवीन राज्ये ही मुळातच विकासाचे प्रशासन व आराखडा घेऊन येतात. यातील नकारात्मक बाबी लक्षात घ्यायच्या झाल्यास या आधी निर्माण झालेल्या झारखंड, उत्तराखंड व छत्तीसगड यांच्या बाबतीत असे काही दिसून येत नाही. अशी राज्ये नियमितपणे केंद्र सरकारवर निधीसाठी अवलंबून असतात. तसेच त्यांच्या एकंदर आराखड्यात विकासाचे प्रशासनही दिसून आलेले नाही. सकारात्मतेसाठी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय इच्छाशक्ती होय. तेव्हा अर्थव्यवस्था ही त्यावरच अवलंबून आहे. या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहावे.

प्र. १३. Why indentured labover was taken by the british from india to other colonies? Have thay bean able to preserve their cultural identity over there?

स्पष्टीकरण : ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर मजूर (Indentured labover) इतर वसाहतीत नेले. कारण हा भारतीय मजूर कमी पैशात काम करणारा व स्थलांतरासाठी तयार होता. स्थलांतरासाठी अनुकूल असणे यासाठी १९ व्या शतकातील बेरोजगारी, गरिबी व दुष्काळजन्य परिस्थिती कारणीभूत होती. काही मजूर तर स्वत:च प्रवास करून इतर वसाहतींमध्ये स्थलांतरीत झालेत व तेथेच कायमस्वरूपी वास्तव्य त्यांनी केले. १८३४ नंतर गुलामगिरी संपल्यावर ही मागणी अजूनच वाढली. स्वत:ची ओळख वा संस्कृती टिकविण्यासंबंधी वेगवेगळी उदाहरणे आपण पाहू शकतो. उदा. गयाना, मॉरेशियस व फिजी सारख्या देशांत राजकीय सत्तेचे नियंत्रण करून सरकार स्थापन करते, तर श्रीलंकेत संविधानामुळे स्वत:ची ओळख टिकविणे शक्य झाले नाही. केनियात अर्थव्यवस्थेचा ते कणा आहेत. युगांडा व सुदानमध्ये आज मोठ्या प्रमाणावर जमिनी यांच्याकडे आहेत. तेव्हा परिस्थितीनुरूप आपण त्यांचे अस्तित्व पाहू शकतो.

प्र. १४. The ideal solution of depleting ground water resources in india is water harvesting system. How can it be made effective in urban areas?

स्पष्टीकरण : दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत असून, त्यासाठी जलसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शहरी भागाचा विचार करता घराच्या छत्तावरील पाणी जमिनीत जिरविणे (rooftop harvesting) हे फायद्याचे ठरते. तसेच शहरात रस्त्यांचे होणारे काँक्रिटीकरण व त्यामुळे पाणी साचणे उदा. मुंबईमध्ये पावसानंतरची स्थिती पाहता शहरात रस्त्याच्या बाजूची काही जमिन ही तशीच राहू दिली तर जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होईल. पावसाचे पाणी जर शहरी भागातील सोसायट्यांनी जमिनीखाली टाक्यांमध्ये साठवले तरीही पाण्याचा तुटवडा भासणार नाही. हे मुद्दे लक्षात घेऊन उत्तर लिहावे.

प्र. १५. Defining blue revolution, explain the problems and strategies for pisciculture development in india

स्पष्टीकरण : 'नीलक्रांती' म्हणजे मत्स्यव्यवसाय व त्याच्याशी निगडित इतर उपक्रम होत. १९६०च्या दशकापासून नीलक्रांती चर्चेचा विषय आहे. भारतात नीलक्रांतीसंबंधी आव्हाने म्हणजे गुणवत्तापूर्वक बीज उपलब्ध नसणे, तलावात गाळ असणे, नवीन तलावांची निर्मितीचे प्रमाण कमी, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये जागृतीचा व आधुनिकीकरणाचा अभाव इ. आपण पाहू शकतो. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकारच्या योजना व निधी यांचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. मत्स्य व्यावसायिकांचा शास्त्रीय दृष्टीने व्यवसाय करणाचा दृष्टिकोन विकसित व्हायला हवा. SDG 14 मध्येही याचा उल्लेख आहे. तर २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेचाही हा भाग आहे. तेव्हा या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहावे. वरील प्रश्नांतील उत्तरांसाठी पूरक Map व आकृत्यांसाठी तसेच चालू घडामोडींकरिता Dr.sushils spotlight या Youtube व टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. Gs I मधील बहुतांशी प्रश्न हे तथ्यात्मक आहेत, तेव्हा त्या अनुषंगाने तयारी करण्याकडे लक्ष असायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससी सीएसएटी- भाग ४

$
0
0

अमित संतोषराव डहाणे

आतापर्यंतच्या लेखातून आपण CSAT या पेपरमधील उतारे व त्यावरील आकलन क्षमता, बुद्धिमत्ता आणि अंकगणित या घटकावरील विस्तृत माहिती बघितलेली आहे. आत CSAT पेपरमधील शेवटचा घटक म्हणजेच निर्णय प्रक्रिया आणि समस्या सोडवून (Decision Making) याबाबती माहिती बघू या.

२०१३ सालापासून यूपीएससीच्या धर्तीवर जे बदल एमपीएससी पूर्वपरीक्षेत झाले, त्या बदलाचा एक भाग म्हणून CSAT पेपरमधील निर्णय प्रक्रिया आणि समस्या सोडवणूक या घटकाचासुद्धा अंतर्भाव करण्यात आला. या घटकावर राज्यसेवा पूर्व परीक्षेत CSATमध्ये ८० पैकी ५ प्रश्न विचारलेले जातात. या घटकावरील प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे या घटकावरील गुण आपल्या हातचे आहेत हे लक्षात घ्यावे.

Decision Making या घकाचा समावेश परीक्षेमध्ये करण्याचा मूळ हेतू काय असू शकतो. तर उद्या आपण ज्या पदावर जावून शासकीय जबाबदारी सांभाळणार आहोत, त्या पदावर आपल्या समोर येणाऱ्या समस्या असणाऱ्या परिस्थितीत आपण घेतलेले निर्णय, आपली भूमिका स्पष्ट व्हावी, आपण निर्णय घेताना तटस्थ राहून विचार करून आहे त्या परिस्थितीला साजेसे निर्णय घेऊ शकतो की नाही हे तपासण्यासाठी या घटकाचा समावेश केलेला दिसते. यूपीएससी परिक्षेत २०११ सालापासून हा घटक अंर्तभूत करण्यात आला होता. परंतू यूपीएससीमध्ये CSAT Qualifying झाल्यावर या घटकांचे प्रश्न जवळ जवळ विचारणे थांबवलेले दिसते. मात्र, एमपीएससीमध्ये CSAT चे गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाता आणि Decision Making या उपघटकावर ‌किमान ५ प्रश्न विचारलेले आहेतच. CSAT मध्ये प्रत्येक प्रश्नाला २.५ गुण असलेल्यामुळे या घटकावर एकूण १२.५ गुणांचे वेटेज आहे. आणि या घटकास नकारात्मक गुण नाही. (Negative Making) महाराष्ट्र लोकसेवा आयोगात विचारलेल्या Decision Making च्या प्रश्नांची कठिण्य पातळी यूपीएससीपेक्षा अधिक आहे.

या घटकावरील प्रश्न वाचत असताना प्रश्नामध्ये दिलेली परिस्थिती आपल्याला इमॅजिन करता येणे गरजेचे आहे. कारण या प्रश्नांमध्ये आपल्याला दिलेली माहिती आणि परिस्थितीत आपण काय योग्य निर्णय घेऊन दिलेली समस्या कशी सोडवणार हे तपासले जाते. त्यामुळे प्रश्न वाचत असताना प्रश्नातला प्रसंग किंवा परिस्थिती आपल्या अवतीभोवती उभी राहायला हवी. म्हणजेच आपण खरोखर त्या परिस्थितीत स्वतःला ठेवून योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. या प्रश्नांमध्ये दिलेल्या परिस्थितीत तुम्ही खालील पर्यांयामधून योग्य पर्याय कोणता निवडला हे महत्त्वाचे आहे. नकारात्मक गुण या प्रश्नांना नसतात. सर्वांत योग्य पर्याय असेल तर २.५ गुण, त्यानंरच्या पर्यायासाठी १.५ गुण आणि नंतरचा पर्यायासाठी १ गुण असे विभाजन केलेले आहे. चौथ्या पर्यायास शून्य गुण दिलेले असतात. म्हणून प्रश्न वाचून त्यातील दिलेली समस्या सोडवताना आपल्याला सर्वांत योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे असते.

दिलेल्या समस्येसाठी किंवा परिस्थितीसाठी निर्णय घेताना आपण भावनिक किंवा तत्त्व मूल्ये अशा पद्धतीनेच विचार करून प्रश्नांच्या उत्तराकडे पाहू शकत नाही. असलेल्या परिस्थितीत योग्य आणि सहज तरी आपण तटस्थ राहून निर्णय घेणे गरजेचे असते. आपण घेतलेल्या निर्णयात असलेल्या परिस्थितीत सहजतेने आणि आपल्याला असलेल्या जबाबदारीचे भान राहून योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. गतवर्षींच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या आधारे आपण या घटकाशी संबंधित प्रश्न दिलेल्या पर्यांयामधून योग्य पर्याय कसा निवडता येईल हे बघू.

प्र. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे परिक्षण करताना एका गृह वसाहतीतील इमारतीवर तुम्हाला ITI चा भक्कम नामफलक आढळला. या केंद्राने संपूर्ण जागा व्यापली आहे. असे हा फलक सुचवत होता. कोपऱ्यातल्या एका खोलीत असलेल्या जागेतून संस्था चालवली जात आहे हे संस्थेत तुम्हाला पाऊल ठेवताच आढळले जेव्हा कचेरी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला साहाय्य देण्यासाठी अनिवार्य असलेल्या प्रयोग शाळेबाबत विचारण केली तेव्हा प्रभारी व्यक्तीने संस्थेची प्रयोगशास्त्र असल्याचा दावा करून तुम्हाला तळमजल्यावरील स्कूटर दुरुस्ती गॅरेजमध्ये नेले. या व्यक्तीने तुम्हाला आदर्श ITI साठी आवश्यक असणाचा प्रशस्त सुविधांची सर्व प्रमाणपत्रे दाखवली तुम्ही

१) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे म्हणून संस्थेला मान्यता मिळवण्यासाठी कबूल केलेल्या भौतिक सुविधा तीन वर्षांच्या कालावधीत जुळवून आणण्यास सांगाल.

२) आवश्यक क्षमता प्राप्त केल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळणे टाळण्यासाठी संस्थेची शासन मान्यता रद्द कराल.

३) काम मिळवण्यासाठी आवश्यक अनुभाधारित विद्यार्थ्यांना कौशल्ये प्राप्त करण्यासंबंधातील समस्या सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांचे नियमण करणारी समिती नेण्यासाठी विद्यार्थी पालक अध्यापक आणि व्यवस्थापक यांची बैठक बोलवाल.

४) व्यवस्थापनाला अतिरिक्त शुल्क न लढता काम मिळण्यासाठी आवश्यक असे प्रत्यक्ष अनुभव घ्यायला विद्यार्थ्यांना साह्य करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश द्याल.

आता दिलेल्या पर्यायामधून दुसरा पर्याय लगेच बाद करावा लागेल. कारण मान्यता रद्द केली तर विद्यार्थ्यांचेच नुकसान होईल. वरील परिस्थितीत पर्याय तीन योग्य वाटतो कारण यामध्ये प्रमुख समस्या आणि त्यासंबंधी विद्यार्थी पालक, अध्यापक आणि व्यवस्थापक यांच्याशी बैठक बोलावून निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा : जीएस विश्लेषण भाग २

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ करिता आपण २०१८ च्या जीएस पेपरचे विश्लेषण पहात आहोत. मागील लेखात आपण २०१८ मध्ये विषयवार प्रश्न कसे विचारले होते याचे वर्गीकरण पाहिले आहे. या लेखात‌ विषयवार प्रश्न कसे विचारले आहेत व आपण जी पुस्तके वापरतो त्या तुलनेत प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती हेही जाणून घेणार आहोत.

I) इतिहास : इतिहासावर व त्यासंबंधी घटकांवर एकूण २१ प्रश्न ‌विचारलेले आहेत. २०१७ मध्ये ही प्रश्नसंख्या १२ इतकी होती. जवळपास दुप्पट प्रश्न २०१८ मध्ये विचारले गेले होते. यूपीएससीमध्ये ही बाब काही नवीन नाही.

आधुनिक भारताचा इतिहास : २०१८ मध्ये‌ ब्रिटिशांचा भारताशी व्यापार, शिक्षण, राजकीय सुधारणा व गांधीजींच्या चळवळी आदी बाबींवर प्रश्न विचारले गेले आहेत. २०१८च्या आधी मात्र प्रश्नांचा रोख १९ व्या व २० व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळींवर दिसून येतो. २०१८ मध्ये विचारलेला प्रश्न पाहूयात.

Q. Which of the following led ot the introduction of English education in India?

1. Charter act of 1813.

2. General committee of Public Instruction, 1823.

3. Orientalist and Anglicist Controversy.

Select the correct Answer using the code given below :

(a) 1 and 2 only (b) 2 only (c) 1 and 3 only (d) 1, 2, 3

Ans : (d)

II) भूगोल : भूगोलावर १० प्रश्न २०१८ मध्ये विचारले गेले होते हे आपण पाहिले आहे. २०१७ मध्येही १० प्रश्नच विचारले होते; परंतु त्याआधीच्या प्रश्नपत्रिकेत मात्र भूगोलाला अधिक महत्त्व दिलेले दिसून येते. प्रश्न विचारताना 'कृषी' या घटकाचा सिंहाचा वाटा स्पष्टपणे दिसून येतो. तसेच नकाशा या घटकावरही दोन प्रश्न विचारलेले आहेत. तसे भूगोलात प्रश्न विचारण्यासाठी नेहमीच Expected घटक म्हणजे MSP किमान आधारभूत किंमत, सेंद्रिय शेतीय, जमिनीचे (माती) प्रकार. पृथ्वीचे वातावरण, जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स, मिनरल्स, शेतीचे संवर्धन इ. होय. मॅपवर जरी दोन प्रश्न विचारलेले असले तरी त्यावर प्रश्न नियमितपणे विचारले जातात. त्यामुळे या घटकाची चांगली तयारी अपेक्ष‌ित आहे. २०१८ मध्ये विचारलेले प्रश्न हे अभ्यासक्रम व चालू घडामोडी या दोन्ही स्तरांतून आले होते. आपण प्रश्न पाहूयात.

Q. With reference to the 'Global Alliance for climate smart agriculture' (GACSA); which of the following statements is/are correct?

1. GACSA is an outcome of the climate summit held in Paris in 2015.

2.Membership of GACSA does not create any binding obligations.

3. India was instrumental in the creation of GACSA. Select the correct answer using the code given below :

(a) 1 and 3 only (b) 2 only (c) 2 and 3 only (d) 1, 2 and 3.

Ans : (b)

हा प्रश्न चालू घडामोडींवर आधारित आहे व याची काठिण्य पातळी पाहता सहजपणे सोडविणे जरा अवघड आहे.

खालील प्रश्न पहा. यात थोडा राज्यघटनेचा भाग व NCERT यातून बनलेला आहे. प्रश्न पाहा :

Q. Consider the followig statements :

1. In India , State Government do not have the power to auction non-coal mines.

2. Andhra Pradesh and Jharkhand do not have gold mines.

3. Rajasthan has iron ore mines.

Which of the statement given above is/are correct?

(a) 1 and 2 (b) 2 only (c) 1 and 3 (d) 3 only

Ans : (d)

या प्रश्नातील पहिले विधान हे राज्य व केंद्र सूचीवर आधारित आहे, तर इतर दोन विधाने आपण NCERT वाचून सोडवू शकतो. त्यामुळे प्रश्न जसे चालू घडामोडींवर तसेच अभ्यासक्रमावरील आपण वापरतो त्या संदर्भग्रंथावरही विचारलेले दिसून येतात.

III) General Awareness : हा घटक प्रकर्षाने २०१८ मध्ये समोर आला. 'India Year Book' मधून विचारलेला प्रश्न पहा.

Q. With reference to solar power production in India, consider the following statements :

1. India is the third largest country in the world in manufacturer of Silicon wafers used in photovoltic units.

2. The Solar power traffics are determined by the Solar Energy Corporation of India.

Which of the statements given above is/are correct?

(a) 1 only (b) 2 only (c) both 1 and 2 (d) neither 1 nor 2.

Ans : (d)

प्रश्न समजून घेणे ही स्पर्धा परीक्षेतील सर्वांत महत्त्वाा बाब आहे. प्रश्न कसे, का व कुठून विचारलेत हे समजून त्यानुसार अभ्यास करणे आवश्यक आहे. Drsushils Spotlight या यू ट्यूब व टेलिग्राम चॅनेलला चालू घडामोडी व पूर्वपरीक्षेसाठीच्या नोट्सकरिता भेट द्या. तसेच स्वत: गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यावर भर द्या. त्यामुळे आपण त्या त्या परीक्षेशी एकरूप होत जातो. त्यातूनच खऱ्या अर्थाने स्वत:ला स्वत:ची 'दिशा' सापडते हेच इथे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा-GS-२०१८ विश्लेषण-३

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ करीता आपण यूपीएससी २०१८ च्या पेपरवर आधारित विविध विषयांच्या प्रश्नांचे विश्लेषण बघत आहोत. विषयावर विचारले गेलेले प्रश्न व त्यांचे वर्गीकरण याबरोबरच प्रश्न कसा बनला तेही महत्त्वाचे असते. हे विश्लेषण जाणून घेण्याआधी यूपीएससीने एक शिफारस केंद्र सरकारला केलेली आहे ती आपण जाणून घेवू.

यूपीएससी परीक्षेत 'Attempt' असतात. म्हणजेच तुम्ही परीक्षा देणार त्यासाठीच्या किती संधी तुम्हाला मिळणार हे ठरलेलं आहे. उदा. OPEN साठी ६ Attempts असतात. यूपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला व परीक्षेला गेलोच नाही तर Attempt मोजला जात नाही. परंतु यामुळे असे निदर्शनास आले आहे की, जवळपास जितकी मुले फॉर्म भरतात त्यातील ४०-५०% इतकेच परीक्षेला जातात. परंतु व्यवस्थापन करताना सर्वांचे करावे लगाते तसेच उमेदवारांमध्ये यासंबंधीचे गाभिर्यही दिसून येत नाही म्हणून यूपूएससीने केंद्र सरकारला तशी शिफारस केली आहे की, 'जर फॉर्म भरला तर तो Attempt मोजला जाईल.' जर ही शिफारस मान्य झालीप तर त्याअनुशंगाने गोष्टी घडतील हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

I) भारतीय राज्यघटना : भारतीय राज्यघटनेवर कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपण 'पूर्वपरीक्षा विश्लेषण' जानेवारीच्या लेखात पाहिले आहे. २०१७ पासून मूलभूत संकल्पनाच्या तत्त्वज्ञानावर प्रश्न विचारलेले आहेत. २०१८ या विचार करता खालील प्रमाणे प्रश्न विचारलेले आढळून येतात-

प्र. Which one of the following reflects the most appropriate relationship between law and liberty?

a) If there are more laws, there is iess liberty.

b) If there are no laws, there is no liberty.

c) If there is liberty, laws have to be made by the people.

d) If laws are changed too offen, liberty is in danger

Ans. - B

वरील प्रश्नावरून २०१७ मधील प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती २०१८ मध्येही स्पष्टपणे दिसून येते. यासाठी NCERT चे वाचन उपयुक्त असते. सर्वप्रशम संकल्पना नेमक्या कोणत्या तात्विक बाबींवर आधारित आहे. हे यावरून स्पष्ट होते. म्हणून 'समजून घेवून अभ्यास करणे' हे तत्त्व पाळल्यास असे प्रश्न सोडविण्यास मदत होते.

प्रश्न विचारण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या बाबींमधील सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे 'चालू घडामोडी' होय. 'राज्यपालाची भूमिका' त्यासाठीची संविधानातील तरतूद यावर भाष्य होत होते. तसेच टीका-टिपण्णीही चालू होती त्यावर आधारित राज्यपालासंबंधी विचारलेला खालील प्रश्न पहा-

प्र. Consider the following statements :

1. No criminal proceedings shall be instituted against the Governor of a state in any court during his term of office.

2. The emoluments and allowances of the Governor of a state shall not be diminished during his term of office.

Which of the statements given above is/are correct?

a) 1 only

b) 2 only

c) Both 1 and 2

d) Neither 1 nor 1

Ans. - c

तसेच नियमितपणे संविधानातील काही पटकांवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपण दर वर्षी अनुभवत असतो जसे की संसद, मूलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्ये, राज्याची मार्गदर्शक धोरणे, संसदीय समित्या इ. होय यावर दरवर्षी किमान प्रश्न विचारलेले दिसून येतात त्यामुळे हे घटक आपण नियमित अभ्यासले पाहिजेत या घटकावर विचारलेला प्रश्न पाहूयात-

प्र. Consider the following statements :

1. The Speaker of the Legislative Assembly shall cacate his/ her office if the/she caeses to be a member of the Assembly.

2. Whenever the Legislative assembly is dissolved, the speaker. Shall vacate his/her office immediately. Which of the statement given above is / are correct

a) 1 only

b) 2 only

c) Both 1 and 2

d) Neither 1 nor 2

Ans. - A

प्र. With reference to the Parliament of India, which of the following Pasliamentany Committees scrutinizes nad reports to House whether the powers to make regnlations, rules, sub-rules, by-laws, ets. Conferred by the Comtitntion of delegated by the Parliament are being properly exercised by the Executive within the scope of such deletation?

a)Committee on Government assurances

b)Committee on Subordinate Leqislation

c)Rules Committee

d)Business Advicory Committee

Ans. - B

वरील प्रश्नावरून हेही लक्ष्यात घेण्यासारखं आहे की दरवर्षी प्रमाणे जरी महत्त्वाच्या मूलभूत अभ्यासक्रमावर असले तीर आधी महत्त्वाच्या ३ समित्यांवर प्रश्न विचारले जात होते आता ते इतर समित्यांवरही प्रश्न विचारत आहेत तेव्हा अभ्यास करताना या बाबी आपण लक्ष्यात घ्यायला हव्यात. तसेच चालू घडामोडींवरही लक्ष्य केंद्रित करावे जसे अमेरिकेत 'धन विधेयक' 'आणीबाणी' याची चर्चा, सप्टेंबर २०१८ मधील 'आधार' 'कलम ४९७', 'शबरीमाला मंदिर', 'IPC 377' अशा बाबी समजून राज्यघटनेतील त्या संबंधीची कलमे अभ्यासणे नक्कीच २०१९साठी उपकारक ठरतील.

'DrSushils Spolight' या YouTube व Telegram चॅनेलला या संबंधीचे अधिकचे विश्लेषण व नोटस् याकरिता भेट द्या. पूर्वपरीक्षेचा विचार करता त्यासाठी स्वत: प्रश्न समजून त्याची अभ्यासक्रमाशी सांगड घातलेली कधीही चांगली असते. तेव्हा स्वत: प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यावर भर देणे ही काळाची गरज समजून त्याप्रमाणे अभ्यास करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ विश्लेषण-III

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ चा विचार करता २०१८ च्या जीएस पेपरमधील अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नाचे विश्लेषण आपण या लेखात बघणार आहोत. या विषयावर विचारले जाणारे प्रश्न हे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, अर्थशास्त्रातील तथ्य, भारताची आर्थिक पाहण‌ी व बजेट, शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थव्यवस्थेतील घडामोडी यावर विचारले जातात. साधारणत: वरील घटकांना सामावून घेणाऱ्या प्रश्नांचा प्रश्नपत्रिकेत समावेश असतो.

२०१८ पूर्वपरीक्षेत ‌विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहू या.
Q.1. Which of the following statements correctly describes the meaning of legal tender money?
(a) The money which is tendered in the courts of law to defray the fee of legal cases.
(b) The money which a creditor is under compulsion to accept in settlement of his claims.
(c) The bank money in the form of cheques, drafts, bills of exchange etc.
(d) The metallic money in circulation in a country.
Ans : B

‘Demonetisation’ वा ‘निश्चलीकरण’ यावरून हा प्रश्न विचारला गेला. चालू घडामोडींवरून प्रश्न विचारण्याची वृत्ती मजबूत असावी. तसा हा प्रश्न खूपच सरळ विचारलेला आहे.
अर्थव्यवस्थेचा विचार करता दर वर्षी जीडीपी, जीएनपी या संकल्पनांवर एक तरी प्रश्न विचारलेला दिसून येतो. खालील प्रश्न पाहताना एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या प्रश्नात त्यांनी संकल्पनेची फक्त व्याख्या लक्षात न घेता त्या संकल्पनेचा आवाका लक्षात घेऊन प्रश्न विचारलेला आहे. हीच पद्धत इतर विषयांतही लागू केलेली आपणास दिसून येते. जसे की, राज्य घटनेवर आधारित तात्त्विक प्रश्न होय. ज्यात ‘रूल ऑफ लॉ’ तर अपेक्षित आहे; परंतु विस्तृत अर्थासह! २०१८ मध्ये जीएनपीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे ते पाहू या.

Q. Increase in absolute and per capita real GNP do not connote a higher level of economic development if...
(a) Industrial output fails to keep with agricultural output.
(b) Agricultural output fails to keep pace with industrial output.
(c) Poverty and unemployment increase.
(d) Imports grow faster than exports.
Ans : C

वर दिलेल्या विश्लेषणावरून हा प्रश्न सोडविण्यासाठी फक्त जीएनपीची व्याख्या पाठ करणे अपेक्षित नाही, तर जीएनपीमध्ये नेमकं काय असतं ते समजून घेणं अधिक गरजेचे आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे काय साधले जाते? त्याचे परिणाम काय होतात हेही समजून घेणे अधिक गरजेचे आहे. अशाच प्रकारे अजून एक प्रश्न आयोगाद्वारे विचारलेला आहे. तो आपण पाहू या.

Q. If a commodity is provided free to the public by the government, then...
(a) The opportunity cost is zero.
(b) The opportunity cost is ignored.
(c) The opportunity cost is transferred from the consumers of the product to the tax-paying public.
(d) The opportunity cost is transferred from the consumers of the product to the government.
Ans : C

यावरून तुम्हाला लक्षात आले असेल, की आता अर्थशास्त्रात ‘तथ्य’ व ‘संकल्पना’ या पलीकडे जाऊन अभ्यास करणे अपेक्षित आहे. अर्थशास्त्र ही समजून घेण्याची बाब आहे, हे स्पष्टपणे सांगणारे प्रश्न आयोगाद्वारे विचारले जात आहेत. २०१२ ते २०१६ पर्यंतच्या पेपरमध्ये प्रामुख्याने संकल्पना विचारल्या जात व प्रश्नांची व्याप्ती ही त्यांच्या व्याख्यांपुरती मर्यादित राहात असे. २०१८ मध्ये संकल्पनांच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न विचारण्याची वृत्ती दिसून येते.

Q. Consider the following statements :
Human Capital Formation as a concept is better explained in terms of a process which enables...
1. Individuals of a country to accumulate more capital.
2. Increasing the knowledge, skill levels and capacities of the people of the country.
3. Accumulation of tangible wealth.
4. Accumulation of intangible wealth.

Which of the statements given above is/are correct?
(a) 1 and 2 (b) 2 only (c) 2 and 4 (d) 1, 3 and 4.
Ans : C

या प्रश्नावरून एक बाब स्पष्ट होते, की एखादी संकल्पना व त्या संकल्पनेशी संबंधित इतर संकल्पना यांचा परस्परसंबंधही आपणास माहीत असणे आवश्यक आहे. उदा. या प्रश्नात Human Capital सोबत Tangible wealth, Intangible wealth इ. संकल्पना माहीत असल्याशिवाय आपण या प्रश्नाला सामोरे जाणे नकारात्मक ठरू शकते. तेव्हा अर्थशास्त्राचा अभ्यास करताना उपरोक्त बाबी लक्षात घ्या. संकल्पना समजून घेताना त्यांचा पूर्ण आवाका समजून घेणे इथे अपेक्षित आहे. २०१८ मध्ये अर्थशास्त्रावर १४ प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे २८ गुणांचा विचार करता जीएसमधील अर्थशास्त्राचे महत्त्व लक्षात घ्यावे.

DrSushils Spotlight या यू ट्यूब व टेलिग्राम चॅनेलला तुम्ही अर्थशास्त्रासंबंधी नोट्स, पीडीएफ व चालू घडामोडी यासाठी भेट द्या. प्रश्नांचे विश्लेषण व अभ्यासक्रम यांची सांगड घातल्याशिवाय अपेक्षित यश आपणास मिळत नाही. याचबरोबर याच धर्तीवर आधारित MCQ प्रश्नांचा सराव नियमितपणे करणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थशास्त्र विश्लेषण - २

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

प्र. Despite being a high saving economy, capital formation may not result in significant increase in output due to

(a) weak administrative machinery

(b) illiteracy

(c) high population density

(d) high capital output ratio.

Ans : d

हा प्रश्न सोडविताना काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. 'High Saving Economy' काय असते? तिचा 'Capital formation'शी नेमका संबंध काय? हे माहीत असेल तर 'output' प्रकर्षाने का वाढत नाही, हे आपण सांगू शकतो. २०१८च्या प्रश्नांवरून विविध संकल्पनांचा एकमेकांशी असणारा संबंध आपण लक्षात घेणे २०१९च्या जीएससाठी उपकारक ठरेल असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये नीट समजून घेणे गरजेचे आहे. वरील प्रश्नातील पर्याय नीट वाचलेत, तर उत्तर शोधणे सोपे आहे. म्हणून पर्यायही नीट वाचले पाहिजेत.

प्र. Consider the following statements :

1. The Reserve Bank of India manages and services Government of India securities but not any state Government Securities.

2. Treasury bills are issued by the Government of India and there are no treasury bills issued by the state Governments.

3. Treasury bills offer are issued at the discount from the par value.

which of the statements given above is / are correct?

(a) 1 and 2 only

(b) 3 only

(c) 2 and 3 only

(d) 1, 2 and 3

Ans : c

आपण जर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात, तर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे 'Share, Bond, Treasury bill, Stock Exchange इत्यादींवर प्रश्न विचारलेले नियमितपणे दिसून येतात. यातही आपण 'Masala Bond'चा प्रश्न पाहू शकतो. जो चालू घडामोडींवर आधारित होता. म्हणजेच या अभ्यासक्रमातील घटकांवर प्रत्यक्षपणे वा चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारलेच जातात. तसे पाहिले तर 'Treasury Bill' हा घटक आपण मूलभूत संकल्पना म्हणून अभ्यासतो. त्यामुळे जर T-Bills ची संकल्पना आपणास समजली असली, तर या प्रश्नांचे उत्तर आपण सहज देऊ शकतो. असे प्रश्न चुकल्यास त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागते. स्पर्धा परीक्षेत परिस्थिती कितीही वाईट असली, तरी अभ्यासक्रमावर आधारित मूलभूत संकल्पनांचा विचार क्रमप्राप्त ठरतो व त्यावर आधारित प्रश्न चुकता कामा नये.

प्र. With reference to the governance of Public Sector banking in India. Consider the following statemtns :

1. Captial infusion into public sector banks by the Government of India has steadily increased in the last decade.

2. To put the public sector banks in order, the merger of associate banks with the parent bank of India has been affected.

which of the statement given above is/are correct?

(a) 1 Only

(b) 2 only

(c) Both 1 and 2

(d) Neither 1 nor 2

Ans : b

बँकिंग क्षेत्र हे गेल्या २ वर्षांपासून चर्चेत आहे. यात कर्जबुडवेगिरी, वाढणारा एनपीए, प्रशासनातील अनागोंदी इ. बाबी कारणीभूत ठरताना दिसतात. एसबीआयमध्ये इतर बँकांचे विलिनीकरण झाले. त्यानंतर आता 'बँक ऑफ बडोदा'मध्ये 'विजया बँक' वा 'देना बँक' यांचे विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे येत्या काळातही असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. तसेच, डबघाईला आलेल्या 'Public Sector Bank'मध्ये सरकारद्वारे भांडवल टाकणे, हेही घडत असते. परंतु, ज्याप्रमाणे येथे पहिले विधान विचारले आहे, की सतत गेल्या १० वर्षांत वाढ झाली का? अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती सतत दिसून येत आहे. गेल्या ३-४ वर्षांत अशी विधाने आयोगाद्वारे सर्रास विचारली जात आहेत. अशा विधानांचा विचार करता हे ९९.९९ टक्के चुकीचे असते. कारण सतत १० वर्षे एखाद्या क्षेत्रात वाढ होणे हे क्वचितच घडते. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर काढाताना पहिले विधान चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्याने इतर बाबीही स्पष्ट होतात.

'Dr. Sushils Spotlight' या You Tube व Telegram चॅनेलला अर्थशास्त्रासंबंधीच्या चालू घडामोडी व नोट्सकरिता भेट द्या. 'अर्थशास्त्र' हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना किचकट वाटतो. परंतु, समजून घेण्यासाठीचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केल्यास हा विषय 'गमतीदार' व 'सहज आत्मसात' होणारा आहे. 'Basic Concept of Economy' हे शंकर गणेश द्वारा प्रकाशित पुस्तक आपणास उपयुक्त ठरेल. 'संकल्पना' नीट समजून घ्या म्हणजे प्रश्नांचा रोख अधिक स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा-अर्थशास्त्र विश्लेषण-३

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ ला समोर ठेवून २०१८ च्या जीएस पेपर १मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहात आहोत. अर्थशास्त्र या विषयावर प्रश्न विचारताना मूलभूत संकल्पना व चालू घडामोडी यांची घातलेली सांगड एव्हाना तुमच्या लक्षात आली असेल. या विषयाचा विचार करताना मूलभूत संकल्पना तर महत्त्वाच्या आहेतच, सोबत तथ्यांचा विचारही करणे क्रमप्राप्त होते हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांनी स्पष्ट केलेले आहे. अर्थशास्त्रातील विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहूयात.

Q. Which one of the following best describe the term 'Merchant Discount Rate' sometimes seen in news?

(a) The incentive given by a bank to a merchant for accepting payments through debit cards pertaining to that bank.

(b) The amount paid back by banks to their customers when they use debit cards for financial transactions for purchasing goods or services.

(c) The charge to a merchant by a bank for accepting payments from his customers through the banks debit cards.

(d) The incentive given by the government to merchants for promoting digital payments by their customers through point of sale (PoS) machines and debit cards.

Ans : c

वरील प्रश्न हा चालू घडामोडींवर आधारित असलेला प्रश्न आहे. Demonetisation (निश्चलीकरण) झाल्यानंतर 'डिजिटल पेमेंट', 'कार्ड पेमेंट'वर भर देण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली. यात 'वित्तीय साक्षरता अभियान', 'भीम', 'डिजिशाळा' असे अनेकविध उपक्रम सुरू केले. असे सर्व उपक्रम सुरू असताना काही नवीन संकल्पना समोर आल्या आहेत. त्यात 'Merchant Discount Rate' ही संकल्पना होती; परंतु ही संज्ञा दोन वर्षांपासून चर्चेत आहे. त्यामुळे चालू घडामोडींचा आवाका आपणास लक्षात येतो.

२०१९ चा विचार करता अमेरिकेतील 'Shut down' असेल वा येत्या बजेटमधील नवीन काही संकल्पना असतील त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून त्याचा अर्थ समजून घेऊन पूर्वपरीक्षेसाठी त्यांचा विचार आपण करू शकतो. बँकेच्या डेबिट कार्डवर लागणारे शुल्क अशा आशयाची ही संकल्पना आहे.

Q. With reference to India's decision to levy an equilisation tax of 6% on online advertisement services offered by non-resident entities, which of the following statement is/are correct?

1. It is introduced as a part of the Income Tax Act.

2. Non-resident entities that offer advertisement services in India can claim a tax credit in their home country under the 'Double Taxation Audiance Agreements.'

Select the correct answer using the code give below :

(a) 1 only (b) 2 only (c) Both 1 and 2 (d) Neither 1 nor 2

Ans : d

करारासंबंधीचे प्रश्न २०१९ मध्येही अपेक्षित आहेत. जीएसटीमधील बदल, अप्रत्यक्ष करांसंबधीच्या सुधारणा यामुळे 'कर' हा घटक प्रश्न विचारण्यासाठी आगामी परीक्षांसाठीही आयोगाचा मुख्य घटक म्हणून विचारात नक्कीच असेल. वरील प्रश्नही अशाच प्रकारे कर संरचनेतील सुधारित द्योतक आहे. चालू घडामोडींमध्ये हा कर म्हणजेच 'Equilisation Tax' चर्चेत असलेली संकल्पना आहे.

जेव्हा कुठलाही नवीन कर लावला जातो तेव्हा त्यासाठीची पार्श्वभूमी बघणे गरजेचे आहे. कर 'नेमका कोणत्या आधारावर लावला आहे हे बघणे, तसेच तो प्रत्यक्ष कर आहे की अप्रत्यक्ष कर आहे हेही पाहिले पाहिजे. त्या कराचा 'Target Element' म्हणजेच कुणावर तो कर लावलाय हेही पाहणं गरजेचं ठरतं. बजेटमध्ये जर नवीन कुठले कर असतील तर त्यांचाही विचार हा 'यूपीएससी प्री २०१९' करता करणे अपेक्षित आहे. जीएसटी कौन्सिल, जीएसटी कर संरचना यावरही प्रश्न अप‌ेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनने 'Soft Drinks' वर 'Super Tax', तर फ्रान्स, नॉर्वे, मेक्सिको या देशांनी 'Fat Tax' लावलेला आहे. भारताने चीनच्या 'Ofloxacin'या औषधावर 'Anti Dumping Tax' लावलाय. असे facts prelims करिता उपयोगी ठरतात.

Q. Consider the following statements :

1. The quantity of imported edible oil is more than the domestic production of edible oils in the last five years.

2. The government does not impose any custome duty on all the imported edible oils as a special case. Whichof the statements given above is/are correct?

(a) 1 only (b) 2 only (c) Both 1 and 2 (d) Neither 1 nor 2

Ans : 1

या प्रश्नासाठी 'आयात-निर्यात' हा घटक चांगल्या प्रकारे अभ्यासायला हवा. Edible oils चे आयात धोरण यासाठीची माहिती Economic Survey of India, 2018-19, India Year Book 2019 यात चांगल्या प्रकारे मिळू शकते. सरकार कस्टम ड्युटी लावतच नाही असे होत नाही कारण त्याचा सरळ परिणाम आपल्या घरेलू उत्पादनांवर होतो हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न नियमितपणे विचारले जातात.

'Dr Sushils Spotlight' या यूट्यूब व टेलिग्राम चॅनेलला आगामी बजेट Economic Survey व India Year Book यांच्या विश्लेषणासाठी भेट द्या. 'अर्थशास्त्र' हा विषय वाचायचा नसून तो समजून घ्यायचा आहे हे लक्षात घेतले तर त्याच्यासारखा मनोरंजक व सरळ सोपा विषय दुसरा कोणताच नाही हे समजून घेणे इथे महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

$
0
0

अमित संतोषराव डहाणे

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्यापाठोपाठ लगेच महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेचीसुद्धा जाहिरात आली. एका महिन्याच्या अंतरानेच संयुक्त पूर्व दुय्यम सेवा परीक्षा असणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब यामध्ये PSI/STF/ASO या पदांसाठीच्या परीक्षांचा समावेश केलेला आहे. राज्यसेवा परीक्षांचा अभ्यासक्रम आणि दुय्यम सेवा परीक्षाचा अभ्यासक्रम फारसा वेगळा नाही. यावर्षी म्हणजेच २०१९ सालासाठी राज्यसेवेच्या ३६० जागांसाठी जाहिरात आली होती. आता त्याबरोबरच महाराष्ट्र दुय्यम सेवेसाठी ५५५ जागांची जाहिरात आलेली आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या अंतर्गत सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब (अराजपत्रित) २४ पदे, वित्तविभागातील राज्यकर निरीक्षक (STI) ३५ पदे आणि गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक ४९६ पदे अशा एकूण ५५५ पदांसाठीची जाहिरात आयोगाच्या mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे वेगवेगळ्या संवगीच्या मुख्य परीक्षा पुढील दिनांकास आयोजित करण्यात येत आहे.

-महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०१९ संयुक्त पेपर क्रमांक १ - २८ जुलै २०१९

- महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०१९ पेपर क्रमांक २ - PSI - ४ ऑगस्ट २०१९

- महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०१९ पेपर क्रमांक २ - STI - ११ ऑगस्ट २०१९

- महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०१९ पेपर क्रमांक २ - ASO - २५ ऑगस्ट २०१९

PSI/STI/ASO महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक १ सामाईक राहिल. या पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल. मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक २ संबंधित पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि अभ्यासक्रम लक्षात घेवून स्वतंत्र असेल.

STI आणि ASO या दोन्ही पदांसाठी मुख्य परीक्षेचे दोन्ही पेपरचे गुण ग्राह्य धरले जातात. मुख्य परीक्षा २०० गुणांची असते. या २०० गुणांपैकी STI आणि ASO ची अंतिम यादी जाहीर होते. मात्र PSI पदासाठी आणखी दोन टप्पे म्हणजे शारीरिक चाचणी १०० गुणांसाठी आणि मुलाखत ४० गुणांपैकी केली जाते.

पात्रता : भारतीय नागरिकत्व

वयोमर्यादा : STI आणि ASO : अमागास आणि मागास वर्गासाठी किमान १८ कमाल ३८ अमागास आणि ४३ मागास प्रवर्गासाठी दिव्यांग उमेदवारास ४५ वर्षांपर्यंत तर अनाथ उमेदवारास ३८ वर्षे वयोमर्यादा लागू राहिल.

PSI पदासाठी मागास आणि अमागास उमेदवारांसाठी किमान वय १९ वर्ष आणि कमाल वय खुल्या गटासाठी ३१ आणि मागासवर्गीयांसाठी ३४ तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडू व माजी सैनिक यांना कमाल वयाची ३६ वर्ष एवढे आहे.

शैक्षणिक अर्हता : संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य शासनाने घोषित केलेली इतर कोणतेही तत्स्म अर्हता.

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे अर्हतेसोबत खालील प्रमाणे शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे.

पुरुष : उंची - १६५ से.मी. (अनवाणी) कमीतकमी.

छाती - न फुगविता ७९ से. मी., फुगवण्याची क्षमता किमान पाच सेमी

महिला : उंची - १५७ से. मी. (अनवाणी) कमीत कमी

महाराष्ट्र दुय्यमसेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

विषय प्रश्नांची संख्या गुण परीक्षेचा कालावधी परीक्षेचे स्वरूप माध्यम दर्जा

सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक ०१२) १०० १०० ६० मिनिटे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मराठी इंग्रजी पदवी

अभ्यासक्रम : १) चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील

२) नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्रार्थमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन

३) इतिहास : आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

४) भूगोल : महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

५) अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

६) सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र (Physics) रसायनशास्त्र (Chemistry)

प्राणीशास्त्र (Zoology) वनस्पतीशास्त्र (Botany) आरोग्यशास्त्र (Hygiene)

७) बुद्धीमापन चाचणी व अंकगणित : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

$
0
0

अमित संतोषराव डहाणे

राज्येसवा परीक्षांच्या अभ्यासक्रमातच दुय्यम सेवा परीक्षांचा जवळजवळ बहुतांश अभ्यासक्रम कव्हर होतो. त्यामुळे राज्यसेवा व दुय्यम सेवा परीक्षांच्या अभ्यासक्रमात तुलनात्मक काय फरक आहे हे नीट समजावून घेतले पाहिजे. राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक १ (सामान्य अध्ययन) यामध्ये एकूण सात घटकांचा समावेश होतो. त्यापैकी सहा घटक हे दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत आहेत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक २ (CSAT) मधील बुद्धीमत्ता चाचणी व अंकगणित हा घटक दुय्यम व सेवा परीक्षेतील सातवा घटक होय. दोन्ही परीक्षांमधील समान सात घटक म्हणजे भूगोल, इतिहास, राज्यघटना, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान आणि बुद्धीमत्ता चाचणी व अंकगणित हे होय.

राज्यसेवा पूर्व परीक्षांमध्ये 'पर्यावरण' हा अधिकच घटक सामान्य अध्ययनात अभ्यासावा लागतो. परंतु, पर्यावरण या विषयाची जागतिक पातळीवरील वाढत चाललेली संवेदनशीलता महत्त्व यामुळे चालू घडामोडी किंवा जी.के. यासाठी तसेच भूगोल संदर्भातील चालू घडामोडीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पर्यावरण अभ्यासणे उचित ठरते.

या दोन्ही परीक्षांमधील घटकांवर विचारलेल्या प्रश्नांच्या गुणांची विभागणी परीक्षानिहाय थोडी फार वेगळी आहे. कारण परीक्षानिहाय गुणांचे वेटेजसुद्धा वेगळे आहे. परंतु या घटकांचा अभ्यासक्रम दोन्ही परीक्षांमध्ये सारखाच अभ्यासावा लागतो. राज्यसेवा पूर्व परीक्षेत भूगोल या घटकात प्राकृतिक, जग, भारत या घटकांवर जास्त प्रश्न विचारतात. दुय्यम सेवा पूर्व परीक्षेत भूगोलातील भारत व महाराष्ट्र या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात.

राज्यसेवा पूर्व परिक्षेत इतिहासामधील प्राचीन व मध्ययुगीन भारत यावरही प्रश्न विचारले जातात. तर दुय्यम सेवा पूर्व परीक्षेत आधुनिक भारताचा इतिहास व त्यातही महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर जास्त प्रश्न विचारले जातात. बाकी उर्वरित घटकांवरील अभ्यासक्रमात राज्यसेवा पूर्व आणि दुय्यम सेवा संयुक्त पूर्व असा फारसा फरक नाही. म्हणजेच सामान्य विज्ञान, राज्यघटना, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, बुद्धीमत्ता चाचणी व अंकगणित या विषयांच्या दोन्ही ही परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि संदर्भ पुस्तके जवळजवळ सारखीच आहेत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्वरूप

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी होणाऱ्या पेपरमध्ये १०० प्रश्न १०० गुणांसाठी ६० मिनिटांत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने दिलेले असतात. यामध्ये चुकीच्या प्रश्नांना ०.२५ नकारात्मक गुण (Negative Marking) असते. पूर्व परीक्षेत सामान्य अध्ययनातील सात गटांवर १०० प्रश्न विचारले जातात. साधारणत: प्रत्येक घटकाला सरासरी १४ प्रश्न विचारले जातात. २०१३ ते २०१८ या कालावधीतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास आपल्याला असे दिसते की सामान्य विज्ञानावर १५ प्रश्न, बुद्धीमत्ता व अंकगणितावर १५ प्रश्न आणि चालू घडामोडीवर १५ प्रश्न हमखास विचारलेले दिसतात. म्हणजे सात घटकांपैकी सामान्य विज्ञान, बुद्धीमत्ता व अंकगणित आणि चालू घडामोडी या तीन घटकांवर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी ४५ गुणांचे वेटेज कायम राहिले आहे. आणि उर्वरित इतिहास, भूगोल, राज्यघटना व अर्थव्यवस्था या घटकांवर ५५ गुणांचे वेटेज विभागलेले आहे.

संयुक्त पूर्व परीक्षा ही पुन्हा एकदा नव्याने २०१७ सालापासून घेण्यास सुरवात झाली आहे. तत्पूर्वी PSI/STI/ASO या सर्व पदांसाठी पूर्व व मुख्य परीक्षा पदनिहाय वेगवेगळी घेण्यात येत असे. २०१७ आणि २०१८ च्या संयुक्त पूर्व परीक्षांचा विचार केल्यास घटकनिहाय गुणांचे आणि प्रश्नांचे विभाजन साधारणपणे पुढीलप्रमाणे करता येईल.

१) सामान्य विज्ञान : ५ ते १० महा. बोर्ड क्रमिक पुस्तके व सोबतच बाजारातील कुठलेही एक संदर्भ साहित्य. उदा. चंद्रकांत गोरे, भाग एक वर डॉ. सचिन मस्के, सोनाली भुसारे किंवा कोलते यांच्यापैकी कोणतेही एक संदर्भ साहित्य.

२) इतिहास : ८ वी व ११ वी महा. बोर्ड क्रमिक पुस्तके.

आधुनिक भारताचा इतिहास : समाधान महाजन

महाराष्ट्राचा इतिहास - डॉ. अनिल कठारे

३) भूगोल : महा. बोर्ड क्रमिक ५ ते १२ वी. (old ९वी व १०वी)

महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी

४) राज्यघटना : ८ ते १२ वी महा. बोर्ड क्रमिक

तुकाराम जाधव खंड - १

किंवा रंजन कोळंबे

५) अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे किंवा देसले भाग एक

६) चालू घडामोडी : देवा देवधर आणि युनिक बुलेटिन किंवा पृथ्वी परिक्रमा.

७) बुद्धीमत्ता चाचणी - अनिल अंकलगी किंवा सुजित पवार.

अंकगणित - नितीन महाले किंवा पंडरीनाथ राणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीएससी पूर्वपरीक्षा अर्थशास्त्र विश्लेषण ४

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

अर्थशास्त्र य‌ा विषयातील प्रश्नांचे विश्लेषण आपण यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ च्या प्रश्नांच्या आधारे पाहात आहोत. एखादा प्रश्न का विचारला जातो तसेच प्रश्न तयार करीत असताना कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले जाते याचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. जेणेकरून २०१९ च्या पूर्वपरीक्षेला सामोरे जाताना आपल्याला अडचण होणार नाही. तसेच एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेत असताना त्यातील परीक्षाभिमुख घटक हेरून आपण त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. २०१८ मधील अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न पाहूयात.

Q. Consider the following statements

1. The fiscal responsibility and budget management (frbm) review committee report has recommended a debt to gdp ratio of 60% for the general (combined) government by 2023, comprising 40% for the Central Government and 20% for the State Government.

2. The Central Government has domestic liabilities of 21% of GDP as compared to that of 49% of GDP of the State Governments.

3. As per the constitution of India, it is mandatory for a state to take the Central Governments concept for raising any loan if the former owes any outstanding liabilities to the latter.

Which of the statements given above is/are correct?

a) 1 only

b) 2 and 3 only

c) 1 and 3 only

d) 1, 2 and 3

Ans : c

FRBM ही अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. वरील प्रश्नांचे स्वरूप पाहता चा FRBM चा आढावा घेणाऱ्या समितीच्या अहवालामुळे हा प्रश्न विचारलेला आहे हे स्पष्ट होत आहे. म्हणजेच या प्रश्नाचे मूळ हे 'चालू घडामोडी' हे आहे. या प्रश्नात अर्थशास्त्राबरोबर राज्यघटनेचाही विचार अंतर्भूत आहे. प्रश्नातील विधानांचा विचार करता तिसरे विधान हे राज्य घटनेच्या तरतुदींवर आधारित असलेले असे विधान आहे. निव्वळ अर्थशास्त्र एके अर्थशास्त्र असा विचार करून प्रश्न तयार केले जात नाहीत हे यावरून स्पष्ट होते. तसेच 'अर्थशास्त्र' व 'राज्यघटना' यांचे परस्परसंबंध आपण अनुभवू शकतो जसे की 'Money Bill' ही संकल्पना तशी अर्थशास्त्र व राज्यघटना या दोन्ही विषयांना पूरक आहे. 'धन विधेयक' ही संकल्पना जरी अर्थशास्त्राची असली तरी प्रक्रिया मात्र राज्य घटनेशी संबंधित आहे. 'बजेट'च्या बाबतीतही आपण हा परस्परसंबंध पाहू शकतो.

हा प्रश्न सोडविण्यासाठी या अहवालातील शिफारशी व तथ्ये (facts) आपणास माहीत असायला हवीत. पहिले विधान हे समितीच्या शिफारशींपैकी एक आहे. दुसरे विधान हे समितीच्या अहवालातील तथ्य आहे. तर तिसरे विधान हे 'राज्यघटनेतील' तरतुदींशी संलग्न असे आहे. दुसऱ्या विधानातील तथ्य चुकीचे आहे. राज्य सरकारची liabilities केंद्रापेक्षा अधिक व केंद्राची २१% इतकीच नमूद केल्याने इथे उत्तर हे पहिले व तिसरे विधान बरोबर आहे. २०१९ साठी प्रकाशित अहवाल, २०१८ मधील समित्या त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यास अपेक्षित आहे.

Q. Which one of the following links all the ATMS in India?

a) Indian Bank's Association

b) National Securities Depository Limited

c) National Payments Corporation of India

d) Reserve Bank of India

Ans : c

National Payments Corporation of India (NPCI) ही संस्था 'Digital Payment' या कार्यक्रमामुळे चर्चेत आली. 'Digital Payment' मधील NPCI ची एकूणच सर्व कामे अभ्यासणे अपेक्षित आहे. त्यातील एक कार्य म्हणजे भारतातील सर्व ATM एकमेकांना जोडणे होय.

जेव्हा कुठलीही संस्था चर्चेत येते तेव्हा संबंधित संस्थेबद्दल काही मूलभूत बाबी जसे संस्थेची स्थापना, उद्देश्य कार्ये यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी त्या संस्थेच्या संकेतस्थळावर 'About us' मध्ये जाऊन याबद्दलची अधिकृत माहिती घ्यावी. यासाठी २०१८ मधील चर्चेतील महत्त्वाच्या संस्था अभ्यासणे २०१९ करिता महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्यावे.

Q. Consider the following statements :

1. Capital Adequacy Ratio (CAR) is the amount that banks have to maintain in the form of their own funds to offset any loss that banks incur if the account holders fails to repay dues.

2. CAR is decided by each individual bank. Which of the statements given above is/are correct?

a) 1 only

b) 2 only

c) Both 1 and 2

d) Neither 1 nor 2

Ans : a

वरील प्रश्न हा अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनेवर आधारित आहे. अशा प्रकारचे प्रश्न जसे की, 'Angel Investor,' 'Repo Rate' आदी प्रश्न गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना माहिती असणे ही या विषयाला सामोरे जाण्याआधीची पहिली अट आहे. तसेच यातील दुसरे विधान म्हणजे 'CAR' कोण ठरवते तर नक्कीच प्रत्येक बँक ते ठरवत नाही हे या संकल्पनेची व्याख्या वाचल्यावर लक्षात येईल. यासाठी 'Economy Basic Concept' हे शंकर गणेश या लेखकाचे पुस्तक सर्व संकल्पनांसाठी उपयुक्त असे आहे.

'DrSushils Spotlight' या यू ट्यूब व टेलिग्राम चॅनेलला अर्थशास्त्रासंबंधीच्या मूलभूत संकल्पना व चालू घडामोडींच्या विश्लेषणासाठी भेट द्या. अर्थशास्त्रातील 'मूलभूत संकल्पना' व अर्थशास्त्राच्या चालू घडामोडींचा अभ्यास हा बरोबर केला पाहिजे त्यामुळे आगामी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या अपेक्षित प्रश्नांपर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी पूर्वपरीक्षा : इतिहास-II

$
0
0

डॉ. सुशील तुकाराम बारी

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ चा विचार करता 'इतिहास' या विषयाचे प्रश्न कशा प्रकारे व कोणत्या घटकांवर विचारले जाऊ शकतात, हे आपण गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे पाहत आहोत. प्रश्न समजून घेणे ही फार महत्त्वाची बाब आहे. एकदा का आपण प्रश्न समजून घेतलेत की आपण स्वत: प्रश्न बनवू शकतो. स्वत: प्रश्न बनवणे हे कधीही परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. प्रश्न ब‌नविण्यासाठी त्या प्रश्नांचे विश्लेषण खूप महत्त्वाचे असते. २०१८मध्ये विचारलेल्या 'इतिहास' या विषयाच्या प्रश्नांना विश्लेषणात्मक पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.

२०१८च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेत 'आधुनिक भारत' या विषयावर विचारलेले प्रश्न पाहूया.

प्र. In 1920, which of the following changes its name to 'Swarajya Sabha'?

a) All India Home Rule League

b) Hindy Mahasabha

c) South Indian Liberal Federation

d) The Servants of India Society

Ans : a

आधुनिक भारताच्या इतिहासातील 'गांधी युगाच्या' सुरुवातीची ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. 'स्वराज्य सभा' सुरुवातीची ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. 'स्वराज्य सभा' यावर दोन वर्षांपूर्वीही प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नांचा आशय असा होता की, होमरुलमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना गांधीजींनी सत्याग्रह सभेत सहभागी करून घेतले, या विधानाची शहानिशा करण्यासंबंधीचा होता. यावरून 'होमरुल चळवळ' आणि 'गांधीजी' यांच्या संबंधावर विचारला जाणारा हा दुसरा प्रश्न आहे.

तसे 'आधुनिक भारत' हे NCERT (old) वाचले असेल तर बहुतांशी इतिहासाचे सर्व प्रश्न सुटतात. हा प्रश्न तर महत्त्वाच्या घटनेशी म्हणजेच गांधीजींचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात होणारा उदय व इतर महत्त्वाच्या नेत्यांचा अस्त याच्याशी जोडला गेलेला आहे. 'होमरुल चळवळी'ला म्हणावे तितकेसे यश मिळाले नाही. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या नंतर 'होमरुल चळवळीतील तरुण व त्याचे महत्त्व हेरून गांधीजींनी या चळवळीला नवी दिशा दिली. त्यातूनच पुढे राष्ट्रीयत्वाची भावना व स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांना चालना मिळाली.

असे सरळ सरळ प्रश्न विचारण्याची पद्धत इतिहासात आपण वारंवार पाहतो जसे 'सत्यशोधक समाज' कुठल्या राज्याशी संबंधित आहे. कशाचा विचार त्यात आढळतो, असे प्रश्न आपण पाहू शकतो. त्यामुळे इतिहास विषयाच्या बाबतीत किमान NCERTचे वाचन असणे अधिक महत्त्वाचे ठरते.

प्र. Which among the following events happened earliest?

a) Swami Dayanand established Arya Samaj

b) Dinbandhu Mitra wrote Neeldarpan

c) Bankim chadra chattopadhyay wrote Anandmath

d) Satyendranath Tagore bacame the first Indian to succeed in the Indian civil services Examination.

Ans : b

इतिहासातील कालानुक्रम हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कालानुक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भविष्यातील व भूतकाळातील घडलेल्या घटनांशी संबंध नसतो. त्यामुळे एखादी घटना का घडली याची कारणे आपण भूतकाळात शोधू शकतो. त्यामुळे घटना व त्यांचा कालावधी माहीत असणे हे इतिहासात अपेक्षित आहे. अशा आशयाचे प्रश्न मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्येही आपण पाहू शकतो. परंतु इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मागील वर्षातील कालानुक्रमाच्या प्रश्नात तुम्हाला खूप महत्त्वाच्या घटनांवर प्रश्न विचारलेला आढळतो जसे की, असहकार चळवळ (१९२०-२२) सविनय ‌कायदेभंग (१९३०) भारत छोडो चळवळ (१९४२) याचबरोबर गोलमेज परिषद, पुणे करार (१९३२), ऑगस्ट प्रस्ताव (१९४०), क्रिप्स मिशन (१९४२), राजगोपालचारी योजना (१९४४), देसाई-लियाकत प्रस्ताव (१९४५), वेव्हेल योजना (१९४५), कॅबिनेट मिशन योजना (१९४६), माउंटबेटन योजना (१९४५) इ. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांचा विचार करणे इथे क्रमप्राप्त होते. कालानुक्रमात विविध आयोग, समित्या, योजना, महत्त्वाच्या घटना इ. चा विचार अंतर्भूत आहे. परंतु हा प्रश्न व्यक्तिगत घटनांवर आधारित आहे. तेव्हा व्यक्तिगत स्तरावर 'महत्त्वाच्या व्यक्ती' व त्यांच्याद्वारे केलेले कार्य यांचाही विचार काळाच्या चौकटीत करणे आगामी काळासाठी उपयोगी ठरेल.

प्र. After the Santhal uprising subsided what was/were the measure/measures taken by the colonial government?

1) The territories called 'Santhal Paragaras' were created

2) It became illegal for a santhal to transfer land to a non-santhal

select the correct answer using the code given below:

a) l only

b) 2 only

c) Both land 2

d) Neither 1 nor 2

Ans : C

१८५७ चा उठाव सोडला तर इतरही असंख्य उठाव आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बघतो जसे की 'संथाल उठाव' होय. २०१९मध्ये 'बिरसा मुंडाचे' नेतृत्व असलेला 'मुंडाचा उठाव' विचारला जाऊ शकतो. दिल्लीत गेलेल्या शेतकरी मोर्चाला 'उलगुलान' असे नामकरण केले होते जे 'मुंडा उठावातील' क्रांतीचे आहे. आदिवासी, शेतकरी उठावांचा अभ्यास करताना उठाव, नेतृत्व, उठावाचे कारण व उठावाचे स्थान या बाबी समजून घेणे गरजेचे असते. वरील प्रश्नात उठावाचे कारण विचारलेले आहे. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका चाळून स्वत: प्रश्नांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नांमध्येच आगामी काळात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची गुपिते दडलेली असतात हे लक्षात असू द्या.

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षा - १

$
0
0

अमित संतोषराव डहाणे

२४ मार्च २०१९ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम संयुक्त पूर्वपरीक्षा अर्थातच PSI/SIT/ASO Pre याच्यासाठीचे योग्य नियोजन कसे करता येईल, या संबंधीची माहिती आपण आजच्या आणि उद्याच्या लेखातून घेऊ. संयुक्त पूर्वपरीक्षेस आता साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी आहे. कोणत्या परीक्षेचा अभ्यास करताना शेवटच्या टप्प्यातील अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या शेवटच्या टप्प्यातील अभ्यासतच जास्त महत्त्व असते, ते उजळण्यांना. (Rivisions) म्हणून या टप्प्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनात सात घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हे सात घटक म्हणजे सात विषय ज्यात इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित हे होय. या सर्व विषयांचे आपले आतापर्यंत एक किंवा दोन वेळा वाचन नक्कीच झाले असेल आणि ते व्हायला पाहिजेच. हे येथे मुद्दाम सांगावेसे वाटते की, जाहिरात आल्यावर अभ्यासाला सुरुवात करून आपण ही परीक्षा पास होणे थोडे अवघड आहे. तर कोणी असा दावा करतही असेल की जाहिरात आल्यावर आपल्याला सुरुवात केली आणि लगेच येणारी परीक्षा उत्तीर्ण झालो, तर ती व्यक्ती नक्कीच आधीपासून या परीक्षेचा अभ्यास करत आहे. या आधी ही परीक्षा दिलेली आहे. असो हे सांगण्याचे कारण की, पूर्व परीक्षेतील सातही विषयांचा अभ्यासक्रम बघितला, तर हा अभ्यासक्रम चांगल्या दर्चाच्या साहित्या संदर्भातून किमान एकदा वाचण्यास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागो. म्हणून जसे तहान लागल्यावर विहिरी खोदणे तसे जाहिरात आल्यावर अभ्यासाला सुरुवात करणे होय.

आता हातात असलेल्या ५० ते ६० दिवसात म्हणजेच अखेरच्या टप्प्यात नेमके आपण अभ्यासाचे कशा प्रकारे नियोजन करू या हे बघू या. आपले सर्व विषय किमान एक किंवा दोन वेळा वाचून झाले असतील, असे गृहित धरू या. मग आता या टप्प्यात प्रत्येक विषयातील विश्लेषणाच्या आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि गेल्या वर्षीच्या पत्रिकांचे विश्लेणाच्या आधारे अभ्यासाला जास्तीत जास्त निश्चित दिशा द्यावयाची आहे.

गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका हाताळताना...

शेवटच्या टप्प्यातील अभ्यासाची सुरुवातच गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून करावयाची आहे. आपण आधी आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार एक किंवा दोन वेळा वाचन केलेले आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक विषयातील प्रमुख घटक, उपघटक, याची माहिती आहेच. आयोगाच्या २०१३ ते २०१८ पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेतील पूर्वसाठी उपयुक्त असणाऱ्या विषयांचा प्रश्न अभ्यासणे महत्त्वाचे आहे. विषयातील प्रमुख घटक समोर ठेवून त्यावर २०१३ ते २०१८ या कालावधीत आयोगाने कशा प्रकारे किती प्रकारे प्रश्न विचारलेले आहे, हे बघणे खूपच उपयुक्त ठरते. उदा. आपण १८५७ चा लढा हा इतिहासातील एक घटक गृहित धरू या. या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघितल्यास आपल्याला असे लक्षात येते की १८५७च्या उठावावर २०१२पासून (२०१५ वगळता) २०१८ पर्यंत प्रत्येक परीक्षेत यावर प्रश्न विचारलेला आहे. मग इतिहास या विषयाचा अभ्यास करताना त्यातील १८५७चा उठाव हा आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या अत्यंत जवळचा किंवा आवडता घटक दिसतो. म्हणून आपण गेल्या वर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे १८५७च्या उठावावर किती व ‌कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले आहे ते अभ्यासणे गरजेचे आहे. जसे १८५७च्या उठावाची तात्कालिक कारण, उठावाचे ठिकाण, ठिकाणानुसार नेतृत्व, १८५७च्या उठावास असणारे कारणीभूत धोरण, उठावाचा सामाजिक परिणाम, उठाव व क्रांतिकारक १८५७च्या आधीचे महत्त्वपूर्व उठाव, उठावाशी संबंधित महत्त्वपूर्ण व्यक्ती, १८५७च्या उठावाचे झालेले वर्णन, त्यावरील पुस्तके आणि १८५७च्या उठावानंतर झालेले महत्त्वपूर्ण बदल इत्यादी प्रकारचे आयोगाने १८५७च्या उठावावर प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणून आता अभ्यास करताना १८५७च्या उठाव हा घटक सरळ सरळ न अभ्यासता आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या स्वरूपातच अभ्यासणे महत्त्वाचे आहे.

गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास आपल्याला असे लक्षात येते की आयोगाने प्रत्येक विषयात काही महत्त्वाच्या घटकांवर प्रश्न विचारताना जास्त भर दिला आहे. या टप्प्यात आपल्याला त्याच महत्वपूर्ण घटकांवरचा अभ्यास चांगला करायचा आहे. म्हणून या अभ्यासाच्या टप्प्यात आपण अभ्यास करताना आपल्य हाताशी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि वर्गीकरण असलेले संदर्भ साहित्य ठेवणे गरजेचे आहे. प्रश्नत्रिकांमधील प्रश्न बघून बघून आपल्याला हे समजायला हे सोपे जाते की आपण वाचत असलेल्या घटकावर आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारू शकते ज्याला आपण MCQ (Multiple choice Question) असे म्हणतो. आपली त्यासंबंधीची एक दृष्टी तयार होत जाते. आणि याचा उपयोग परीक्षेत पेपर सोडवताना फार चांगल्या प्रकारे होतो. आपण अभ्यासाचा जास्तीत जास्त भर कंटेन्ट पूर्ण करण्यावर देतो. त्यामुळे बऱ्याच वेळा MCQकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु येथे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, अभ्यासक्रमाचा कंटेन्ट वाचून झाल्यावर माहिती MCQच्या स्वरूपात मला आठवते का? ती माहिती MCQ स्वरूपात म्हणजे परीक्षेतील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात लक्षात ठेवणे आणि परीक्षेत वेळेवर आठवणे यासाठीच अभ्यासक्रम पूर्ण करता करता मागील प्रश्नपत्रिकांचे सतत वाचन व विश्लेषण करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 507 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>